हिमायतनगर, अनिल मादसवार| सन २०२४ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका जवळ येऊन ठेपल्या असून, दसऱ्यानंतर आचारसंहिता लागून निवडणुकीचा बिगुल वाजण्याची तर दिवाळीनंतर मतदान होईल अशी शक्यता राजकीय क्षेत्रातून वर्तवली जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीसह इतर पक्षाच्या पक्षश्रेष्टींकडून निवडून येणाऱ्या उमेदराच्या शोधात चाचपणी केली जात आहे. बहुतांश पक्षाच्या नेत्यांनी हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदार संघांमध्ये कोणाला उमेदवारी दिली..? तर तो निवडून येऊ शकतो यासाठी थेट मतदारांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क करून त्यांची मत मतांतरे जाणून घेतली जात आहेत.


काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश दिल्यानंतर हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदार संघात गेल्या अनेक महिन्यापासून डॉ. रेखाताई चव्हाण गोर्लेगावकर यांनी विधानसभा मतदार संघात गाव भेटीला सुरुवात केली असून, यास उदंड प्रतिसाद मिळतो आहे. आत्तापर्यंत त्यांनी हदगाव हिमायतनगर तालुक्यातील जवळपास सर्वच गावामध्ये भेटी देऊन त्या भागातील शेतकरी, कष्टकरी, नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेऊन सोडविण्यासाठी प्रयत्न करताना दिसून आल्या आहेत. मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने बळीराजा हैराण झाला असताना त्यांनी सर्वप्रथम दोन्ही तालुक्यातील प्रभावित व नुकसानग्रस्त भागाला आणि अधिक नुकसान झालेल्या पैनगंगा नदीकाठच्या गावांना भेट देऊन शेतकऱ्यांना धीर देत हेक्टरी ५० हजारांची मदत देण्याची मागणी शासनाकडे मागणी केलेली आहे.


व तसेच नुकसानीचा अहवाल पक्षश्रेष्टींसह जिल्हाधिकारी नांदेड यांच्या निदर्शनास आणून देऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या प्रयत्न करीत आहेत. तत्पूर्वी श्रावण महीण्यात हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदार संघातील महादेव मंदिर आणि इतर धार्मिक स्थळाला भेटी देऊन भव्य महाप्रसादाचे वितरण आणि आरोग्य शिबीर घेऊन गरजूना सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून आरोग्यसेवा मिळवून दिली आहे. तसेच महिलांसाठी विशेष श्रियाळ सजावट स्पर्धा, विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा, आणि गणेशभक्तांची सुंदर माझा बाप्पा अशी वेगवेगळी स्पर्धा आयोजित करून यातून गुणानुक्रमे त्यांना बक्षीस देऊन एक प्रकारे प्रोत्साहन दिले आहे. डॉ.रेखाताई चव्हाण यांच्यामार्फत राबविले जाणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमाची चर्चा संबंध मतदार संघात होऊ लागली असून, त्यांच्या ग्राउंड लेव्हलच्या कामाची चुणूक दिसू लागल्याने अनेकजण डॉ रेखाताई चव्हाण याना पाचारण करून आपल्या भागातील समस्या अवगत करून देत आहेत. कोणत्याही नागरिकांनी बोलावले कि… विलंब न करता त्या संबंधित ठिकाणी भेटी देऊन त्यांचे म्हणणे संबंधितांपर्यंत पोचवून न्याय मिळवून देण्यासाठी त्या धडपडत असल्याचे अनेकांनी अनुभवलेले आहे.

मतदार संघात भेटीगाठी घेताना डॉ.रेखाताई चव्हाण यांनी सामाजिक कार्याला प्रथम प्राधान्य दिले असून, नुकतेच हक्काच्या घराच्या मालकी प्रमाणपत्रासाठी हिमायतनगर नगरपंचायती समोर ७ दिवस आंदोलन करणाऱ्या महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्याचे प्रश्न जिल्हास्तरावर मांडून त्यांना साथ दिल्याने अखेर नगरपंचायत प्रशासनाला आंदोलनकर्त्या पुढे झुकावे लागले आहे. आंदोलन वापस घेण्यासाठी जॉबकार्ड वितरीत करणे सुरु करावे लागले असून, लवकरच त्या सर्व नागरिकांच्या घराचे सर्वेक्षण होऊन तो अहवाल पाठविला जाणार असल्याचे लेखी आश्वासन आंदोलन कर्त्या महिलांना मिळाले असल्याने आंदोलन कर्त्यां महिलांनी डॉ. रेखाताईंचे आभार मानले आहे.

