देगलूर, गंगाधर मठवाले| देगलूर ते हाणेगाव मुक्रामाबाद, बलुर, माणुर रस्त्याची दयनीय अवस्था होवुन अपघातात हाकनाक जीव गमवावा लागत आहे. असे असताना लोकप्रतिनिधी डोळयावर पटी बांधून फिरतात की काय..? असा सवाल जनतेला पडला आहे. त्यामुळे रस्त्याच्या अवस्थेला कंटाळलेल्या जनतेने 21 जुलै पर्यंत रस्ता मजबूत न केल्यास करडखेड चौकातील छञपती संभाजी चौकात आक्रोश रस्ता रोको आंदोलन करण्याचा ईशारा तहसीलदार यांना निवेदनात माध्यमातून दिला आहे.

सदरील रस्ता आजपर्यंत नादुरुस्त असल्यामुळे शभर ते दीडशे अपघात झाले असून, अपघातात तेरा लोकांना जीव गमवावा लागला आहे. रस्त्यात खड्डा कि खड्यात रस्ता असा सवाल जनतेला पडला आहे. प्रौढ नागरिकांना रस्ताने प्रवास करताना मनक्याचा ञास कमरेचा ञास होत असल्याने जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे. निवडून आलेले लोकप्रतिनिधीनी रस्तावरून जाताना जनु काय डोळ्यावर पटी बांधुन दौरा करतात का…? असा प्रश्न जनतेला पडला आहे.

तेव्हा बांधकाम विभागाच्या वरिष्ठांनी याची दखल घेऊन दिनांक 21 जुलै पर्यंत रस्ता मजबूत करावा. अन्यथा आंदोलन छेडण्याचा असा ईशारा तहसीलदार याना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आला आहे. या निवेदनावर जेजेराव पाटील, मच्छिंद्र गवाले, कैलास येसगे, दशरथ सुर्यवंशी, नागनाथ वाडेकर, यादव गाडे, शहाजी बाबरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.



