Thursday, May 21

महाराष्ट्र

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Vanchit : ओबीसी नेत्यांवर जीवघेणे हल्ले – वंचित बहुजन आघाडीचा इशारा हल्ले थांबवा, नाहीतर रस्त्यावर उतरणार!

Vanchit : ओबीसी नेत्यांवर जीवघेणे हल्ले – वंचित बहुजन आघाडीचा इशारा हल्ले थांबवा, नाहीतर रस्त्यावर उतरणार!

नांदेड, महाराष्ट्र
मुंबई /नांदेड| ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी झगडणाऱ्या नेत्यांवर मराठा समाजातील गुंड प्रवृत्तींकडून होत असलेले हल्ले आता असह्य झाले आहेत! प्रा. लक्ष्मण हाके, मा. नवनाथ आबा वाघमारे आणि कार्यकर्ते पवन करवर यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यांचा ओबीसी भटके विमुक्त महासंघ व वंचित बहुजन आघाडी यांच्याकडून तीव्र निषेध करण्यात आला आहे. २३ सप्टेंबर रोजी वाघमारे यांच्या घरासमोर उभी असलेली स्कार्पिओ गाडी पेटवली गेली, तर २७ सप्टेंबर रोजी प्रा. हाके यांच्यावर दहा-बारा गुंडांनी हल्ला करून गाडीची तोडफोड केली. या आधीही बीड जिल्ह्यातील गेवराई येथे हाके यांच्यावर हल्ला झाला होता. परभणी येथे कार्यकर्ते करवर यांच्यावर झालेल्या हल्ल्यात त्यांचा हात-पाय फ्रॅक्चर झाला आहे. ओबीसी भटके विमुक्त महासंघ व वंचित बहुजन आघाडी यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिलं आ...
Meeting of political party leaders : विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्ष प्रमुखांची बैठक

Meeting of political party leaders : विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्ष प्रमुखांची बैठक

नांदेड, छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र
छत्रपती संभजीनगर| 1 नोव्हेंबर, 2025 या अर्हता दिनांकावर आधारित पदवीधर मतदारसंघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम जाहिर झाला आहे. 2020 मध्ये झालेल्या निवडणूकीसाठी वापरण्यात आलेल्या मतदार यादीमध्ये नाव असलेल्या पदवीधरांना पुन्हा नव्याने नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. पात्र मतदारांनी मतदार यादीमध्ये नव्याने मतदार नोंदणी करावी, यादृष्टीने राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केले. विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणी कार्यक्रमाच्या संदर्भात मा.भारत निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधींसोबत आयोजित बैठकीत विभागीय आयुक्त श्री.पापळकर बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, अपर आयुक्त खुशालसिंह परदेशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके तसेच राजकीय पक्षांचे विभागातील प्रमुख, प्रत...
A helping hand for flood-affected Maharashtra : एक हात मदतीचा पूरग्रस्त महाराष्ट्रासाठी

A helping hand for flood-affected Maharashtra : एक हात मदतीचा पूरग्रस्त महाराष्ट्रासाठी

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| भारतातील शेती ही प्रामुख्याने पावसावर अवलंबून आहे. पावसाळा हा शेतकऱ्यांसाठी आशेचा ऋतू असतो, पण त्याच पावसाचे रौद्ररूप धरणीमाते वर संकट कोसळणे. राज्यात यावर्षी अनेक जिल्ह्यांमध्ये नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत, खेडी पाण्याखाली गेलीत, शेतमाल व जनावरांचे प्रचंड नुकसान झाले. या आपत्तीमुळे शेतकरी आणि त्यांची कुटुंबे मानसिक, आर्थिक व सामाजिक अडचणीत सापडली आहेत. पूरस्थितीत शेतकऱ्यांची स्थिती 1. शेतीचे नुकसान – पिके पाण्याखाली गेल्याने हंगामभराचे श्रम वाया गेलेत. 2. जनावरांचा बळी – गायी, म्हशी, बकऱ्या, बैल यांचे जीवित वाचवणे कठीण झालेले आहे. 3. घरांची पडझड – मातीची घरे, झोपड्या वाहून गेलीत, अनेक कुटुंब बेघर झालेत. 4. आरोग्य धोक्यात – पूरपाण्यामुळे, दूषित पाणी यामुळे साथीचे रोग पसरण्याची संभावना नाकारता येत नाही. 5. मानसिक ताण – उदरनिर्वाहाचे साधन नष्ट झाल्यामुळे शेतकरी नैराश...
Akhil Bharatiya Marathi Press Council ; अ. भा. मराठी पत्रकार परिषद यावर्षी पासून समाजसेवेसाठी पुरस्कार देणार

Akhil Bharatiya Marathi Press Council ; अ. भा. मराठी पत्रकार परिषद यावर्षी पासून समाजसेवेसाठी पुरस्कार देणार

