Sunday, May 24

महाराष्ट्र

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

finally got new buses : उशीरा का..? होईना हदगांव एस टी आगाराला अखेर नवीन बसेस मिळाल्या

finally got new buses : उशीरा का..? होईना हदगांव एस टी आगाराला अखेर नवीन बसेस मिळाल्या

नांदेड, महाराष्ट्र
हदगांव, शेख चांदपाशा| हदगाव एस टी आगारामध्ये पहिल्या टप्यातील सहा नवीन बसचे लोकार्पण सोहळा सोमवारी पार पडला. या बाबतीत अनेक माध्यामातून आवाज उठविण्यात आला होता. विशेष म्हणजे नांदेड न्युज लाईव्ह ने या बाबत सर्वात प्रथम पाठपुरावा केला होता. आ. बाबुराव कदम कोहळीकर यांच्या हस्ते नवीन बसचे पूजन करून जनतेच्या सेवेसाठी रवाना करण्यात आल्या आहेत. हदगाव एस टी आगारामध्ये अनेक दिवसांपासून अपुऱ्या बस तसेच नादुरुस्त बसमुळे लोकांना बस स्थानकामध्ये अनेक तास ताटकळत बसावे लागत असे. हदगाव व हिमायतनगर या दोन्ही तालुक्यातील अनेक शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी महिला जेष्ठ नागरिक दिव्यांग वयोवृद्ध यांना बस प्रवासामध्ये दिलेल्या सूटमुळे बस ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली त्यामुळे अपुऱ्या बसमुळे प्रवाशांची खूप मोठी गैरसोय होत होती. या सर्व बाबींचा विचार करून हदगांव हिमायतनगरचे आ. ...
Pregnant deer hit : गाभण हरणाला अज्ञात वाहनाने उडविले; हरीण जागीच ठार तर पोटातील पाडस सुखरूप

Pregnant deer hit : गाभण हरणाला अज्ञात वाहनाने उडविले; हरीण जागीच ठार तर पोटातील पाडस सुखरूप

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर,अनिल मादसवार| शहरातील घारापुर फाटा ते बोरी मार्गावर रस्ता पार करणाऱ्या एका गाभण हरिणीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याची घटना ०३ मार्च रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. यात गाभण हरिणीचा जागीच मृत्यू झाला असला तरी पोटातील हरिणीचे पाडस सुखरूप बाहेर पडले आहे. हा प्रकार लक्षात येताच येथील सामाजिक कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी पाडसाला वनविभागाच्या ताब्यात दिले असून, मयत हरिणाच्या प्रेताची शासकीय नियमाप्रमाणे विल्हेवाट लावण्यात आली आहे. सध्या हिमायतनगर शहर व तालुक्यात उष्णतेचा पारा ४३ अंशापेक्षा अधिक वाढला असून, अंगाची लाही लाही होत आहे. घारापुर, हिमायतनगर, पळसपूर भागातील पैनगंगा नदी पात्रात आणि जंगलातील पाणवठ्याच्या पाण्याची पातळी कमी होऊ लागल्याने मुकी जनावरे, पशु पक्षी आणि वन्य प्राणी पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करत आहेत. अश्याच प्रकारे पाण्याच्या शोधात रानोवन भटकंती करणारे एक गाभण ह...
Nanded Collectorate Office : 100 दिवसांचा कृती आराखडा; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाची सर्वोत्तम कामगिरी

Nanded Collectorate Office : 100 दिवसांचा कृती आराखडा; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाची सर्वोत्तम कामगिरी

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड|100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेच्या पहिल्या टप्याचा निकाल काल जाहीर झाला. सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या महाराष्ट्रातील जिल्हाधिकारी कार्यालयात नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाने 66.86 गुण मिळवून राज्यात पाचवा तर छत्रपती संभाजीनगर विभागात प्रथम क्रमांक पटकाविला. तर राज्यात परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक कार्यालयामध्ये नांदेड पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाने 61.14 गुण मिळवून सर्वोत्तम कामगिरी करत दुसरा क्रमांक पटकाविला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार प्रत्येक कार्यालयाला 100 दिवसांचा कृती आराखड्यानुसार कार्यालयीन सुधारणा करण्याबाबत निर्देश दिले होते. या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणांचा भारतीय गुणवत्ता परिषद कॉलिटी कॉन्सिल ऑफ इंडिया यांच्यामार्फत या मोहिमेचे मुल्यमापन करण्यात आले आहे. यामध्ये संकेतस्थळ अद्ययावत, सुकर जीवनमान, स्वच्छता, तक्रार निवारण...
Atul Save ; सामान्यांसह शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना राबविण्यावर शासनाचा भर :  पालकमंत्री अतुल सावे

Atul Save ; सामान्यांसह शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना राबविण्यावर शासनाचा भर :  पालकमंत्री अतुल सावे

