Sunday, July 5

महाराष्ट्र

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Purna karimnagar trean ; औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, भोकर, हिमायतनगर, किनवट, आदिलाबाद मार्गे पुणे – करीमनगर – पुणे विशेष गाडीच्या 08 फेऱ्या मंजूर -NNL

Purna karimnagar trean ; औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, भोकर, हिमायतनगर, किनवट, आदिलाबाद मार्गे पुणे – करीमनगर – पुणे विशेष गाडीच्या 08 फेऱ्या मंजूर -NNL

तेलंगणा, नांदेड, महाराष्ट्र
नांदेड। औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, भोकर, हिमायतनगर, किनवट, आदिलाबाद मार्गे पुणे – करीमनगर – पुणे विशेष गाडीच्या 08 फेऱ्या मंजूर करण्यात आल्या आहेत. दसरा आणि दिवाळी निमित्त होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वेने पुणे – करीमनगर – पुणे विशेष गाडीच्या 08 फेऱ्या मंजूर केल्या आहेत. पुणे – करीमनगर साप्ताहिक विशेष गाडीच्या 04 फेऱ्या : गाडी क्रमांक 01451 पुणे–करीमनगर विशेष गाडी दिनांक 21 आणि 28 ऑक्टोबर रोजी व 04 आणि 11 नोव्हेंबर, 2024 रोजी दर सोमवारी पुणे रेल्वे स्थानकावरून रात्री 22.45 वाजता सुटेल आणि दौंड, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, अंकाई, रोटेगाव, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, परभणी, पूर्णा, हुजूर साहिब नांदेड, मुदखेड, भोकर, हिमायत नगर, सहस्तरकुंड, बोधडी, किनवट, आदिलाबाद, माजरी, चंद्रपूर, बलारशा, सिरपुरकागजनगर, मंचिर्याल, रामागुंडम, पेडपल्ली मार्गे करीमनगर येथे बुधवारी स...
Prime Minister Narendra Modi : पीएम विश्वकर्मा योजनेतून पारंपरिकता आणि कौशल्याला नवीन ऊर्जा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी -NNL

Prime Minister Narendra Modi : पीएम विश्वकर्मा योजनेतून पारंपरिकता आणि कौशल्याला नवीन ऊर्जा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी -NNL

महाराष्ट्र
वर्धा| पीएम विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून पारंपरिकता आणि कौशल्याला नवीन ऊर्जा प्रदान करण्याचा संकल्प आम्ही केला आहे. ही योजना म्हणजे देशात हजारो वर्षापासून असलेल्या पारंपरिक कौशल्याचा वापर विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांचा एक परिपूर्ण रोडमॅप आहे. या कौशल्यामध्ये सर्वाधिक भागिदारी अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागासवर्गीय समाजसमुहाची आहे. या समुहातील कारागिर उद्योजक व्हावेत असा आमचा प्रयत्न असून त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देण्यासोबतच  ‘सप्लाय चेन’सारख्या व्यवस्थेचा भाग व्हावे, अशी अपेक्षा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. महाराष्ट्राच्या बहुआयामी प्रगतीचा नायक शेतकरीच राहणार असून त्याच्या समृध्दीसाठी सरकार सर्व आघाड्यांवर प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही प्रधानमंत्र्यांनी येथे दिली. पीएम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा वर्धा येथील स्...
Chief Minister Eknath Shinde honored : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जागतिक कृषी पुरस्काराने गौरव -NNL

Chief Minister Eknath Shinde honored : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जागतिक कृषी पुरस्काराने गौरव -NNL

महाराष्ट्र
मुंबई। जागतिक कृषी पुरस्कारामुळे महाराष्ट्राच्या शाश्वत शेतीच्या प्रयत्नांवर जगाने मोहोर उमटवली आहे. महाराष्ट्राने नेहमीचे भारतातील कृषी क्षेत्रात प्रयोगशीलता राबवल्याचे या पुरस्कारामुळे सिद्ध झाले, अशा शब्दांत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रदान करण्यात आलेल्या जागतिक कृषी पुरस्कारांबद्दल कौतुकोद्गार काढले आहेत. पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या कामाची दखल घेऊन ‘वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरम’कडून त्यांना जागतिक कृषी पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले. फोरमचा हा दुसराच पुरस्कार असून हा पुरस्कार राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते मुख्यमंत्री श्री शिंदे यांना प्रदान करण्यात आला. जागतिक बांबू दिनाच्या औचित्याने या समारंभाचे आयोजन करण्यात आले. एनसीपीएच्या सभागृहात झालेल्या या समारंभास महाराष्ट्र कृषी मूल्य आयो...
special train approved : परभणी, जालना, औरंगाबाद, कल्याण मार्गे नांदेड-पनवेल-नांदेड विशेष गाडीच्या 24 फेऱ्या मंजूर -NNL

