Wednesday, May 20

महाराष्ट्र

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Drain construction : राष्ट्रीय महामार्गावरील नाली बांधकामाचा बोजवारा; हिमायतनगरात आंधळ्या कारभाराचा कळस

Drain construction : राष्ट्रीय महामार्गावरील नाली बांधकामाचा बोजवारा; हिमायतनगरात आंधळ्या कारभाराचा कळस

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर, अनिल मादसवार | शहर परिसरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील नाली बांधकाम हे पूर्णपणे आंधळ्या व मनमानी कारभाराचे उदाहरण ठरत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूच्या नाल्यांचे काम सुरू असले तरी नालीत पाणी जाण्याची कोणतीही योग्य व्यवस्था करण्यात आलेली नाही, त्यामुळे या तथाकथित विकासकामावर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. धनोरा ते भोकर या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असून करण्यात आलेल्या रस्त्याला मोठमोठे तळे गेले आहेत. पण तू अजूनही बहुतांश ठिकाणी काम अर्धवट असून हिमायतनगर शहरातून जाणाऱ्या सिमेंट काँक्रीटच्या दोन्ही बाजूने नाल्या केले नसल्याने मागील अनेक वर्षात पावसाळ्यात नागरिकांच्या घरात पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नाल्याचे काम करण्यात यावे अशी वारंवार मागणी केल्यानंतर गेल्या महिन्याभरापासून कामा...
Deputy Chief Minister Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राची अपरिमित हानी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि लोकसभेकडून भावपूर्ण श्रद्धांजली

Deputy Chief Minister Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राची अपरिमित हानी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि लोकसभेकडून भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई, देश विदेश, महाराष्ट्र
नवी दिल्ली| महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या निधनाबद्दल आज देशाच्या राजकीय वर्तुळातून तीव्र शोक व्यक्त करण्यात आला. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पवार यांच्या प्रदीर्घ सार्वजनिक कार्याचा गौरव करत त्यांना आदरांजली वाहिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची शोकसंवेदना - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, 'बारामती येथील विमान दुर्घटनेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्याचे वृत्त अत्यंत क्लेशदायक आहे. त्यांचे अकाली जाणे हे राज्याच्या विकासासाठी नुकसानकारक आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीत, विशेषतः सहकारी क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान ऐतिहासिक आहे. ' पंतप्रधान नरेंद्र मोदींची श्रद्धांजली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  आपल्या संदेशात अजित ...
Ajit Pawar : राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन

Ajit Pawar : राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन

महाराष्ट्र, पुणे, मुंबई
बारामती| राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी केंद्रीय नागरी विमानवाहतूक मंत्री राममोहन नायडू किंजारापू, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, शिक्षणमंत्री दादाजी भुसे, महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे, बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, दिवंगत अजित पवार यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, आमदार राहूल कुल, ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार आदी उपस्थित होते....
Deputy Chief Minister Ajit Pawar : “महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुर्दैवी विमान अपघातात मृत्यू”

Deputy Chief Minister Ajit Pawar : “महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुर्दैवी विमान अपघातात मृत्यू”

पुणे, महाराष्ट्र
मुंबई| महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (वय ६६) यांचे निधन झाले आहे. बुधवारी सकाळी बारामती येथे त्यांच्या विमानाचा अपघात झाला. बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक वृत्त आहे. या विमानात अजित पवार यांच्यासोबत त्यांचे वैयक्तिक सहाय्यक, सुरक्षा कर्मचारी तसेच विमानातील कर्मचारी उपस्थित होते. या घटनेत त्यांचाही मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. अजित पवार हे पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित जाहीर सभेला संबोधित करण्यासाठी बारामतीकडे जात होते. महाराष्ट्र हवाई वाहतूक विभागातील सूत्रांनुसार, विमान लँडिंगसाठी बारामती विमानतळाजवळ येत असताना दृश्यमानतेत अडथळे निर्माण झाले होते. प्राथमिक माहितीनुसार, पहिला लँडिंगचा प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर धावपट्टी क्रमांक ११ वर उतरण्याचा दुसरा प्रयत्न करण्यात आला. याच दरम्यान विमानाचा अपघात झाला. घटनेच्या वेळ...
Nanded Police : राज्यात प्रथम! ‘150 दिवसांचे ई-गव्हर्नन्स सुधारणा अभियान’ नांदेड पोलिसांनी यशस्वी करून दाखवले

