नांदेड l भारत – अर्जेंटिना संसदीय मैत्री गटाच्या अध्यक्षपदी राज्यसभेचे खा. अशोकराव चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही नियुक्ती जाहीर केली.

भारत आणि अर्जेंटिना यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करणे, संसदीय पातळीवर संवाद वाढविणे तसेच परस्पर सहकार्याच्या नव्या संधी निर्माण करणे, हा या संसदीय मैत्री गटाचा प्रमुख उद्देश आहे. या माध्यमातून दोन्ही देशांतील लोकप्रतिनिधींमध्ये संवाद, विचारांची देवाणघेवाण आणि विविध क्षेत्रांतील सहकार्याला चालना मिळणार आहे.

खा. अशोकराव चव्हाण यांनी या नियुक्तीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांचे आभार मानले असून, या नियुक्तीमुळे भारत – अर्जेंटिना संबंधांना नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.



