विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण
नांदेड l जगाच्या कल्याणासाठी होणारा हा महायज्ञ आहे. या यज्ञातुन अनेक चांगल्या गोष्टी जगाच्या कल्याण्यासाठी होत आहेत.यातुन विश्वावर येणारे संकट दुर होईल . यासाठी केदारश्वर रावल जगतगुरु हे यज्ञ करत आहे. तो महायज्ञ आपल्या नांदेड जिल्हयात होत आहे. या महायज्ञामुळे नांदेडकरांचे भाग्य उजाळले आहे. या महायज्ञाचा लाभ येथील जनतेने घ्यावा असे आवाहन करुत जगतगुरु हे नेहमी नांदेडकराच्या उद्धारसाठी प्रयत्न करत आलेत.त्याच्यामुळे मला या सोहळ्याचा भाग होता आले असे मत खा .अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केले.
गोपाळचावडी येथील श्री दशमुखाश्रम भिमाशंकर नगर येथे विश्वशांती महायज्ञ तथा पट्टाभिषेक रजत महोत्सवाचे आयोजक श्री हिमवत केदार वैराग्य सिंहासनाधीश्वर केदारनाथ रावल श्री श्री श्री १००८ जगतगुरु भिमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामी यांनी दि ५ ते १२ दरम्यान आयोजन केले आहे .
या ंमहोत्सवाच्या पाचव्या दिवशी शिवकथ...