मुंबई, महाराष्ट्र
मुंबई l अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने पत्रकारितेत देदीप्यमान कामगिरी करणारया पत्रकारांना विविध पुरस्कार देऊन दरवर्षी सन्मानित केले जाते.. यावर्षी पासून सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणारया व्यक्तींना "लोकनेते रामशेठ ठाकूर सामाजिक -शैक्षणिक सेवा गौरव" पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 51,111 रूपये रोख, मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप असेल.. रामशेठ ठाकूर यांनी परिषदेकडे ठेवलेल्या ठेवीतून हा पुरस्कार दिला जाणार असल्याची घोषणा परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख आणि अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाव्दारे केली आहे ..फेब्रुवारी 2026 मध्ये यंदाचे पुरस्कार दिले जातील. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेकडे विविध मान्यवरांनी ठेवलेल्या ठेवीच्या व्याजातून दरवर्षी 10 पत्रकारांचा गौरव केला जातो.. यामध्ये परिषद स्वतःच्या निध...
Omkant Chincholkar : नांदेड ग्रामीण पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांचा मोठा निर्णय!

Omkant Chincholkar : नांदेड ग्रामीण पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांचा मोठा निर्णय!

नांदेड, महाराष्ट्र
नवीन नांदेड| जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि ओल्या दुष्काळामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. पिकांचे, जनावरांचे, तसेच गृहउपयोगी वस्तूंचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर नांदेड ग्रामीण (सिडको) पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांनी आपला एक महिन्याचा पगार आपत्ती व्यवस्थापन फंडात जमा करून शेतकरी पुनर्वसनासाठी देण्याची विनंती पोलीस अधीक्षक नांदेड यांना केली आहे. विशेष म्हणजे चिंचोलकर हे स्वःत शेतकरी कुटुंबातील असून, त्यांचे मूळ गाव संगम चिंचोली (तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ) हे हदगाव सीमेवरती पेनगंगा नदीचे पलीकडे असून, हे देखील पुरग्रस्त बाधित झाले आहे. हदगाव येथे कार्यरत असताना त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांमधून मदतीचा आदर्श घालून दिला होता. चिंचोलकर यांनी म्हटले आहे की, "पोलीस प्रशासनात काम करत असलो तरी शेतकऱ्यांच्या संक...
Banjara community : बंजारा समाजाला एसटी मधून आरक्षण देण्यासाठी उद्या नांदेडमध्ये महाएल्गार महामोर्चा धडकणार

Banjara community : बंजारा समाजाला एसटी मधून आरक्षण देण्यासाठी उद्या नांदेडमध्ये महाएल्गार महामोर्चा धडकणार

नांदेड, महाराष्ट्र
10 हजार चारचाकी वाहन, 700 ट्रॅक्टर , ट्रॅक , आयचर, 50 हजार महिला सहभागी होणार, ठिकठिकाणी भोजन आणि पाण्याची व्यवस्था, 200 भजनी मंडळ, दहा रथांचाही सहभाग असणार नांदेड| हैदराबाद गॅझेटिअरनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी बंजारा समाजाचा महाएल्गार महामोर्चा उद्या दिनांक 29 सप्टेंबर रोजी नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. या मोर्चात मराठवाड्यासह विदर्भ , तेलंगणा, आंध्रप्रदेश , कर्नाटक राज्यातीला लाखो बंजारा बांधव सहभागी होतील अशी माहिती बंजारा समाज महाएल्गार मोर्चा संयोजन समितीचे डॉ. बि. डी. चव्हाण यांनी दिली आहे. बंजारा समाज एसटी आरक्षण महाएल्गार मोर्चा दिनांक 29 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला असून या मोर्चाची जय्यत तयारी करण्यात आली आहे . सकाळी 11 वाजता मार्केट कमिटी नवा मोंढा मैदान येथून या मोर्चाला सुरुवात होणार असून अण्णाभाऊ साठे चौक,...
Red alert : नांदेडमध्ये पुराचा गंभीर धोका; विष्णुपुरी धरणातून विसर्ग वाढणार

Red alert : नांदेडमध्ये पुराचा गंभीर धोका; विष्णुपुरी धरणातून विसर्ग वाढणार

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड | हवामान खाते मे नांदेड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला आहे. नांदेडमध्ये पुराचा गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता वाढली असून, विष्णुपुरी धरणातून विसर्ग वाढणार असल्याचे सांगितलं जात आहे. या संदर्भात दि. 27 सप्टेंबर 2025, रात्री 9 वाजता प्रकल्प विभागाकडून हि माहिती देण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी प्रकल्पात सध्या प्रचंड प्रमाणात आवक सुरू असून, पुरस्थिती अधिक गंभीर झाली आहे. धरणातून 2.76 लाख क्युसेक विसर्ग सोडला जात आहे. पुढील काही तासांत तो वाढवून 3.00 ते 3.25 लाख क्युसेक करण्याची शक्यता आहे. सध्या नांदेड शहरालगत नदीची पातळी 352.94 मीटर वर पोहोचली असून ती आज मध्यरात्री ते पहाटे दरम्यान धोका पातळी 354.00 मीटर गाठण्याचा अंदाज आहे. 🔹 जायकवाडी धरणातून विसर्ग : 66,024 क्युसेक 🔹 माजलगाव धरणातून विसर्ग : 95,433 क्युसेक 🔹 दिग्रस बंधारा : >2.50 लाख क्युसेक 🔹 पूर्णा...
BSNL’s ‘4G’ service : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बीएसएनएलच्या स्वदेशी निर्मित ‘४जी’ सेवेचे लोकार्पण

