Thursday, May 21

महाराष्ट्र

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Ujjwala Padlawar : क्रांतिसिंह नानापाटील यांच्या नावाने दिला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार कॉ.उज्वला पडलवार यांना मिळणे म्हणजे त्यांच्या कार्याची पावती : कॉ. गंगाधर गायकवाड

Ujjwala Padlawar : क्रांतिसिंह नानापाटील यांच्या नावाने दिला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार कॉ.उज्वला पडलवार यांना मिळणे म्हणजे त्यांच्या कार्याची पावती : कॉ. गंगाधर गायकवाड

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| बीडमध्ये दि.३ऑगस्ट रोजी शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिना निमित्ताने निवडक दहा व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यामध्ये नांदेड येथील कामगार चळवळीतील लढाऊ साथी कॉ. उज्वला पडलवार यांचा समावेश आहे. शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई मोहन गुंड यांनी केजमध्ये सुरू असलेला क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नावाचा पुरस्कार सोहळा बीडमध्ये घेऊन आले ही कौतुकाची बाब आहे. क्रांतिसिंह नाना पाटील यांचे कार्य चंद्र-सूर्य असेपर्यंत जनमानसात जिवंत राहील. बीड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रविवारी (दि.३) शेतकरी कामगार पक्ष व क्रांतिसिंह नाना पाटील शेतकरी विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने पुरस्कार वितरण आणि क्रांतिसिंह नाना पाटील व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा.बजरंग सोनवणे हे होते. शेकाप...
Mahesh Dhawale : एकही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहू नये : राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे

Mahesh Dhawale : एकही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहू नये : राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमांची अंमलबजावणी करताना कोणताही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहू नये, असे निर्देश राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांनी दिले. आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनच्या कॅबिनेट सभागृहामध्ये आयोजित बैठकीत ते बोलत होते. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमाची अंमलबजावनी, आधार सक्षम सार्वजनिक वितरण प्रणाली, नियतन, उचल, वाटप, अन्न वितरणप्रणालीबाबतच्या तक्रारी, पोषण, पोषण आहार याअनुषंगाने राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. जगदीश बारदेवाड, प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगिता देशमुख, लेखाधिकारी निळकंठ पांचगे, डॉ. सान्वी जेठवाणी, तालुक्याचे पुरवठा निरीक्षण, एकात्मिक महिला व विकास प्रकल्पा...
Half Naked Andolan : खा. डॉ.अजित गोपछडे, खा. प्रा.रवींद्र चव्हाण, आ. प्रताप चिखलीकर यांच्या घरासमोर दिव्यांगचे अर्धनग्न अवस्थेत भीक मागो आंदोलन

Half Naked Andolan : खा. डॉ.अजित गोपछडे, खा. प्रा.रवींद्र चव्हाण, आ. प्रताप चिखलीकर यांच्या घरासमोर दिव्यांगचे अर्धनग्न अवस्थेत भीक मागो आंदोलन

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| दिव्यांगांना जीवन जगण्याचे बळ मिळावं त्यांना आधार मिळावा यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने विविध निधीचा खासदार आमदारांना खर्च करण्याचा अधिकार दिला असतो प्रत्येक खासदाराला व आमदाराला दिव्यांगांवर निधी खर्च करण्यासाठी लाखो रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला जातो परंतु हाच निधी खासदार आमदार दिव्यांगांसाठी खर्च करत नसल्यामुळे तसेच सभागृहात, अधिवेशनात कुठलेच दिव्यांगांचे प्रश्न उपस्थित करत नसल्यामुळे बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य आणि दिव्यांग वृद्ध निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या पुढाकारातून स्थापन झालेली सकल दिव्यांग संघटना महाराष्ट्रच्या वतीने चौथ्या टप्प्यातील आंदोलन आज रविवार दिनांक 3 ऑगस्ट 2025 रोजी खासदार डॉ.अजित गोपछडे, खासदार प्रा.रवींद्र चव्हाण आणि आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या घरासमोर अर्ध नग्न अवस्थेत भिक मागून आंदोलन करण्यात आले....
Rakhi send Soldiers : दापोलीतून “एक राखी जवानांसाठी” अभियानाअंतर्गत सीमेवर राख्या रवाना!

Rakhi send Soldiers : दापोलीतून “एक राखी जवानांसाठी” अभियानाअंतर्गत सीमेवर राख्या रवाना!

