Sunday, July 5

महाराष्ट्र

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Ganesh idol immersion route : महावितरण कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या गणेश मूर्ती विसर्जन मार्गावरून दोन गटात वाद -NNL

Ganesh idol immersion route : महावितरण कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या गणेश मूर्ती विसर्जन मार्गावरून दोन गटात वाद -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरातील महावितरण कार्यालयात असलेल्या गणेश मूर्ती विसर्जन मिरवणुकीच्या मूर्तीचा मार्ग अडवल्यावरून किनवट - भोकर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या 'उमर-चौक' परिसरात सायंकाळी ६ वाजता तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर दोन्ही समाजातील जमलेल्या गर्दीला पांगवण्यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागला. रात्री उशिरा पोलीस बंदोबस्तात गणपती बाप्पाची मूर्ती नेण्यात येऊन विसर्जन करण्यात आले. सध्या हिमायतनगर शहरात तणावपूर्ण शांतता आहे. याबाबत सवसितर वृत्त असे कि, हिमायनगर शहरातील महावितरण कार्यालयात कर्मचाऱ्यांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी वाजत गाजत गणपती बाप्पाची मोठ्या स्थापना करण्यात आली. नऊ दिवस आनंदाने उत्सव साजरा करण्यात आला. शहरातील सार्वजनिक गणपती बाप्पाचे विसर्जन मंगळवारी अकराव्या दिवशी होणार असल्याने महावितरण कार्यालयातील कर्मचायांनी स्थापन केलेल्य...
Chief Minister Eknath Shinde : मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना ‘सुपरहिट’- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL

Chief Minister Eknath Shinde : मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना ‘सुपरहिट’- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL

महाराष्ट्र
धाराशिव| मला मुख्यमंत्री पदापेक्षा भाऊ हा शब्द जिव्हाळ्याचा वाटतो. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाच्या कार्यक्रमात अतिशय उत्साहाने सहभागी झालेल्या लाडक्या बहिणींच्या डोळ्यातील आनंद पाहून मनाला अतिशय समाधान मिळत आहे. त्यांच्या डोळ्यातील हा आनंद म्हणजे या योजनेच्या यशस्वीतेची पावती आहे. ही योजना ‘सुपरहिट’ ठरल्याचे यातून स्पष्ट होत असल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. परंडा येथे महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती कार्यक्रमात ते बोलत होते. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत, आमदार ज्ञानराज चौगुले, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव, प्रा. शिवाजी सावंत, जिल्हा प...
Shree Murti Collection Center  ; मनपा हदतील शहरी भागातील श्री विसर्जन झरी खदान येथे,अनेक ठिकाणी श्रीमुर्ती संकलन केंद्र – NNL

Shree Murti Collection Center ; मनपा हदतील शहरी भागातील श्री विसर्जन झरी खदान येथे,अनेक ठिकाणी श्रीमुर्ती संकलन केंद्र – NNL

नांदेड, महाराष्ट्र
नवीन नांदेड l नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हद्दीत असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या श्री मुर्ती विसर्जन दरवर्षी प्रमाणे याही वर्षी झरी खदान येथे होणार असून मनपानी क्रेन व जीवरक्षक दल यासह विधुत व्यवस्था केली असून गणेश भक्तांनी गोदावरी नदीच्या पात्रात विसर्जित न करता झरी खदान येथे करून मनपा प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या शहरी भागातील २७ व ग्रामीण परिसरात २४ एकुण५१ परवानगी गणेशोत्सव मंडळ यांनी नोंद केली आहे तर विनापरवानगी शहरी व ग्रामीण ९१ गणेशोत्सव मंडळे आहेत. गणेशोत्सव मंडळ यांनी मोठ्या व आकर्षक मुर्ती स्थापना केल्या असून १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी ला विसर्जन होणार आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी झरी खदान येथे नांदेड शहरातील व सिडको परिसरातील श्री मुर्ती विसर्जन होणार असल्याने १४ सप्टेंबर रोजी मनपा प्रशासनाचे अतिर...
Huyatma smarak development ; नांदेड जिल्ह्यातील हुतात्मा स्मारकांचा विकासासाठी शासनाचं उदासीन धोरण -NNL