Nanded Police : राज्यात प्रथम! ‘150 दिवसांचे ई-गव्हर्नन्स सुधारणा अभियान’ नांदेड पोलिसांनी यशस्वी करून दाखवले

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड (अनिल मादसवार) महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार राबविण्यात आलेल्या 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात नांदेड पोलीस परिक्षेत्राने राज्यात प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. संपूर्ण राज्यातील सर्व पोलीस परिक्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कार्य करत नांदेड पोलिसांनी प्रशासनात तंत्रज्ञानाधारित पारदर्शकतेचा आदर्श निर्माण केला आहे. या अभियानाचा कालावधी 01 ऑगस्ट 2025 ते 10 जानेवारी 2026 असा होता. नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि त्वरित सेवा देण्याच्या उद्देशाने ई-ऑफिस प्रणाली, ऑनलाईन सेवा, सोशल मीडिया संवाद, तक्रार निवारण, माहिती अधिकार आणि अंतर्गत प्रशासकीय प्रक्रिया अधिक प्रभावीपणे राबविण्यात आल्या. AI तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर या अभियानात AI आधारित संगणकीय प्रणाली विकसित करून अर्ज छाननी, प्रकरणांचे विश्लेषण आणि कामकाजातील ...
Chief Minister Samriddh Panchayat Raj Abhiyaan : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान यशस्वी करण्यासाठी लोकसहभागच किल्ली – पालकमंत्री अतुल सावे

Chief Minister Samriddh Panchayat Raj Abhiyaan : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान यशस्वी करण्यासाठी लोकसहभागच किल्ली – पालकमंत्री अतुल सावे

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड, अनिल मादसवार| गावांचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास साधण्यासाठी राबविण्यात येत असलेले मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे केवळ शासकीय उपक्रम नसून लोकसहभागातून उभे राहणारे परिवर्तनाचे आंदोलन आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री अतुल सावे यांनी केले. जिल्हा परिषद नांदेड येथील नूतनीकृत कॉन्फरन्स हॉलचे उद्घाटन पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते आज संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार राजेश पवार, आमदार आनंदराव बोंढारकर, तसेच जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री अतुल सावे म्हणाले की, नांदेड जिल्हा प...
starvation to death : गावाच्या न्यायासाठी सूरज बोने यांनी सुरु केलं प्रजासत्ताक दिनापासून आमरण उपोषण

starvation to death : गावाच्या न्यायासाठी सूरज बोने यांनी सुरु केलं प्रजासत्ताक दिनापासून आमरण उपोषण

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर,अनिल मादसवार| गावाच्या विकासात झालेल्या कथित अनियमितता, अपूर्ण व चुकीच्या पद्धतीने झालेल्या कामांची चौकशी व्हावी, या मागणीसाठी मौजे पारवा मोरगाव येथील सूरज बबनराव बोने यांनी आज दिनांक 26 जानेवारीपासून हिमायतनगर तहसील पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. पत्रकारांशी बोलताना सूरज बोने यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “हा लढा कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून, गावाच्या विकासासाठी, न्यायासाठी आणि पारदर्शकतेसाठी आहे. गावातील जनतेचे पैसे व हक्क वाचवण्यासाठी हा टोकाचा निर्णय घ्यावा लागला.” मौजे पारवा मोरगाव येथे 2020 ते 2026 या कालावधीत विविध विकासकामे झाली, मात्र त्यातील अनेक कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत, काही कामे निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप आहे, तर काही कामांमध्ये कागदोपत्री पूर्ण झाल्याचे दाखवण्यात आले, पण प्रत्यक्षात तसे नसल्याने विकासकामांवर संशय आहे. ...
Atul save : नांदेडकरांना दिलासा! शासकीय रुग्णालयात अत्याधुनिक सिटीस्कॅन–एमआरआय सेवा सुरू