special train approved : परभणी, जालना, औरंगाबाद, कल्याण मार्गे नांदेड-पनवेल-नांदेड विशेष गाडीच्या 24 फेऱ्या मंजूर -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड। दसरा आणि दिवाळी निमित्त होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे ने नांदेड-पनवेल-नांदेड विशेष गाडीच्या 24 फेऱ्या मंजूर केल्या आहेत. त्या पुढील प्रमाणे – नांदेड-पनवेल द्वि-साप्ताहिक विशेष गाडीच्या 12 फेऱ्या : गाडी क्रमांक 07625 हुजूर साहिब नांदेड ते पनवेल विशेष गाडी दिनांक 21 ऑक्टोमबर ते 27 नोव्हेंबर, 2024 दरम्यान दर सोमवारी आणि बुधवारी नांदेड रेल्वे स्थानकावरून रात्री 23.00 वाजता सुटेल आणि पूर्णा, परभणी, मानवत, सेलू, परतूर, जालना, औरंगाबाद, लासुर, रोटेगाव, नगरसोल, अंकाई, मनमाड, नासिक, इगतपुरी, कल्याण मार्गे पनवेल येथे दुसऱ्या दिवशी दुपारी 13.25 वाजता पोहोचेल. ही गाडी ऑक्टोमबर आणि नोव्हेंबर, 2024 महिन्यात मिळून 12 फेऱ्या पूर्ण करेल. पनवेल - नांदेड द्वि-साप्ताहिक विशेष गाडीच्या 12 फेऱ्या : गाडी क्रमांक 07626 हुजूर साहिब नांदेड ते पनवेल विशेष गाडी दिनांक 22 ऑक्टोम...
Pasha Patel : पृथ्वीच्या रक्षणासाठी बांबू शेती उपयुक्त – राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल

Pasha Patel : पृथ्वीच्या रक्षणासाठी बांबू शेती उपयुक्त – राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल

महाराष्ट्र, कृषी
मुंबई| जागतिक तापमानातील वाढ, वातावरणातील बदल आणि कार्बन उत्सर्जनाच्या वाढत्या प्रमाणामुळे मानवजाती आणि पृथ्वी धोक्याच्या उंबरठ्यावर आहे. या मानवजाती आणि पृथ्वीला वाचविण्यासाठी बांबू शेती करणे अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केले आहे. १८ सप्टेंबर हा दिवस जगभरात बांबू दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित जागतिक बांबू दिवस उत्साहात साजरा करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला पद्मश्री भारत भूषण त्यागी, पद्मश्री कमल सिंग, पद्मश्री गेनाजी चौधरी, पद्मश्री सुलतान सिंग, पद्मश्री चंद्रशेखर, पद्मश्री जगदिश प्रसाद पारेख, मनरेगाचे महासंचालक नंदकुमार, प्रधान सचिव प्रवीण दराडे, दूरदर्शन निवेदिका म...
Prime Minister Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे ऑनलाईन पध्दतीने उद्घाटन -NNL

Prime Minister Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे ऑनलाईन पध्दतीने उद्घाटन -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| कौशल्य विकास या संकल्पनेचा अधिकाधिक लाभ राज्यातील युवक-युवतींना व्हावा या दृष्टिकोनातून राज्यातील नामांकित महाविद्यालयामध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र ही योजना महाराष्ट्र शासनातर्फे सुरु करण्यात आली आहे. या योजनेद्वारे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या योजनेचे उदघाटन शुक्रवारी 20 सप्टेंबर 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हर्च्युअल/ऑनलाईन पध्दतीने नांदेड जिल्ह्यातील 25 महाविद्यालयामध्ये होणार आहे. तरी युवक-युवतीनी या योजनेच्या उद्घाटनासाठी आपल्या जवळच्या महाविद्यालयामध्ये उपस्थित राहावे, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीमती रेणूका तम्मलवार यांनी केले आहे....
Chief Minister Eknath Shinde : आरोग्य यंत्रणेचे जाळे अधिक घट्ट करण्यावर शासनाचा भर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL

Chief Minister Eknath Shinde : आरोग्य यंत्रणेचे जाळे अधिक घट्ट करण्यावर शासनाचा भर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL

छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र
छत्रपती संभाजीनगर| राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात याला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून आरोग्य यंत्रणेचे जाळे अधिक घट्ट करण्यावर शासनाचा भर आहे. छत्रपती संभाजीनगर येथील निवासी डॉक्टरांसाठी आवश्यक त्या सोयी- सुविधा उभारणीसाठी आवश्यक तो निधी दिला जाईल, त्यांच्या सुरक्षेबाबतही शासन डॉक्टरांच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. 'चिठ्ठीमुक्त घाटी' या उपक्रमाबद्दल मुख्यमंत्र्यांनी रुग्णालय प्रशासनाचे कौतुक केले. छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास (घाटी) येथे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आज भेट देऊन अतिविशेषोपचार रुग्णालयाची पाहणी केली आणि डॉक्टरांशी संवाद साधला. यावेळी खासदार डॉ. भागवत कराड, खासदार संदीपान भुमरे, खासदार कल्याण काळे, आमदार संजय शिरसाट, आमदार प्रदीप जैस्वाल, प्रधान सचिव विकास खारगे, वि...
Girish mahajan ; शासनाच्या कल्पक योजनातून महाराष्ट्राची आर्थिक संपन्न राज्याकडे वाटचाल : ना. गिरीश महाजन -NNL

