Sunday, July 5

नांदेड

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Jijau statue : राष्ट्रमाता जिजाऊ पुतळ्याच्या स्तंभ बांधकामाचे भूमिपूजन; हदगाव नगरपरिषदेत उद्यान सुशोभीकरणाला सुरुवात

Jijau statue : राष्ट्रमाता जिजाऊ पुतळ्याच्या स्तंभ बांधकामाचे भूमिपूजन; हदगाव नगरपरिषदेत उद्यान सुशोभीकरणाला सुरुवात

नांदेड, महाराष्ट्र
हदगाव, गौतम वाठोरे| जागतिक महिला दिनानिमित्त हदगाव नगरपरिषदेमार्फत राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या नियोजित पुतळ्याच्या स्तंभाच्या बांधकामाचे भूमिपूजन तसेच राष्ट्रमाता जिजाऊ उद्यान व नमो गार्डनच्या सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. हा कार्यक्रम हदगाव–हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबुराव पाटील कदम व नगराध्यक्ष भास्कर दादा सुभाष वानखेडे यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना घरकुल प्रमाणपत्रांचे वितरणही करण्यात आले. या कार्यक्रमाला विवेक देशमुख (शिवसेना जिल्हाप्रमुख), संभाजीराव लांडगे (माजी जिल्हा परिषद सदस्य), बाळासाहेब कदम (माजी सभापती), अनिल पाटील बाभळीकर (माजी जिल्हा परिषद सदस्य), बाबूसराव कदम (माजी उपसभापती), बबन माळोदे (शहरप्रमुख), डॉ. संजय पवार, युवा नेते आबा वानखेडे, सौ. शितलताई पाटील (महिला जिल्हाप्रमुख, नांदेड), संदेश पाटील हडसणीकर (य...
Ambekar Statue : आंबेडकर चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवावा – आ. बाबुराव पाटील कदम यांच्याकडे मागणी

Ambekar Statue : आंबेडकर चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवावा – आ. बाबुराव पाटील कदम यांच्याकडे मागणी

नांदेड, राजकीय
हदगाव, गौतम वाठोरे| हदगाव शहरातील आंबेडकर चौकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, यासाठी बसस्थानक परिसरातील उपलब्ध खुली जागा देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसच्या नगरसेवकांनी केली आहे. नगरसेवक अमितकुमार अरसूळ, लक्ष्मणराव काळबांडे, सचिन सूर्यवंशी, रविशंकर गुडूप, किशोर भोस्कर, नगरसेविका सिमा अमोल नरवाडे यांच्यासह महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी हदगाव–हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार बाबुराव पाटील कदम यांच्याकडे निवेदन सादर केली आहे. दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, हदगाव तालुक्याचा इतिहास पाहता हा तालुका आंबेडकरी चळवळीचा महत्त्वाचा केंद्रबिंदू राहिला आहे. सामाजिक परिवर्तनासाठी अनेक चळवळी व क्रांतिकारी उपक्रम याच तालुक्यातून घडलेले आहेत. मात्र,शहराच्या मध्यवर्ती भागात अद्यापही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारलेला नाही, ही...
Accident insurance : शेतमजुरांनाही मिळणार अपघात विमा संरक्षण; मृत्यू झाल्यास कुटुंबाला २ लाखांची मदत

Accident insurance : शेतमजुरांनाही मिळणार अपघात विमा संरक्षण; मृत्यू झाल्यास कुटुंबाला २ लाखांची मदत

नांदेड, राजकीय
मुंबई/हदगांव/हिमायतनगर | राज्यातील शेतमजूर कुटुंबांना आर्थिक आधार देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेत राज्य सरकारने आता शेतमजुरांनाही अपघात विमा संरक्षण देण्याची घोषणा केली आहे. शेती काम करताना अपघातात मृत्यू झाल्यास संबंधित शेतमजुराच्या कुटुंबाला २ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची घोषणा महायुती सरकारने मार्च २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली आहे. राज्यात शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या धर्तीवर ही मदत शेतमजुरांनाही देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो शेतमजूर कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. हदगाव–हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी शेतमजुरांनाही अपघात विमा संरक्षण मिळावे, ही मागणी सातत्याने शासनदरबारी लावून धरली होती. नागपूर येथे २०२५ मध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनात त्यांनी...
Women’s day : सुपर हंड्रेड टीमतर्फे महिला दिन उत्साहात साजरा : महिला सखी बीमा प्रतिनिधींचा सत्कार

