MP Nagesh Patil : हिंगोली–नांदेड–यवतमाळ जिल्ह्यात ओला दुष्काळ: खासदार नागेश पाटील मागणी करतात शेतकऱ्यांसाठी ५०,००० रुपये मदत
हिंगोली, नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे पिके नष्ट; खासदार नागेश पाटील यांनी तातडीने आर्थिक मदत, पीकविमा दावे मंजूर करण्यास आणि बँक वसुली थांबवण्याची मागणी केली.
हिंगोली/नांदेड, अनिल मादसवार| हिंगोली, नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी मुसळधार पावसामुळे मोठ्या संकटात आले आहेत. हदगांव, हिमायतनगर, किनवट, माहूर, उमरखेड आणि महागांव तालुक्यांतील हजारो हेक्टर शेती नुकसानग्रस्त झाली असून अनेक घरं व ओढ्यालगत भागांवर पुराचा फटका बसला आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिके पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत, माती वाहून गेली आहे आणि काही भागांत पिकांचे नुकसान अत्यंत गंभीर झाले आहे. पंचनामे वेळेत न होणे आणि नुकसानाचे वास्तविक मूल्यांकन योग्य प्रकारे न होणे यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे.
यावर प्रतिक्रिया देत, खासदार नागेश पाटील...