नागपूर, महाराष्ट्र
दापोली | कै.कृष्णामामा महाजन स्मृतिप्रतिष्ठानच्या 'युवा प्रेरणा कट्टा' टीमने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील दापोलीत ' एक राखी जवानांसाठी; देशाच्या रक्षकांसाठी ' हा उपक्रम आयोजित केला होता. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर ज्या भारतीय सैन्य दलानी पहलगाम हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तानी आंतकवाद्यांना धडा शिकवला त्यांच्या प्रति आदर व्यक्त करणे हा यावर्षीच्या अभियानाचा मुख्य उद्देश होता. दापोलीतील विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थिनी आणि काही सामान्य नागरिक महिला भगिनी यांनी या उपक्रमात राख्या जमा केल्या. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रमोद पांगारकर,नचिकेत बेहरे,संदीप गरंडे, श्रीप्रीती वैद्य, साक्षी करमरकर, सुमेध करमरकर , रोहन भावे इ. कार्यकर्त्यांसह युवा टीमने मेहनत घेतली. या उपक्रमाबाबत बोलताना मिहीर महाजन म्हणाले, भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली तेव्हा २०२२ मध्ये प्रथमच या ...

Dr. Rajendra Naikwade ; प्राचीन भारतीय अद्वैत तत्वज्ञान हाच समरसतेचा विचार – डॉ. राजेंद्र नाईकवाडे यांचे प्रतिपादन

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| "समरसता हे जीवनमूल्य आहे. भारतीयांचे अद्वैतचिंतन हे समरसतेचे अधिष्ठान आहे. प्राचीन भारतीय तत्वज्ञान हाच समरसतेचा विचार आहे", असे प्रतिपादन डॉ. प्रा. राजेंद्र नाईकवाडे यांनी केले. विसाव्या समरसता साहित्य संमेलनाच्या दुसर्‍या दिवशी रविवारी, दि. तीन ऑगस्ट रोजी बीज भाषण करताना ते बोलत होते. येथील भक्ती लॉन्स येथे हे संमेलन चालू आहे. या प्रसंगी कै. गंगाधरदादा पवार व्यासपीठावर संमेलनाचे अध्यक्ष पद्मश्री नामदेव चं. कांबळे, समरसता साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. ईश्वर नंदापुरे तसेच संमेलनाचे स्वागताध्यक्ष खा. डॉ. अजित गोपछडे हे व्यासपीठावर उपस्थित होते. नव्वदोत्तरी साहित्य आणि समरसता हा यंदाच्या संमेलनाचा विषय आहे. सुमारे पाऊण तासाच्या बीज भाषणात प्रा. नाईकवाडे यांनी प्राचीन भारतीय तत्वज्ञानापासून ते नव्वदोत्तरी साहित्यापर्यंतचा समर्पकपणे आढावा घेतला. समरसता हे जीवनमूल्य आहे. तसेच ते वा...

New Direction :संघाच्या समाजकेंद्री कार्यातून भटक्या-विमुक्तांसाठी नवदिशा” परिसंवादामध्ये मान्यवरांनी व्यक्त केलेले विचार

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड l "भटक्या आणि विमुक्त जातींच्या सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक उत्थानासाठी रचनात्मक चळवळी आणि नव्वदोत्तरी मराठी साहित्य यांचा समन्वय आवश्यक आहे," असे प्रतिपादन विविध मान्यवरांनी केले. 'आधुनिक सामाजिक-राजकीय चळवळी व नव्वदोत्तरी साहित्य' या विषयावरील परिसंवादात त्यांनी आपले विचार मांडले. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार दत्ता जोशी होते. परिसंवादात काशिनाथ पवार, मृणालिनी नानिवडेकर, आणि आशुतोष अडोणी यांनी अभ्यासपूर्ण विचार मांडले. या कार्यक्रमाला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, कुलगुरू डॉ. अशोक महाजन, व लातूरचे माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. भटक्या-विमुक्त समाजाच्या प्रश्नांवर भाष्य करताना काशिनाथ पवार म्हणाले, "पूर्वी या समाजाची जीवनपद्धती परिघाबाहेरची होती. शिक्षण व संधीपासून तो वंचित राहिल्याने त्यांच्या...
Dhanegaon News : धनेगांव येथील जय हनुमान सोसायटी अनाधिकृ मोबाईल टाॅवरचे काम बंद करा अन्यथा गावकरी उपोषण करणार 

Dhanegaon News : धनेगांव येथील जय हनुमान सोसायटी अनाधिकृ मोबाईल टाॅवरचे काम बंद करा अन्यथा गावकरी उपोषण करणार 

नांदेड, महाराष्ट्र
नवीन नांदेड़| धनेगाव येथील जय हनुमान सोसायटी सर्वे नं. 121 मध्ये प्लॉट क्र.368 वर अनाधिकृ मोबाईल टावरचे काम बंद करा अन्यथा उपोषण करण्याचा इशारा धनेगाव ग्रामस्थानी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना दिला आहे. दिलेल्या निवेदनात धनेगाव येथील गेली बऱ्याच दिवसा पासून कोणतीही परवानगी न घेता टॉवर चे काम सुरु असून या बाबत गावकरी यांच्या वतीने जिल्हाधिकारी व जिल्हापरिषद मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात उपोषणास बसत असल्याबाबत. गावकारी मौ. धनेगांव (ज.ह.सो.) ता.जि. ता. जि. नांदेड येथील रहिवाशी असून आमचे सर्वे नं. 121 मध्ये प्लॉट क्र.368 वर अनाधिकृत मोबाईल टावरचे काम एका खाजगी कंपनी मार्फत काम आज रोजी चालु आहे. या अगोदर वरील संदर्भीय पत्राअनुषंगने आम्ही वारंवार तक्रारी तोंडी व लेखी सुध्दा सांगीतले. तरी पण आज रोजी ग्राम पंचायत कार्यालय धन...
Samarasata Sahitya Sammelan ; समरसता साहित्य संमेलनाच्या साहित्य दिंडीने नांदेडकरांचे लक्ष वेधून घेतले

