Shri pratyangira chandipath : युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हिमायतनगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात ‘श्री प्रत्यंगिरा चंडी पाठ’
हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) सध्याच्या असंतुलित आणि युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्र व जनतेचे संरक्षण व्हावे तसेच येणाऱ्या काळातील आपत्तींपासून सर्वांचे रक्षण व्हावे या उद्देशाने हिमायतनगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात ‘श्री प्रत्यंगिरा चंडी पाठ’ सुरु करण्यात आले आहे.
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) यांच्या मार्गदर्शनाखाली परमपूज्य गुरुमाऊलींच्या आदेशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यास दिनांक ६ मार्च २०२६ पासून सुरुवात करण्यात आली असून, ‘श्री प्रत्यंगिरा चंडी पाठ’ सेवेत महिलांचा मोठा सहभाग दिसून येत आहे.
या पठण कार्यक्रमात श्री दुर्गा सप्तशती ग्रंथातील प्रत्येक ओवी व उवाचला प्रत्यंगिरा मंत्राचा जप करण्यात येत आहे. या सामूहिक प्रार्थनेद्वारे संपूर्ण जगात शांतता व एकोपा निर्माण व्हावा आणि युद्धजन्य परिस्थिती लवकर संपुष्टात य...









