Sunday, July 5

महाराष्ट्र

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

By opening 14 gates : दिग्रस बंधाऱ्याचे 14 गेट उघडून तर विष्णुपुरी चे 14 गेट उघडून गोदावरी नदी पात्रात विसर्ग -NNL

By opening 14 gates : दिग्रस बंधाऱ्याचे 14 गेट उघडून तर विष्णुपुरी चे 14 गेट उघडून गोदावरी नदी पात्रात विसर्ग -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| जिल्ह्यात दोन दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे तसेच परभणी हिंगोली या जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पडत असल्याने नांदेड जिल्ह्यातील पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने जन जीवन विस्कळीत झाले आहे. वरच्या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील दिग्रस बंधाऱ्याची 14 पैकी 14 गेट संपूर्ण गेट उघडून पाण्याचा विसर्ग चार लाख 31 हजार क्युसेस गोदावरी पात्रात केला जात आहे. त्यामुळे अंतेश्वर बंधाऱ्याचे यापूर्वीच गेट उघडण्यात आले आहे. त्यामुळे या भागात व गोदावरी काठी मोठ्या प्रमाणात शेतात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. गोदावरी दुथडी भरून वाहत असल्याने शेतकऱ्यांनी आपली जनावरे नदीपासून दूर अंतरावर नेऊन व्यवस्थित ठिकाणी हलविले असून, जायकवाडी प्रकल्पात 90% च्या वर पाणी पातळी झाली. कोणत्याही क्षणी जायकवाडीचे सुद्धा पाणी येऊ शकते त्यामुळे न...
guardian minister Girish Mahajan ; अतिवृष्टीचे पंचनामे तात्काळ करा ; पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रशासनास सूचना – NNL

guardian minister Girish Mahajan ; अतिवृष्टीचे पंचनामे तात्काळ करा ; पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रशासनास सूचना – NNL

कृषी, नांदेड, महाराष्ट्र
नांदेड | नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या 48 तासात जिल्ह्यात सर्व दूर अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीमुळे शेती, पशुधन, घरे व अन्य मालमत्तेच्या झालेल्या नुकसानाकडे शासनाचे लक्ष असून पाऊस थांबताच पंचनामे करण्यात यावे, असे आदेश राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज  दिले आहे. नांदेड मधील अतिवृष्टीच्या संदर्भात आज पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त व जिल्हा पोलीस अधीक्षकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. जिल्ह्यातील सद्यस्थितीचा आढावा घेतला. जिल्हयातील 93 मंडळापैकी 65 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे उभ्या पिकाचे नुकसान झाले आहे. तसेच प्राथमिक माहितीनुसार अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली असून पशुधनाचे देखील नुकसान झाले आहे. सध्या पाऊस सुरू आहे.मात्र पाऊस थांबल्यानंतर प्रशासनाने तातडीने पंचनामे सुरू करावे असे त्यांनी निर्देश दिले आहे. महानगर...
Isapur dam ; इसापूर धरण सांडव्याची सर्व वक्रद्वारे बंद नागरिकांनीअफवांवर विश्वास ठेऊ नये – NNL

Isapur dam ; इसापूर धरण सांडव्याची सर्व वक्रद्वारे बंद नागरिकांनीअफवांवर विश्वास ठेऊ नये – NNL