Samarasata Sahitya Sammelan ; समरसता साहित्य संमेलनाच्या साहित्य दिंडीने नांदेडकरांचे लक्ष वेधून घेतले

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड l विसाव्या समरसता साहित्य संमेलनाचा प्रारंभ शनिवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी नांदेड शहरातून काढण्यात आलेल्या भव्य साहित्य दिंडीने करण्यात आला. नांदेड शहरातील विविध शाळा, विशेषतः नाना पालकर प्राथमिक विद्यालय, राणी लक्ष्मीबाई हायस्कूल व ज्ञानभारती विद्यामंदिर शाळेच्या विद्यार्थिनींचे लेझीम पथक यामध्ये सहभागी झाले होते‌. विविध शाळांच्या मुलांनी समाज सुधारकांचे विविध देखावे सादर केले होते. तसेच वारकऱ्यांच्या वेषामधील विद्यार्थ्यांचे पथक ज्ञानोबा तुकाराम यांच्या अभंगाचा व समाजसुधारकांच्या वचनांचा जयघोष करत होते.ग्रंथदिंडी मधील चित्ररथामध्ये भारतमाता व संविधान ग्रंथ ठेवण्यात आला होता. तसेच ग्रंथाच्या पालखीमध्ये विविध समाजसुधारकांनी लिहिलेले ग्रंथ ठेवण्यात आले होते.जातिवंत लोककलावंत, भटक्या विमुक्त जमातीतील समाज बांधव, वासुदेव, गोंधळी, जोशी, मशान जोगी, मसनजोगी ,नाथ जोगी,बहुरूपी मदारी य...
Samarasata Sahitya : समरसता साहित्य संमेलनाला नांदेडमध्ये भव्य ग्रंथदिंडीने प्रारंभ

Samarasata Sahitya : समरसता साहित्य संमेलनाला नांदेडमध्ये भव्य ग्रंथदिंडीने प्रारंभ

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड, श्री गुरुगोविंदसिंघजी साहित्य नगरी‌ | समरसता हा जगण्याचा विषय असून साहित्यात समाजाचे प्रतिबिंब उमटत असते. परिवर्तनासाठी प्रवर्तन आवश्यक असते. समरसतेवर आधारित जीवनमूल्यांशी बांधिलकी मानणारे, समाजनिष्ठ साहित्य निर्मिती करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळेच भारत हे अधिक सुदृढ व शक्तिशाली राष्ट्र होऊ शकते. यासाठी व्यापक प्रमाणावर समाज प्रबोधन होणे ही काळाची गरज आहे. समरसता साहित्य संमेलनामधून सामाजिक समस्येसाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याचा अनुबंध निर्माण होईल असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री नामदेवराव कांबळे यांनी नांदेड येथील विसाव्या समरसता साहित्य संमेलनात व्यक्त केले. समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र यांच्या वतीने नांदेड येथे विसावे समरसता साहित्य संमेलनाला सकाळी आठ वाजता भव्य ग्रंथदिंडीने प्रारंभ झाला. यावेळी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त, ज्येष्ठ...
Shivendrasinghraje Bhosale : शहरातील रस्त्यांची कामे प्राधान्याने पूर्ण करा – सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

Shivendrasinghraje Bhosale : शहरातील रस्त्यांची कामे प्राधान्याने पूर्ण करा – सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| शहरातील रस्त्यांची कामे प्राधान्याने पूर्ण करताना मनपा व सार्वजनिक बांधकाम विभागांनी समन्वय ठेवून रस्त्यांची कामे पूर्णत्वास न्यावेत, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले. आज शासकीय विश्रामगृहातील बैठक कक्षात त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंडळांतर्गत विविध विकास कामांचा आढावा घेतला, यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. अजित गोपछडे, मपना आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधिक्षक अभियंता संभाजी धोत्रे, कार्यकारी अभियंता रामकृष्ण गळधर, परभणीचे कार्यकारी अभियंता प्रशांत कोरे, हिंगोलीचे कार्यकारी अभियंता दिंगाबर पोत्रे, भोकर कार्यकारी अभियंता विशाल चोपडे, देगलूरचे कार्यकारी अभियंता संदीप कोटलवार आदींची उपस्थिती होती. शहरातील रस्त्यांची कामे करताना नागरिकांना त्रास होता कामा नये, याची दक्षता घेव...
error: Content is protected !!