BSNL’s ‘4G’ service : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बीएसएनएलच्या स्वदेशी निर्मित ‘४जी’ सेवेचे लोकार्पण

नांदेड, पुणे, महाराष्ट्र, मुंबई
 राज्यात नवीन 9 हजार 30 '४जी’ टॉवर्सच्या माध्यमातून लाखो लोकांना मिळणार सेवा स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित ४जी विकसित करणारा जगातला भारत पाचवा देश पुणे| प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या  '४जी' तंत्रज्ञानाधारित सेवेचे लोकार्पण झारसुगुडा ओडिशा येथून दूरदृष्य प्रणालीद्वारे झाले. याअंतर्गत बीएसएनएलच्या 92 हजार 633 टॉवर्सचे लोकार्पण झाले असून, यापैकी 9 हजार 30 टॉवर्स महाराष्ट्रात उभारले गेले आहेत. या माध्यमातून देशातील तसेच राज्यातील लाखो लोकांपर्यंत '४जी' तंत्रज्ञान पोहोचणार असून महाराष्ट्र शासनाच्या अकराशे ऑनलाईन सेवा गावागावात पोहोचण्यात या कनेक्टिव्हिटीचा फायदा होणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते '4G' नेटवर्कच्या दूरदृष्य प्रणालीद्वारे लोकार्पणानिमित्त साहित्यरत्न...
Nanded Rain : नदीकाठच्या सखोल भागातील लोकांना, जनावरांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या सूचना

Nanded Rain : नदीकाठच्या सखोल भागातील लोकांना, जनावरांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या सूचना

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| नांदेड जिल्ह्यात शुक्रवार २६ सप्टेंबर २०२५ रोजी नांदेड तालुक्यातील ५, बिलोली तालुक्यातील ३, मुखेड तालुक्यातील ५, कंधार तालुक्यातील ४, लोहा तालुक्यातील ५, मुदखेड तालुक्यातील २, नायगाव तालुक्यातील १ अशा एकूण २५ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे. नदीकाठच्या सखोल भागातील लोकांना व जनावरांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरितकरण्याच्या सूचना मनपा नांदेड तसेच सर्व संबंधित तहसिलदार यांना दिलेल्या आहेत, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली आहे. नांदेड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट असल्याने अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे विष्णुपुरी प्रकल्पामध्ये सध्या १६०००० लक्ष क्युसेक्सची आवक सुरू असून पुढील ६-७ तासात आवक ३ लक्ष पर्यंत जाण्याचा अंदाज आहे. सध्या विष्णुपुरी धरणातून १६०००० क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे व येत्या ५-६ तासात विसर्ग वाढ...
The sky burst in Kandhar taluka! कंधार तालुक्यात आभाळ फाटले ! अनेक गावांचा संपर्क तुटला : चार गावांना पुराचा वेढा

The sky burst in Kandhar taluka! कंधार तालुक्यात आभाळ फाटले ! अनेक गावांचा संपर्क तुटला : चार गावांना पुराचा वेढा

नांदेड, महाराष्ट्र
कंधार (सचिन मोरे) शुक्रवारी सायंकाळी सातच्या आसपास कंधार तालुक्यामध्ये अक्षरशः आभाळ फाटल्यागत मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. शहरातील जगतुंग समुद्राने धोक्याची पातळी गाठली असून पावसामुळे पन्नासच्या आसपास गवांचा संपर्क तुटला आहे. पुराच्या पाण्याने चार गावे वेढल्या गेली आहेत. तर शेकडो जनावरे वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दोन दिवसापासून तालुक्यातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले असून शेतीचे कोट्यावधी रुपयाचे नुकसान झाले आहे. या प्रचंड पावसामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.   २७ व २८ ऑगस्ट रोजी पावसाने रौद्ररूप धारण करून तालुक्यातील हजारो हेक्टर शेती उद्ध्वस्त केली होती. पुरामुळे शेकडो जनावरे मृत्युमुखी पडली होती. मोठ्याप्रमाणात घरे पडली होती. भिंत कोसळून चार ते पाच जणांना जीव गमवावा लागला होता. ती परिस्थिती पूर्वपदावर येत असताना शुक्रवारी रात्री पावसाने पुन्ह...
error: Content is protected !!