नांदेड l रस्ता लोक संवाद सामाजिक चळवळ होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन सहाय्यक परिवहन अधिकारी आशिष दरगोडे यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड व जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय सिडको नवीन नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रम प्रसंगी केले.

यावेळी सहाय्यक परिवहन अधिकारी आशिष दराडे यांनी राज्य रस्ता सुरक्षा अभियान 2025 अंतर्गत हेल्मेट युक्त अपघात मुक्त गाव अभियान संकल्पनेतून रस्ता सुरक्षा लोकसंवाद कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित सर्व मान्यवरांना रस्ता सुरक्षा जनजागृतीची मार्गदर्शिका पुस्तक भेट रुपी देऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.नांदेड जिल्ह्यात दिवसाला पाचशेच्या आसपास अपघातात होतात.जिल्ह्यातील केवळ पाच टक्के लोक रस्ता सुरक्षा नियमांचे व वाहन कायद्याचे पालन करतात.हि अत्यंत चिंताजनक असून या सर्व विषयाचा गांभीर्याने विचार करण्याची अत्यंत गरज आहे.

त्यामुळे रस्ता सुरक्षा विषयी गावागावात लोकसंवाद घडून आणणे आणि जनजागृती व प्रबोधन करताना रस्ता सुरक्षा लोकसंवाद हा विषय सामाजिक चळवळ होणे गरजेचे असून यासाठी संबंध युवकांनी पुढाकार घ्यावा. या कार्यक्रमात कै.गणपतराव पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने पुढाकार घेतला. राज्यामध्ये हेल्मेट सक्तीचा कायदा असून सुद्धा लोक हेल्मेट वापरत नाहीत,चार चाकी वाहन चालवताना सीट बेल्टचा वापर करत नाहीत.


रस्ता सुरक्षा हा विषय जिल्हा स्तरावरील नियोजन विभागाने गांभीर्याने घ्यावा आणि त्यासाठी पूरक निधी उपलब्ध करून रस्त्यावरील नामनिर्देशक फलक आणि इतर रस्ता सुरक्षा विषयी लागणाऱ्या सुख सोई उपलब्ध करून द्याव्या.बालपणातच संस्कार होण्यासाठी रस्ता सुरक्षा हा विषय अभ्यासक्रमातही समाविष्ट केला पाहिजे असे मत नांदेड जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य आनंदरावजी गुंडुले यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले. वाहतूक नियमाचे पालन करणे गरजेचे आहे.प्राचार्य डॉ.एन.जी.पाटील यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात व्यक्त केले.

निरंतर हेल्मेट आणि सीटबेल्ट वापरण्याची उत्तम सवय आपल्या सर्वांच्या अंगी यावी म्हणून कार्यक्रमा साठी उपस्थित असणाऱ्या सर्वांना नंदकुमार सावंत यांनी रस्ता सुरक्षेची शपथ दिली. साक्षी नगराळे व ऋषिकेश मैठे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत केले. सदरील कार्यक्रमासाठी नंदकुमार सावंत,मोटर वाहन निरीक्षक,पुंडलिकराव नवारे,बसवंतराव पाटील, रविराज नवारे, डॉ.मनीषा मांजरमकर विद्याधर रेड्डी, डॉ.प्रतिभा लोखंडे ही सर्व मान्यवर मंडळी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.दिलीप काठोडे केले तर आभार डॉ.विद्याधर रेड्डी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत घेऊन करण्यात आली.
सदरील कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ.मेघराज कपूर, डॉ शिवाजी शिंदे, प्रा.सुनील गोविंदवाड, प्रा गोपाल बडगिरे, डॉ.सत्वशीला वरगटे,डॉ.ए ए शेख,राजेश पाळेकर, शसुनील कंधारकर, ग्रंथपाल सुनील राठोड, श्री गणेश तेलंग आदींनी परिश्रम घेतले.