Huyatma smarak development ; नांदेड जिल्ह्यातील हुतात्मा स्मारकांचा विकासासाठी शासनाचं उदासीन धोरण -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड। जिल्ह्यातील मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यातील शासनाने स्वतंत्र सैनिकाच्या सन्मानार्थ उभारलेल्या स्मारकांची दुरुस्ती सुशोभीकरण करून स्मारकांचा विकास अमृत महोत्सवी वर्षात करण्याची मागणी स्वातंत्र्यसैनिक उत्तरअधिकारी केदार पाटील साळुंके यांनी पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन लेखी देऊन चर्चा केली होती. त्यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने जिल्हाधिकारी यांना बोलावून सर्वच स्मारकांचा विकास करण्याच्या सूचना वजा आदेश दिलेले होते मात्र अमृत महोत्सवी वर्ष संपले तरी विकास झाला नसल्याच्या निषेधार्थ 17 सप्टेंबर हा मुक्ती संग्राम दिन स्वातंत्र्यसैनिक उत्तरअधिकारी हे काळ्याफिती लावून साजरा करून शासनाचा निषेध नोंदवणार असल्याची माहिती स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी केदार पाटील साळुंके यांनी जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन देऊन कळवले आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्ष...
When the fatal lumbar bridge..? will be : गणेशविसर्जन मिरवणूक मार्गावरील हिमायतनगरचा जीवघेणा नडव्याचा पूल कधी..? होणार -NNL

When the fatal lumbar bridge..? will be : गणेशविसर्जन मिरवणूक मार्गावरील हिमायतनगरचा जीवघेणा नडव्याचा पूल कधी..? होणार -NNL

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर,अनिल मादसवार| शहरातून उमरखेड, ढाणकी, बोरीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील जीवघेण्या नडव्याच्या पुलाचे काम कधी..? होणार असा प्रश्न वाहनधारक नागरिकांसह आता गणेशभक्तातून विचारला जात आहे. आतापर्यंत चार ते पाच वेळा हा पुल मंजूर झाला असल्याचे सांगून नेते मंडळींनी नागरिक वाहनधारकाच्या कोपऱ्याला गुळ लावण्याचे काम केले कि काय..? अशी शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे. आता चार दिवसावर गणपती बापाचे विसर्जन येऊन ठेपले आहे. त्यामुळे या नडव्याच्या पुलातून गणपती बाप्पाला नेताना विसर्जन मिरवणुकीला अडथळा येऊन काही अनुचित घटना घडल्यास राजकीय नेत्यांसह याकडे दुर्लक्ष करणारे बांधकाम खाते व संबंधित ठेकेदाराला जबाबदार धरण्यात येईल अशी संतापजनक भावना नागरिक, गणेशभक्तातून बोलून दाखविली जात आहे. हिमायतनगर शहर हे तालुक्याचे ठिकाण असून, शहरापासून हाकेच्या अंतरावर म्हणजेच उमरखेड बोरी मार्गावर पांडवकालीन कनकेश्वर तल...
Last chance to apply for ‘Mukhya Mantri Yojandoot’ : ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याची शुक्रवारी शेवटची संधी -NNL

Last chance to apply for ‘Mukhya Mantri Yojandoot’ : ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याची शुक्रवारी शेवटची संधी -NNL

नांदेड, महाराष्ट्र
मुंबई। शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी अर्ज करण्याची शुक्रवार दि. १३ सप्टेंबर २०२४ ही शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर अर्ज करावा, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे. या योजनादूतांना दरमहा १० हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील. या उपक्रमासाठी आतापर्यंत १ लाख २० हजारांहून अधिक उमेदवार...
Thane Slum Rehabilitation Project Officer Ashwini Patil felicitated : ठाणे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प अधिकारी अश्विनी पाटील यांचा लोह्यात सत्कार -NNL

Thane Slum Rehabilitation Project Officer Ashwini Patil felicitated : ठाणे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प अधिकारी अश्विनी पाटील यांचा लोह्यात सत्कार -NNL

नांदेड, महाराष्ट्र
लोहा| दहा वर्षा पूर्वी लोहा कंधार तालुक्यात जलयुक्त अभियान अतिशय प्रभावीपणे राबविणाऱ्या तत्कालीन उपविभागीय अधिकारी अश्विनी पाटील याचा लोह्यात दि नांदेड मर्चंट बँकेचे संचालक हरिहर धुतमल, तलाठी संघटनेचे अध्यक्ष मारुती कदम, कोतवाल संघटनेचे माधव काकडे याच्या वतीने सत्कार करण्यात आला> उपजिल्हाधिकारी अश्विनी पाटील या ठाणे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.२०१४-१६या वर्षात उपविभागीय अधिकारी म्हणून लोहा कंधार मध्ये कार्यरत होत्या. जलयुक्त अभियानात लोकचळवळ उभी केली आणि अनेक गावे त्यांनी पाणीदार बनविली. उस्माननगर या गावाचा दुष्काळ कायमचा त्यांनी संपविला. अनेक उपक्रम त्यांनी महसूल विभागाच्या राबविले. कडक शिस्तीच्या व नियमांनुसार प्रशासन चालविणाऱ्या अधिकारी अशी त्याची ओळख होती. त्यांनी तलाठी मंडळ अधिकारी यांना महसूल कायदा व नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या त्याचा आता य...
Excessive use of loudspeakers is prohibited : ध्वनीक्षेपकाचा वापर मर्यादेपेक्षा जास्त करण्यास मनाई -NNL