नांदेड, महाराष्ट्र
महाराष्ट्र स्थापनेचा 66वा स्थापना दिन  उत्साहात साजरा जिल्ह्यातील जलसंधारणाच्या कामांना वेग द्यावा टॅक्टर अपघातातील मृतकांच्या परिजनांना सानुग्रह निधीचे वाटप उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार नांदेड। राज्य शासन नेहमी सामान्य नागरिक, शेतकरी यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या हिताच्या योजना राबवित असते. येणाऱ्या काळामध्ये शेती, माती, कृषी सोबतच अन्य सर्व क्षेत्रांमध्ये शाश्वत विकासावर राज्य शासनाचा भर राहील ,असे प्रतिपादन राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्‍धविकास, अपारंपारिक ऊर्जा मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केले.  नव्या सरकारच्या गठनानंतर योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर प्राधान्याने भर असून जिल्ह्यात आतापर्यत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 812 कोटींची मदत करण्यात आली आहे. शासनाच्यावतीने सामान्य जनतेच्या व शेतकऱ्यां...
Himayatnagar : पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ हिमायतनगर कडकडीत बंद; मुस्लिम बांधवानी दिलं निवेदन

Himayatnagar : पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ हिमायतनगर कडकडीत बंद; मुस्लिम बांधवानी दिलं निवेदन

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर। जम्मू-काश्मीर येथील पहलगाम मध्ये दहशतवादी लोकांनी निष्पाप पर्यटक यांच्यावर गोळीबार करुन भारतीय नागरीकांचा जिव घेतला आहे. या घटनेच्या निषेधार्थ दिनांक 29 रोजी हिमायतनगर शहर कडकडीत बंद ठेऊन निषेध व्यक्त करण्यात आला आहे. जम्मूकाश्मीरमधील पहेलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांची २२ एप्रिल रोजी गोळ्या झाडून २६ जणांची हत्या केली. या घटनेमुळे भारतात पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या विरोधात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. ठिकठिकाणी बंद पाळून या घटनेचा निषेध व्यक्त केला जातो आहे, त्याच पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. 29) रोजी हिमायतनगर सर्वपक्षीय, सर्वधर्मीय, सकल हिंदू समाज बांधवाच्या वतीने कडकडीत बंद पाळत निषेध व्यक्त करण्यात आला. पाकिस्तानी दहशतवादी हल्ल्याला भारताने प्रत्युत्तर द्यावे, अशी मागणी करण्यात आली. शहरातील व्यापाऱ्यांनी आपले दुकाने बंद ठेवून उस्फूर्त प्रतिसाद देत या...
Maharashtra Day : महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

Maharashtra Day : महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| महाराष्ट्र दिनानिमित्त 1 मे रोजी ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यादृष्टीकोनातून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रतिबंधात्मक आदेश निर्गमीत करण्यात आला आहे. या आदेशानुसार जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोरील मुख्य रस्ता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय ते महात्मा गांधी पुतळा ते महाविर चौक पर्यंतच्या परिसरातील मुख्य रोडवर भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी 29 एप्रिल 2025 रोजीचे 00.00 वाजेपासून (28 एप्रिल 2025 चे मध्यरात्री 24.00 वाजेपासून) ते 3 मे 2025 च्या मध्यरात्री पर्यंत उपोषणे, आत्मदहने, धरणे, मोर्चे, रॅली, सत्याग्रह इत्यादी आंदोलनात्मक आयोजनास प्रतिबंध केले आहे. संबंध...
9 dignitaries from Maharashtra honored with Padma Awards : महाराष्ट्रातील 9 मान्यवर पद्म पुरस्काराने सन्मानित

9 dignitaries from Maharashtra honored with Padma Awards : महाराष्ट्रातील 9 मान्यवर पद्म पुरस्काराने सन्मानित

महाराष्ट्र, मुंबई
नवी दिल्ली| देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणाऱ्या ‘पद्म पुरस्कारां’चे वितरण आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले. यामध्ये महाराष्ट्रातील 9 मान्यवरांना त्यांच्या क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी ‘पद्म पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती भवनातील एका शानदार समारंभात पद्म पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनकड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, तसेच अन्य केंद्रीय मंत्रीगण उपस्थित होते. आज प्रथम टप्प्यात पार पडलेल्या पद्म पुरस्कार समारंभात राज्यातील 9 मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर, गझल गायक पंकज उधास (मरणोत्तर) यांना ‘पद्मभूषण पुरस्कार’ तर  अरुंधती भट्टाचार्य,  पवनकुमार गोयंका  व्यापार व उद्योग क्षेत्रातील योगदानासाठी, जस्पिंदर नरुला, रानेद्र भान...
Sahasrakund ; इस्लापूर भागातील २५ गावांची अडचण लक्षात घेऊन सहस्त्रकुंड या ठिकाणी बंधारा उभारण्यासाठी प्रयत्नशील राहील