Atul save : नांदेडकरांना दिलासा! शासकीय रुग्णालयात अत्याधुनिक सिटीस्कॅन–एमआरआय सेवा सुरू

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड | नांदेड जिल्ह्यातील सर्वसामान्य व गोरगरीब रुग्णांसाठी आरोग्य सेवेत मोठा दिलासा देणारा टप्पा आज गाठण्यात आला. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पीपीपी (PPP) तत्त्वावर अत्याधुनिक सिटीस्कॅन व एमआरआय सेवा सुरू करण्यात आली असून, या सेवेचे लोकार्पण राज्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी करण्यात आले. यावेळी बोलताना पालकमंत्री अतुल सावे म्हणाले, “या सुविधेमुळे नांदेड जिल्ह्यातील गरीब, गरजू व सामान्य रुग्णांना आता खासगी रुग्णालयांकडे धाव घ्यावी लागणार नाही, माफक दरात आणि दर्जेदार तपासणी शासकीय रुग्णालयातच उपलब्ध होईल.” आरोग्य सेवेत ऐतिहासिक पाऊल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात पीपीपी तत्त्वावर नऊ ठिकाणी सिटीस्कॅन व एमआरआय सुविधा सुरू करण्यात येत असून, नांदेडला प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल पालकमंत्र्यांनी समाधान व...
Atul save : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध : पालकमंत्री अतुल सावे

Atul save : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध : पालकमंत्री अतुल सावे

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड | नांदेड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध असून, नागरिकांच्या हिताच्या विविध विकासकामांना प्राधान्य दिले जाईल, असा ठाम विश्वास राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला. भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त वजिराबाद येथील पोलीस कवायत मैदानावर आयोजित मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सकाळी ९.१५ वाजता झेंडावंदन सोहळा पार पडला. 🇮🇳 देशभक्तीपर वातावरणात कवायती व संचलन यावेळी देशभक्तीपर गीतावर शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या शिस्तबद्ध कवायतींनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. पोलीस, सीआरपीएफ, दंगा नियंत्रण पथक, महिला पथक, गृहरक्षक दल, एनसीसी, स्काऊट-गाईड, डॉग स्क्वॉड, बॉम्ब शोधक पथक, अग्निशमन दल, रुग्णवाहिका आ...
Rupali Kadam awarded : महाराष्ट्राच्या रूपाली कदम यांना ‘जीवन रक्षा पदक’ जाहीर

Rupali Kadam awarded : महाराष्ट्राच्या रूपाली कदम यांना ‘जीवन रक्षा पदक’ जाहीर

नांदेड, महाराष्ट्र
नवी दिल्ली| प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सन 2025 साठीच्या जीवन रक्षा पदक पुरस्कारांची घोषणा केली. या प्रतिष्ठित सन्मानासाठी महाराष्ट्रातील श्रीमती रूपाली प्रतापराव कदम यांची निवड करण्यात आली असून, त्यांच्या असामान्य शौर्य व धैर्यपूर्ण कर्तृत्वाची दखल घेत त्यांना ‘जीवन रक्षा पदक’ जाहीर करण्यात आले आहे. जीवन धोक्यात असतानाही दुसऱ्यांचे प्राण वाचवण्यासाठी दाखविलेल्या अदम्य धैर्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. रूपाली कदम यांच्या या कार्यामुळे महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. यंदा देशभरातून एकूण 30 जणांना जीवन रक्षा पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये 6 ‘सर्वोत्तम जीवन रक्षा पदक’ (मरणोत्तर), 6 ‘उत्तम जीवन रक्षा पदक’, तर 18 जणांना ‘जीवन रक्षा पदक’ जाहीर झाले आहे. रूपाली कदम यांची निवड ही समाजातील धाडसी व्यक्तींसाठी प्रेरणादायी ठरणारी ...
error: Content is protected !!