नांदेडमहाराष्ट्र

Mp Ashokrao chavhan ;नांदेड विभागातील रेल्वेचे प्रश्न तातडीने मार्गी लावा-खा अशोकराव चव्हाण -NNL

नांदेड,गोविंद मुंडकर। दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील रेल्वे मार्ग ,वंदे भारत एक्सप्रेससह रेल्वेचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावा अशी आग्रही मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री,खा. अशोकराव चव्हाण यांनी केली आहे.

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय रेल्वे कार्यालयात सोमवार दि. ३० सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता खासदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मराठवाड्यातील रेल्वेच्या विविध प्रश्नांकडे खा.चव्हाण यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले यावेळी खा. नागेश पाटील आष्टीकर ,खा. फोजीया खान,खा. बंडू जाधव, खा. संजय देशमुख ,दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अरुणकुमार जैन ,डीआरएम निती सरकार व रेल्वेच्या प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. बैठकीनंतर खा. चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधत बैठकीत उपस्थित केलेल्या मागण्यांची माहिती दिली आहे.

IMG 20240930 WA0024 Mp Ashokrao chavhan ;नांदेड विभागातील रेल्वेचे प्रश्न तातडीने मार्गी लावा-खा अशोकराव चव्हाण -NNL

यावेळी खा. अशोकराव चव्हाण म्हणाले की,रेल्वे मार्गांच्या खर्चाचा अर्धा वाटा राज्य शासन उचलणार आहे. यामुळे नांदेड -बिदर व नांदेड -लातूर या मार्गाचे काम तातडीने हाती घेऊन वेळेत पूर्ण करावे ज्यामुळे मूंबईसह विविध मार्गाकडे जातांना कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. यामुळे प्रवासाला आता लागणार वेळ आणखी कमी होणार आहे. नांदेड जिल्ह्याचा रेल्वेचा कारभार काही स्टेशन नांदेड विभागात तर काही सिकंदराबाद मध्ये यामुळे कामास विलंब होतो यासाठी नांदेड जिल्ह्याच्या सर्व स्थानक ,मार्गाची जबाबदारी केवळ नांदेड विभागाकडेच असावी. जालना पर्यंत असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसचा नांदेड पर्यंत विस्तार करावा तसेच मूंबई -छत्रपती संभाजीनगर -नांदेड -हैद्राबाद अशी नवी वंदे भारत एक्सप्रेस सुरु करावी अशी मागणीही खा. अशोकराव चव्हाण यांनी केली आहे.

IMG 20240930 WA0025 Mp Ashokrao chavhan ;नांदेड विभागातील रेल्वेचे प्रश्न तातडीने मार्गी लावा-खा अशोकराव चव्हाण -NNL

स्वछतेवर फोकस करा -खा. चव्हाण
बहुतांश रेल्वेच्या डब्यात अस्वछता दिसून येते विशेषतः स्वच्छतागृहांत तर अस्वछतेचा कळस असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत. रेल्वे प्रशासनाने स्वच्छ ट्रेन्स व स्वच्छ स्थानके यावर फोकस करावे अशी मागणीही माजी मुख्यमंत्री,खा. अशोकराव चव्हाण यांनी केली आहे

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!