Girish mahajan ; शासनाच्या कल्पक योजनातून महाराष्ट्राची आर्थिक संपन्न राज्याकडे वाटचाल : ना. गिरीश महाजन -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना अशा अनेक कल्पक योजनांच्या माध्यमातून आर्थिक सामाजिक संपन्नतेच्या महाराष्ट्राची पायाभरणी होत आहे. शासन या योजनांच्या माध्यमातून आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व रोजगाराच्या क्षेत्रातील संपन्न राज्याकडे वाटचाल करीत असल्याचे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज येथे केले. नांदेड येथील माता गुजरीजी विसावा उद्यानातील स्मृतीस्तंभावर मानवंदना व मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमानंतर त्यांनी जनतेला संबोधित केले. सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टी मधील सर्व नुकसाना संदर्भातील पंचनामे अंतिम टप्प्यात असून तातडीने शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. मराठवाडा मुक्ती संग्रामा...
“Vatsalya” scheme : “वात्सल्य”योजनेच्या राष्ट्रीय कार्यक्रमात नांदेड जिल्ह्याचा सहभाग राहणार -NNL

“Vatsalya” scheme : “वात्सल्य”योजनेच्या राष्ट्रीय कार्यक्रमात नांदेड जिल्ह्याचा सहभाग राहणार -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या अल्पवयीन मुलांसाठीच्या “वात्सल्य” नावाच्या नव्या पेन्शन योजनेची सुरूवात 18 सप्टेंबर रोजी होत आहे. नवी दिल्ली येथून होणाऱ्या राष्ट्रीय शुभारंभ सोहळ्यात नांदेड जिल्ह्याचा ऑनलाईन सहभाग आहे. देशातील मोजक्या जिल्ह्यामध्ये नांदेडचा सहभाग निश्चित झाला असून हा कार्यक्रम नांदेड येथील केंद्रीय विद्यालयात होणार आहे. नांदेड जिल्ह्याच्या अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अनिल गचके यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय विद्यालय विमानतळ रोड नांदेड येथे 50 विद्यार्थी व 50 पालकांच्या सहभागात जिल्हा या राष्ट्रीय शुभारंभ कार्यक्रमात सहभागी होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन व अन्य मान्यवर या कार्यक्रमाला दिल्ली येथून संबोधित करणार आहेत.18 सप्टेंबर रोजी दुपारी 1 ते 4.30 या काळामध्ये हा कार्यक्रम होणार असून नांदेड येथील स्टेट बँक...
DYSP Dr Ashwini Jagtap : गणेश विसर्जन मिरवणूक डीजे मुक्त व शांततेत पार पाडावी – डीवायएसपी डॉ अश्विनी जगताप -NNL

DYSP Dr Ashwini Jagtap : गणेश विसर्जन मिरवणूक डीजे मुक्त व शांततेत पार पाडावी – डीवायएसपी डॉ अश्विनी जगताप -NNL

नांदेड, महाराष्ट्र
लोहा| लोहा -कंधार तालुक्यातील सर्व गणेश मंडळांनी गणेश विसर्जन वेळेत पूर्ण करावेत तसेच कोणीही गडबड गोंधळ करू नये तसेच डॉल्बी( डीजे) वाजविण्यास पूर्णतः बंदी आहे त्यामुळे ध्वनी प्रदूषण टाळावे नियमांचे उल्लंघन करू नये गणेश विसर्जन शांततेत पार पाडण्यासाठी गणेश मंडळ व ग्रामस्थ यांनी सहकार्य करावे मिरवणुकीत फुलांची उधलण करावी गुलाल टाळावा तसेच ईद ए मिलाद निमित्ताने निघणार जुलूस शांततेत पार पाडावा असे आवाहन कंधार पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ अश्विनी जगताप यांनी केले आहे लोहा पोलीस ठाण्यात गणेश विसर्जन व ईद ए मिलाद च्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी शांतता समितीची बैठक आयोजित केली होती .डीवायएसपी अश्विनी जगताप यांनी ठाण्या अंतर्गत येणाऱ्या गावातील पोलीस पाटील ,शहरातील मान्यवर याना संबोधित केले यावेळी माजी नगराध्यक्ष व गणेश महासंघाचे माजी अध्यक्ष केशवराव मुकदम, माजी उपनगराध्यक्...
error: Content is protected !!