Sahasrakund ; इस्लापूर भागातील २५ गावांची अडचण लक्षात घेऊन सहस्त्रकुंड या ठिकाणी बंधारा उभारण्यासाठी प्रयत्नशील राहील

नांदेड, महाराष्ट्र
किनवट, परमेश्वर पेशवे l महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी दिनांक २८रोजी किनवट तालुक्यातील इस्लापूर भागातील पर्यटनस्थळ स्थळ असलेले सहस्त्रकुंड ,परोटी, या भागाचा दौरा केला. सहस्रकुंड येथे सहस्रकुंड ट्रस्टचे सचिव सतीश वाळकीकर व वाळकी ग्रामपंचायतच्या सरपंच सौ सुनीता बळीराम चव्हाण यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. मोठ्या उत्साहात बंजारा समाजातील समाज बांधवांनी पारंपरिक वेशभूषा धारण करत त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांच्या पुतळ्याच्या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने परोटी तांडा या ठिकाणी हे आले होते. या कार्यक्रमाच्या प्रसंगी बोलत असताना परोटी हे गाव माझे आजूळ असून या गावाशी व किनवट तालुक्यातील जनतेशी माझी ऋणानुबंधाची संबंध आहेत. तेव्हा मी जरी या राज्याचा मंत्री असलो तरी तुमच्या आशीर्वादाने मंत...
Gor Sena : गोर बंजारा समुदयाला अनुसूचित जमातींचे आरक्षण द्या – गोरसेना

Gor Sena : गोर बंजारा समुदयाला अनुसूचित जमातींचे आरक्षण द्या – गोरसेना

नांदेड, महाराष्ट्र
हदगांव, शेख चांदपाशा| आदीम सभ्यता जोपासत समान बोली,एकसमान वहीवाट, समान धाटी,विशीष्ट भुप्रदेशात गावकुसाबाहेर असलेल्या 29 घटकराज्यातील गोर बंजारा समाजाला आदीवासी चे आरक्षण द्यावे अशी मागणी गोर सेनेने भारत सरकारला निवेदनातून केली आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना तहसील कार्यालय मार्फत पाठविलेल्या निवेदनात गोर सेनेने म्हटले आहे की, गोर बंजारा समाज महाराष्ट्रात आणि भारतातील इतर राज्यांमध्ये राहतो. आमच्या समुदायाची एक वेगळी वांशिक ओळख आहे, अद्वितीय सामाजिक-सांस्कृतिक परंपरा, भाषिक वारसा आणि ऐतिहासिक पद्धती ज्या भारतीय राज्यघटनेने परिभाषित केल्यानुसार अनुसूचित जमातींच्या वैशिष्ट्यांशी जवळून जुळतात. मान्यताप्राप्त एसटी समुदायांसोबत समान सांस्कृतिक आणि सामाजिक वैशिष्ट्ये सामायिक करूनही, गोर बंजारा सर्व राज्यांमधील अनुसूचित जमातींच्या यादीमध्ये समान रीतीने समाविष्ट केलेले नाहीत. यामुळे विषम...
Painganga River Is Dry Himayatnagar City Water Problem ; पैनगंगा नदी कोरडी, हिमायतनगर शहराची नळयोजना अर्धवट असल्याने पाणी टंचाईने केले रौद्ररूप धारण

Painganga River Is Dry Himayatnagar City Water Problem ; पैनगंगा नदी कोरडी, हिमायतनगर शहराची नळयोजना अर्धवट असल्याने पाणी टंचाईने केले रौद्ररूप धारण

नांदेड, महाराष्ट्र, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार। विदर्भ मराठवाडा सीमेवरुन वाहणारी पैनगंगा नदी कोरडी पडल्याने हिमायतनगर शहरातील सार्वजनिक विहीर व 500 फूट खोल असलेल्या बोअरवेलची पाणी पातळी खाली गेली असून, घराघरातील शेकडो विंधनविहिरी अक्षरशः बंद पडल्या आहेत. त्यातच मंजूर नळयोजनेचे काम अर्धवट असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तासंतास नंबर लावून बोअरवेलवर पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. नगरपंचायत प्रशासनाने जनतेला वाऱ्यावर न सोडता तात्काळ पाण्याची सोय करावी अशी मागणी केली आहे. हिमायतनगर शहराची तहान भागविण्यासाठी 19 कोटी 19 लक्ष रुपयांची नळयोजना मंजूर झाली मात्र ही नळयोजना आजही थंडबसत्यात आहे, नळयोजनेचे काम ठेकेदार यांच्याकडून थातुरमातुर पद्धतीने केल्या गेल्याने 5 वर्षांपासून नळयोजनेचे काम अर्धवट अवस्थेत आहे. शहरात ठिकठिकाणी जलकुंभ उभारले, शहरात पाईपलाईन केली मात्र अजूनही नळाला पाणी आले नसल्या...
error: Content is protected !!