हिंगोली, नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| इसापुर धरणाच्या मंजुर जलाशय प्रचालन आराखड्यानुसार (आरओएस) 1 ते 15 सप्टेंबर या कालावधी मध्ये 75 टक्के विश्वास अहर्तेनुसार इसापुर धरणाची पाणी पतळी 440.74 मी. इतकी ठेवावयाची आहे. आज 2 सप्टेंबर 2024 रोजी सायं 4 वा. इसापुर धरणाची पाणी पातळी 439.40 मी. इतकी असुन उपयुक्त पाणी साठा 816.75 दलघमी (84.72 टक्के) इतका आहे. सद्यस्थितीत इसापुर धरणामध्ये येणारा पाण्याचा येवा कमी होत आहे व इसापुर धरणाची सर्व वक्रद्वारे बंद आहेत. इसापुर धरणाच्या खालील बाजुस काल 1 सप्टेंबर रोजी अतिवृष्टी झाली असुन त्यामुळे पेनगंगा व कयाधु नदीला पूर आला आहे. आज 2 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता राष्ट्रीय महामार्ग क्रंमाक 361 हदगाव-उमरखेड रोड वरील मार्लेगाव पुलावरुन पाणी जाण्यास सुरुवात झाली असून नदीने धोकापातळी ओलांडली आहे. सदरची पूरस्थिती ही इसापूर धरणाच्या खालील बाजुस झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली आहे. सद्यस्...
11 gates of Nanded’s Vishnupuri Dam opened : नांदेडच्या विष्णूपुरी धरणाचे 11 गेट उघडले; नागरिकांना सतर्कतेचा इशारा -NNL

11 gates of Nanded’s Vishnupuri Dam opened : नांदेडच्या विष्णूपुरी धरणाचे 11 गेट उघडले; नागरिकांना सतर्कतेचा इशारा -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| जिल्ह्यात व विविध प्रकल्पाच्या कॅचमेंट एरियामध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे विष्णुपुरी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाढला आहे. दिग्रस बंधाऱ्याचे ४ दारे उघडली आहे. याशिवाय सिध्देश्वर धरणातूनही मोठया प्रमाणात पाणी सोडले जात आहे. त्यामुळे नांदेडच्या विष्णूपुरी धरणाचे 11 गेट उघडले असून, नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार नांदेड येथील विष्णुपुरी धरणाचे दहा दरवाजे उघडण्यात आले आहे. पाण्याचा प्रवाह असाच कायम राहिल्यास आणखी काही गेट उघडले जाऊ शकतात. त्यामुळे नदीपात्राशेजारी राहणाऱ्या नागरिकांनी सावध राहावे, पूर परिस्थितीतील आवश्यक काळजी घ्यावी ,असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. विष्णुपुरी प्रकल्पच्या11 दरवाज्यातून विसर्ग सोडण्यात आल्यानंतर गोवर्धन घाटातील शमशानभूमीवर पर्यंत पाणी आले असून,आणखी...
Panganga river near Himayatnagar flooded : हिमायतनगर नजीकच्या पैनगंगा नदीला आलाय महापूर; नदीकाठची हजारों हेक्टर जमीन पाण्याखाली – -NNL

Panganga river near Himayatnagar flooded : हिमायतनगर नजीकच्या पैनगंगा नदीला आलाय महापूर; नदीकाठची हजारों हेक्टर जमीन पाण्याखाली – -NNL

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर, अनिल मादसवार| विदर्भ उमरखेड - आणि मराठवाडयाच्या नांदेड जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणारी पैनगंगा नदी दोन दिवसापासून सतत चालू असलेल्या अतिवृष्टी मुसळधार पावसामुळे दुथडी भरून वाहत आहेत. बोरीच्या पुलाला लागून पाणी वाहत असून, गंजेगाव पुलावरून पाणी वाहू लागल्यामुळे कालपासून विदर्भ - मराठवाडयांचा संपर्क तुटल्याने दळणवळन वाहतुक ठप्प झाली आहे. हिमायतनगर पळसपुर मार्ग ढाणकी मधील पैनगंगा नदीवर असलेल्या गांजेगाव पुलावर पावसाळ्यात नेहमीच पाणी येत असल्याने या पुलाची उंची वाढवावी अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. मात्र याकडे संबंधित विभागाचे सपशेल दुर्लक्ष होत असल्याचे आरोप नदीकाठचे नागरिक करत आहेत. मागील अनेक वर्षांपासून खरीप हंगामात होणाऱ्या अतिवृष्टीच्या पावसाने नदी-नाले तुडुंब भरून वाहातात. त्यातच पैनगंगा नदीत ईसापुर धरणाचे पाणी सोडण्यात येते तर कयाधू नदीचा पुरही पैनगंगेत येऊन मि...
Heavy rains in Nanded district : नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचा इशारा; १२ जनावरांचा मृत्यू ; २५ घरांची पडझड -NNL