अश्या विविध सामाजिक कार्य व विविध उपक्रमाच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न समजून घेण्याचा डॉ.रेखाताई चव्हाण यांचा हातखंडा काँग्रेस पक्षाला आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना नक्कीच न्याय देऊ शकतो अशी विचारधारा जनसामाण्यात रुजू लागली आहे. काँग्रेस पक्षाकडून हदगाव हिमायतनगर विधानसभा निवडणुक लढविण्यासाठी त्या इच्छुक असून, विद्यमान आमदारांसह इतरही इच्छुकांची संख्या लक्षणीय आहे. असे असताना नुकतेच लोकशाही नावाच्या न्यूज चॅनलने हदगाव विधानसभा मतदार सांघातून डॉ. रेखाताई चव्हाण यांचे नाव उमेदवारीच्या यादीत आघाडीवर असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे राजकीय गोटात चर्चेला उधाण आले असून, डॉ.रेखाताई चव्हाण यांना हा मतदार संघ अबाधित ठेवण्यासाठी उमेदवारी देऊन पक्ष श्रेष्टीने एक नवा चेहरा समोर आणला तर नवल वाटायला नको….!
हादगाव हिमायतनगर मतदार संघ एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून समजला जाणारा आता मात्र काँग्रेसचा अबाधित गड मानला जात आहे. विधानसभेत काँग्रेसचे मताधिक्य मोठे असले तरी काँग्रेसचा गड ढासळण्यासारखी स्थिती निर्माण होऊ लागली आहे. तर मतदार राजा देखील आता घराणेशाहीला त्याच त्या उमेदवाराला कंटाळले असून, तेलंगणा राज्याप्रमाणे यंदाच्या निवडणुकीपासून दर पाच वर्षाला विधानसभा निवडुकीत नवा पर्याय देण्याच्या शोधात आहेत. काँग्रेस पक्षश्रेष्टींने योगायोगाने जर डॉ. रेखाताई चव्हाण यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केला तर काँग्रेसची मते त्यांना मिळतीलच मात्र अन्य पक्षाकडे वळलेला मतदार देखील एक नवीन आणि महिला उमेदवार म्हणून त्यांना नक्कीच पसंती देतील अशी चर्चा जाणकार मतदारांच्या तोंडून ऐकावयास मिळत आहे. सध्या डॉ.रेखाताई चव्हाण देखील अन्य पक्षाचा चाहता मतदार आपल्याकडे कसा वळवायचा यावर अधिक भर दिला असल्याचे त्यांच्या भेटी गाठीच्या दौऱ्यावरून दिसून येत आहे.
आत्तापर्यंत त्यांनी हिमायतनगर तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये भेटी दिल्या असून, प्रत्येक गावामध्ये असलेल्या उणीव ज्यात रोजगार, पक्के रस्ते, पिण्याचे पाणी, आरोग्य, वीज, यासह सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत गरजा जाणून घेत आहेत. एवढंच नाहीतर त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही विशेष लक्ष दिल असून, वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने त्या प्रयत्न करत आहेत. सर्वसामान्य जनतेच्या समस्यांची जाण असलेल्या नेत्या म्हणून त्यांच्याकडे नागरिक आता पाहू लागले आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात त्या उतरल्या तर त्यांना नक्कीच झुकत माप मिळेल असेही सध्याच्या वातावरणावरून दिसून येत आहे. कारण गेल्या अनेक वर्षापासून त्याच त्या उमेदवाराला मतदान देऊन नागरिक कंटाळून गेले असून, निवडून आलेले नेते केवळ जाहिरातबाजी, चमकोगिरी करून सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करण्यात तरबेज झाले आहेत. आणि आता निवडणूक जवळ आल्या कि विकास कामाचे नारळ फोडून जनतेची दिशाभूल करून सहानुभूती मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. त्यांचा कार्यकाळ संपत आला असताना देखील निवडणूक काळात दिलेले आश्वासन पूर्ण करण्यात सपशेल अपयशी ठरलेल्या नेत्यांना मतदान कस कराव असे म्हणत सर्वसामान्य मतदार, नागरिक नवा पर्याय शोधत आहेत..? असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही हे मात्र खर…?