नांदेडलाइफस्टाइलव्हिडीओ

15 monkeys were stuck on a tree in Dolhari : पुराच्या पाण्यामुळे नदीकाठच्या डोल्हारी गाव परिसरात झाडावर 15 वानर ३० तासापासून अडकली -NNL

हिमायतनगर,अनिल मादसवार| पैनगंगा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे नदीकाठच्या डोल्हारी गाव परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. रविवारच्या रात्रीपासून 15 वानर झाडावर अडकून पडले असून, त्यांना वाचविण्यासाठी वनविभागाला रेस्क्यू ऑपरेशन राबवावे लागणार आहे.

गेल्या इन दिवसापासून हिमायतनगर शहर व तालुका परिसरात पावसाची संततधार सुरु आहे. रविवार च्या रात्रीपासून पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत असून, यामुळे नदी काठावरील परिसरातील शेत शिवारात पाणीच पाणी झाले आहे. दरम्यान रविवारी सायंकाळी काही वानर डोल्हारी परिसरातील शेतीच्या बाभळीच्या झाडावर चढली होती. दरम्यान झाडाखाली पुराचे पाणी आल्याने पाणीच पाणी येऊन बाभळीच्या झाडावर दहा ते पंधरा वानरांची टोळी अडकून पडली आहे. वानर झाडावर अडकून असल्याची माहिती गावकऱ्यांनी वन विभागाला दिली मात्र सोमवारी रात्रीपर्यंत वन विभागाचे एकही अधिकारी वानरांना पुराच्या कचाट्यातून बाहेर काढण्यासाठी आले नाही. त्यामुळे डोलारी परिसरातील नागरिकांत वनविभागाच्या दुर्लक्षित कारभाराबाबत नानाजी व्यक्त केली जात आहे.

IMG 20240902 WA0079 15 monkeys were stuck on a tree in Dolhari : पुराच्या पाण्यामुळे नदीकाठच्या डोल्हारी गाव परिसरात झाडावर 15 वानर ३० तासापासून अडकली -NNL

सध्याच्या पुरस्थितीला लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांनी आपत्कालीन पथकाच्या माध्यमातून पूरस्थितीला तोंड देण्यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी याना मुख्यालयी राहून देखरेखीची जबाबदारी निश्चित केली आहे. मात्र हिमायतनगर तालुक्यातील पैनगंगा नदीकाठी असलेल्या डोल्हारी या ठिकाणी अडकून असलेल्या वानरांना वाचविण्यासाठी कुणीही आले नाही. याबाबाची माहिती गावकर्यांनी वनविभागाला दिली असल्याचे सांगितले मात्र वनविभाग किंवा आपत्कालीन पथकाचे कोणीही इकडे फिरकले नसल्याने गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पैनगंगा नदीच्या पुराचे पाणी या भागाकडे आल्यानंतर वानर झाडावर चढली मात्र पाणी काही कमी होत नसल्यामुळे वाहणाऱ्यांना झाडावरच कालपासून मुक्काम करावा लागला आहे. जवळपास ३० तास होत आले असताना देखील यांना वाचविण्यासाठी कोणीही प्रयत्न करत नसल्याची खंत वन्यप्रेमी नागरिकांनी पत्रकारांशी बोलून दाखवली आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!