Women’s day : सुपर हंड्रेड टीमतर्फे महिला दिन उत्साहात साजरा : महिला सखी बीमा प्रतिनिधींचा सत्कार

नांदेड, सोशल वर्क
नांदेड | आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने सुपर हंड्रेड टीमच्या वतीने महिला सखी बीमा प्रतिनिधींसोबत महिला दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी टीममधील सर्व महिला सखी एकत्र येऊन महिला सक्षमीकरणाचा संदेश देत कार्यक्रमाला रंगत आणली. कार्यक्रमादरम्यान उपस्थित सर्व महिलांचा विशेष उपहार देऊन सन्मान व सत्कार करण्यात आला. महिलांनी आपल्या परिश्रम, जिद्द, आत्मविश्वास आणि कर्तृत्वाच्या जोरावर समाजात आदर्श निर्माण केला असून त्यांच्या कार्यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक सुरक्षिततेचा आधार मिळत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी उपस्थितांनी “सशक्त महिला – समृद्ध समाज” हा संदेश देत महिलांच्या कार्याचे कौतुक केले आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. महिला सखींच्या प्रेरणादायी कार्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडत असून भविष्यातही अशाच प्रकारे एकत्रितपणे प्रग...
बँक लिंकिंगच्या नावाखाली फसवणूक करणारी टोळी जेरबंद; आरोपीकडून २० हजार रुपये जप्त

बँक लिंकिंगच्या नावाखाली फसवणूक करणारी टोळी जेरबंद; आरोपीकडून २० हजार रुपये जप्त

क्राईम, नांदेड
नांदेड | बँक खाते लिंकिंग करण्याच्या बहाण्याने नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीविरुद्ध नांदेड पोलिसांनी कारवाई करत एका आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून २० हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातील विविध भागात बँक खाते लिंकिंग किंवा इतर कारण सांगून नागरिकांना फसवून पैसे उकळण्याच्या प्रकारात वाढ झाल्याने पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेला कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत रवि देविदास धुमाळ (वय १९, रा. गौतमनगर, सांगवी, नांदेड) याला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने नागरिकांना विविध आमिषे दाखवून फसवणूक केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून २० हजार रुपये रोख रक्कम जप्त केली असून त्याच्याविरुद्ध उमरी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३१८/२०२५ कलम ३०४(१), ३(५) भारतीय ...
Shri pratyangira chandipath : युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हिमायतनगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात ‘श्री प्रत्यंगिरा चंडी पाठ’

Shri pratyangira chandipath : युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हिमायतनगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात ‘श्री प्रत्यंगिरा चंडी पाठ’

नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) सध्याच्या असंतुलित आणि युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्र व जनतेचे संरक्षण व्हावे तसेच येणाऱ्या काळातील आपत्तींपासून सर्वांचे रक्षण व्हावे या उद्देशाने हिमायतनगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात ‘श्री प्रत्यंगिरा चंडी पाठ’ सुरु करण्यात आले आहे. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) यांच्या मार्गदर्शनाखाली परमपूज्य गुरुमाऊलींच्या आदेशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यास दिनांक ६ मार्च २०२६ पासून सुरुवात करण्यात आली असून, ‘श्री प्रत्यंगिरा चंडी पाठ’ सेवेत महिलांचा मोठा सहभाग दिसून येत आहे. या पठण कार्यक्रमात श्री दुर्गा सप्तशती ग्रंथातील प्रत्येक ओवी व उवाचला प्रत्यंगिरा मंत्राचा जप करण्यात येत आहे. या सामूहिक प्रार्थनेद्वारे संपूर्ण जगात शांतता व एकोपा निर्माण व्हावा आणि युद्धजन्य परिस्थिती लवकर संपुष्टात य...
Satisfaction Camp : छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत समाधान शिबीर

Satisfaction Camp : छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत समाधान शिबीर