Heavy rains in Nanded district : नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचा इशारा; १२ जनावरांचा मृत्यू ; २५ घरांची पडझड -NNL

नांदेड, महाराष्ट्र, व्हिडीओ
नांदेड, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या ३६ तासांमध्ये पावसाचा जोर कायम असून अजूनही पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील २६ मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून जिल्ह्यातील सर्व प्रकल्पातून पाणी सोडले जात आहे. नदी नाले ओसंडून वाहत असून नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिला आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीमध्ये १२ जनावरे मृत्युमुखी पडली असून २१ घरांची अंशतः पडझड झाली आहे. आपत्ती व्यवस्थापन ,कृषी,पाटबंधारे, महसूल व पोलीस विभाग स्थितीवर लक्ष ठेवून असून ज्या ठिकाणी मदतीची आवश्यकता आहे. त्या ठिकाणी आवश्यक साधनसामुग्रीसह तैणात राहण्याची सूचना बचाव पथकांना केली आहे. एनडीआरएफचे पथक तैणात असून कोणत्याही आपत्कालीन स्थितीमध्ये नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान महसूल विभागाच्या सतर्कतेने मुदखेड तालुक्यात पुलाव अडकलेल्या नागरिकाची सुटका करण्यात आली आहे. ...
Heavy rains in Nanded district; Warning to citizens : नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचा इशारा -NNL

Heavy rains in Nanded district; Warning to citizens : नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचा इशारा -NNL

नांदेड, महाराष्ट्र, व्हिडीओ
नांदेड, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील 26 मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिला आहे. आपत्ती व्यवस्थापन विभाग स्थितीवर लक्ष ठेवून असून ज्या ठिकाणी मदतीची आवश्यकता आहे. त्या ठिकाणी आवश्यक साधनसामुग्रीसह तैणात राहण्याची सूचना बचाव पथकांना केली आहे. नांदेड जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे अतिवृष्टी संदर्भात आवाहन : पाऊस थांबताच नुकसानाचे पंचनामे होतील. नागरिकांनी सतर्क असावे. पुलावरून पाणी वाहत असताना रस्ते ओलांडू नये. धोकादायक ठिकाणी जाऊ नये. जिल्हा प्रशासनाचे नुकसाना संदर्भात लक्ष असून सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे स्पष्ट केले. काल सकाळी दहा वाजता पासून रविवारी दहा वाजेपर्यंत जिल्ह्यातील 63 मंडळांपैकी 26 मंडळांमध्ये 65 मिली लिटर पेक्षा अधिक पाऊस झाल...
The Sahastrakund scenic waterfall : तरुणाईला आकर्षित करणारा सहस्त्रकुंड निसर्गरम्य धबधबा ओसंडून वाहू लागला -NNL

The Sahastrakund scenic waterfall : तरुणाईला आकर्षित करणारा सहस्त्रकुंड निसर्गरम्य धबधबा ओसंडून वाहू लागला -NNL