Excessive use of loudspeakers is prohibited : ध्वनीक्षेपकाचा वापर मर्यादेपेक्षा जास्त करण्यास मनाई -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| जिल्‍हाधिकारी कार्यालय व शासकीय दवाखानाच्‍या भोवतालच्‍या 100 मिटर परिसरात ढोल, ताशा, डॉल्‍बी सिस्‍टीम इत्‍यादी कर्णकर्कश वाद्य वाजविण्‍यास तसेच सभेसाठी, भाषणासाठी व इतर प्रयोजनासाठी ध्‍वनीवर्धक, ध्‍वनीक्षेपक यांचा वापर हा विहीत मर्यादे (दिवसा सकाळी 6 ते रात्री 10 यावेळेत 50 डेसीबल व रात्री 10 ते सकाळी 6 यावेळेत 40 डेसीबल) पेक्षा जास्‍त वारंवारतेने करण्‍यासाठी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 मधील कलम 163 नुसार याद्वारे प्रतिबंध केले आहे. याबाबत जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 मधील कलम 163 (1) अन्‍वये आदेश निर्गमीत केले आहेत. हा आदेश 10 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर 2024 रोजीच्या 24 वाजेपर्यंत लागू राहील. या आदेशाची अमंलबजावणी करण्‍याची जबाबदारी ही पोलीस अधिक्षक तथा ध्‍वनी प्राधिकरण, उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्‍ट्र प्रदुषण मंडळ नांदेड (सदस्‍य, ध्‍...
minister Anil Patil : नांदेड जिल्ह्यातील संकटातील सर्व शेतकऱ्यांना शासनाकडून मोठ्या प्रमाणात मदत करणार – ना. अनिल पाटील -NNL

minister Anil Patil : नांदेड जिल्ह्यातील संकटातील सर्व शेतकऱ्यांना शासनाकडून मोठ्या प्रमाणात मदत करणार – ना. अनिल पाटील -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशावर त्यांचा प्रतिनिधी म्हणून मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या नैसर्गिक आपत्तीत झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी आजचा दौरा आहे. मी प्रत्यक्ष पाहणी केली असता नांदेड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. आपण स्वत: शेतकरी पुत्र असल्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानाची जाणीव असून सर्व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात शासकीय मदत मिळेल, असे आश्वासन राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी आज येथे केले. नांदेड तालुक्यातील आलेगाव, निळा या गावाच्या शेतशिवारात जाऊन त्यांनी नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी केली. या भागामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आसना नदीच्या काठावरील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. जमीन खरडून जाणे, पिके वाहून जाणे, रस्ते वाहून जाणे, पुलांचे नुकसान होणे, घराची पडझड होणे अशा पद्धतीचे सगळेच नुकसान...
Chhatrapati Sambhaji Raje ; स्वराज्य पक्षप्रमुख छत्रपती संभाजीराजे यांचा नांदेड मधील हदगाव हिमायतनगर भागात ओला दुष्काळ पाहणी दौरा -NNL

Chhatrapati Sambhaji Raje ; स्वराज्य पक्षप्रमुख छत्रपती संभाजीराजे यांचा नांदेड मधील हदगाव हिमायतनगर भागात ओला दुष्काळ पाहणी दौरा -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड,अनिल मादसवार। नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्याला अवकाळी पावसाचा जोरदार फटका आहे. या भागातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी व शेतकरी बांधवांना धीर देण्यासाठी स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी सकाळी ८ वा. शेतकऱ्यांच्या बांधावर जात पाहणी केली व शेतकरी बांधवांना धीर दिला. हदगाव तालुक्यातील उंचाडा या गावातील नुकसानीची सरकारने तात्काळ भरपाई द्यावी, शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी नांदेड जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. पुढील ४ दिवसांत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळायला हवी, अशी मागणी उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांना केली. नांदेड मधील दौऱ्यानंतर छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू, राजू शेट्टी व इतर घटक पक्ष परभणी भागातील पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी करणार आहेत. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करावेत आणि सरकारने सरसकट भरीव मदत करावी, अशी मागणी याव...
error: Content is protected !!