नांदेड, सोशल वर्क
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| तहसील कार्यालय हिमायतनगर यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत मौजे खडकी बा. येथे आयोजित समाधान शिबीर – टप्पा एक कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी हिमायतनगरच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार पल्लवी टेमकर यांनी विविध बचत गटांच्या महिलांशी संवाद साधत त्यांना शासनाच्या विविध योजना, महसूल विभागाच्या सेवा तसेच उपलब्ध सुविधांबाबत सविस्तर माहिती दिली. या शिबिरात उपस्थित महिलांनी जमीन, उत्पन्न दाखले, शासकीय योजना तसेच इतर महसूल विषयक प्रश्नांबाबत माहिती जाणून घेतली. तहसीलदार पल्लवी टेमकर यांनी महिलांच्या शंकांचे समाधान करत शासनाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांना थेट प्रशासनाशी संवाद साधण्याची संधी मिळाली असून त्यांच्या विविध समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्य...
illegal sand smuggling : नांदेडमध्ये अवैध रेती तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; १ कोटींचा मुद्देमाल जप्त

illegal sand smuggling : नांदेडमध्ये अवैध रेती तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; १ कोटींचा मुद्देमाल जप्त

क्राईम, नांदेड
नांदेड| नांदेड जिल्ह्यातील अवैध रेती उत्खनन व वाहतुकीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल १ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलिस उपमहानिरीक्षकांच्या पथकाने केली असून रेती तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध रेती उत्खननावर कारवाई करण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने ६ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे ९.३० वाजता पोलिस ठाणे मुदखेड हद्दीतील माळाकोठा परिसरात छापा टाकला. या कारवाईदरम्यान रेती वाहतूक करणाऱ्या टाटा कंपनीचे दोन डंपर, एक JCB मशीन, एक जनरेटर आणि रेतीने भरलेले डंपर असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या साहित्याची एकूण किंमत सुमारे १ कोटी ४ लाख ५० हजार रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पोलिस ठाणे मुदखेड येथे गुन्हा क्रमांक ३९/२०२६ दाखल कर...
Budget 2026-27 : विकसित महाराष्ट्र 2047 च्या ध्येयावर आधारित 2026-27 चा अर्थसंकल्प  – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Budget 2026-27 : विकसित महाराष्ट्र 2047 च्या ध्येयावर आधारित 2026-27 चा अर्थसंकल्प – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नांदेड, मुंबई, राजकीय
मुंबई| महाराष्ट्राचा 2026-27 या आर्थिक वर्षाचा ₹7,69,467 कोटींचा अर्थसंकल्प शासनाने  सादर केला असून तो “विकसित महाराष्ट्र 2047” या दीर्घकालीन रोडमॅपवर आधारित तयार करण्यात आला आहे. पात्र शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ₹50 हजार प्रोत्साहन देण्याचा निर्णयही घेण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान सभेत दुपारी 2 वाजता सन 2026-27 चा अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे, वित्त राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल तसेच वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता यांनी विधानभवन येथील पत्रका...
CM Fadnavis announces loan waiver : अर्थसंकल्पात शेतकऱ्याना दिलासा, मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून कर्जमाफीचा घोषणा

CM Fadnavis announces loan waiver : अर्थसंकल्पात शेतकऱ्याना दिलासा, मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून कर्जमाफीचा घोषणा

नांदेड, महाराष्ट्र, मुंबई
7.69 लाख कोटींचा विकासाभिमुख अर्थसंकल्प सादर शेतकरी कर्जमाफी, नदीजोड प्रकल्प, तिसरी मुंबई आणि स्टार्टअपला चालना राज्याची ‘विकसित महाराष्ट्र’च्या दिशेने यशस्वी घौडदौड एक हजारपेक्षा जास्त लोकसंख्येच्या गावांना  क्रॉक्रिट रस्त्याने जोडणार मुंबई| राज्याच्या सर्वांगीण, सर्वसमावेशक आणि दीर्घकालीन विकासाला गती देण्याच्या उद्देशाने सादर करण्यात आलेला 2026-27 वर्षाचा 7.69 लाख कोटींचा अर्थसंकल्प ‘विकसित महाराष्ट्र’ या ध्येयावर आधारित असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. प्रगतीशील विकास, शाश्वतता, सर्वसमावेशकता आणि सुशासन या चार स्तंभांवर आधारित हा अर्थसंकल्प राज्याच्या आर्थिक, सामाजिक आणि पायाभूत विकासाला नवी दिशा देणारा ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी करीत शेतकऱ्यांना दिलासा देणारा कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला. विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्...
error: Content is protected !!