नांदेड, देश विदेश, महाराष्ट्र, व्हिडीओ, हिंगोली
किनवट, परमेश्वर पेशवे| मराठवाड्यातील निसर्गाच्या सानिध्यात असलेले एकमेव पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाणारे सहस्रकुंड धबधब्याची ओळख असून नांदेड जिल्हातील किनवट तालुक्याच्या निसर्गाच्या कुशीत उदयास आलेलं इस्लापूर गावापासून अगदी चार किलोमिटर अंतरावर असलेला सहस्त्रकुंडचा धबधबा काल संध्याकाळ पासून सतत झालेल्या पावसामुळे ओसंडून वाहत असताना पाहाव्यास मिळत आहे. या निसर्गकारी, रोमांचकारी अनुभूतीमुळे तरुणाईचे आकर्षण वाढले आहे, अनेक पर्यटक सहस्त्रकुंडचा अद् भूत नजारा पाहण्यासाठी सहस्त्रकुंडकडे धाव घेवू लागले. नांदेड जिल्हयात काल संध्याकाळपासून सतत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. या पावसामुळे नदी - नाले ओसडून वाहत आहेत सहस्त्रकुंड धबधब्यातही मोठे पाणी आले असल्याने हा धबधबा अगदी खळवळून मोठया दिमाखाने ओसांडून वाहतो आहे. हे निसर्गरम्य दृश्य पाहण्यासाठी विदर्भ आणि आंध्र प्रदेशातील पर्यटक येथे ...
Mahur heavy rain ; माहूर तालुक्यात पावसाचा हाहाकार! घरे,रस्ता पाण्याखाली; गोर गरीबांचा संसार उघड्यावर -NNL

Mahur heavy rain ; माहूर तालुक्यात पावसाचा हाहाकार! घरे,रस्ता पाण्याखाली; गोर गरीबांचा संसार उघड्यावर -NNL

नांदेड, महाराष्ट्र
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। माहूर तालुक्यात पावसाने हाहाकार उडाला आहे. काल रात्र ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने पैनगंगा नंदी दुथडी वाहत असल्याने वाहतूक सेवा बंद केली त्याच बरोबर नदी पाञातील पाणी अनेक गावात शेतात शिरले आहे.तर तालुक्यातील गाव खेड्यालगत असलेल्या नाल्याचे पाणी अनेक शेतता व घरात शिरल्याने अनेकांच्या संसारउपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे. जोरदार झालेल्या पावसाने ग्रामिण गावातील विद्युत पुरवठा सुद्धा खंडित झाला आहे. माहूर तालुक्यात झालेल्या पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे.तालुक्यातील अनेक महत्वाची गावे पाण्याखाली गेली आहेत.तर वाई बाजार,उमरा, हरडप,अंजनखेड,नायकवाडीसह अनेक गावखेड्या मध्ये लोकाचं जनजीवन विस्कळीत झालं आहे.तर वाई बाजार येथील नाल्याकाटच्या घरात व दुकानात पाणी शिरल्याने या पावसाचा मोठा फटका बसला आहे.येथील फुकट न...
Himayatnagar heavy rains ; हिमायतनगर शहर परिसरात रात्रभर झाला दमदार पाऊस; पहिल्याच मोठया पावसात जिकडे तिकडे पाणीच पाणी -NNL

Himayatnagar heavy rains ; हिमायतनगर शहर परिसरात रात्रभर झाला दमदार पाऊस; पहिल्याच मोठया पावसात जिकडे तिकडे पाणीच पाणी -NNL

नांदेड, महाराष्ट्र, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार। गेल्या दोन महिन्यापासून मोठया पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या हिमायतनगर शहर व तालुका वासीयांना शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. दरम्यान रविवारी सकाळी 5 ते 7 च्या दरम्यान दमदार पावसामुळे शहरातील 4, 16, 1, 7, 13, 2 सह अनेक प्रभागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते. पावसाचे पाणी घरात शिरल्यामुळे नगरपंचायतीच्या ढिसाळ नियोजनाचे प्रचिती नागरिकांना आली असून, गुडघाभर पाणी घरात असल्याने अनेक गोरगरीब नागरिकांना रात्र जागून काढावी लागली आहे. त्यामुळे नागरिकांनी नगरपंचायत प्रशासनाच्या नाकर्तेपणा बाबत संताप व्यक्त केला आहे. तालुक्यातील अनेक गावच्या नाल्यावरून पाणी वाहू लागल्या ने काही तास संपर्क तुटला होता. दरवर्षीप्रमाणे यंदा नगरपंचायत प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी नाल्याची साफसफाई केली नसल्यामुळे शनिवार 31 ऑगस्ट च्या रात्री उशिरा झालेल्...
error: Content is protected !!