Thursday, May 14

हिंगोली

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

MP Nagesh Patil : हिंगोली–नांदेड–यवतमाळ जिल्ह्यात ओला दुष्काळ: खासदार नागेश पाटील मागणी करतात शेतकऱ्यांसाठी ५०,००० रुपये मदत

MP Nagesh Patil : हिंगोली–नांदेड–यवतमाळ जिल्ह्यात ओला दुष्काळ: खासदार नागेश पाटील मागणी करतात शेतकऱ्यांसाठी ५०,००० रुपये मदत

नांदेड, यवतमाळ, राजकीय, हिंगोली
हिंगोली, नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे पिके नष्ट; खासदार नागेश पाटील यांनी तातडीने आर्थिक मदत, पीकविमा दावे मंजूर करण्यास आणि बँक वसुली थांबवण्याची मागणी केली.   हिंगोली/नांदेड, अनिल मादसवार| हिंगोली, नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी मुसळधार पावसामुळे मोठ्या संकटात आले आहेत. हदगांव, हिमायतनगर, किनवट, माहूर, उमरखेड आणि महागांव तालुक्यांतील हजारो हेक्टर शेती नुकसानग्रस्त झाली असून अनेक घरं व ओढ्यालगत भागांवर पुराचा फटका बसला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिके पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत, माती वाहून गेली आहे आणि काही भागांत पिकांचे नुकसान अत्यंत गंभीर झाले आहे. पंचनामे वेळेत न होणे आणि नुकसानाचे वास्तविक मूल्यांकन योग्य प्रकारे न होणे यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे. यावर प्रतिक्रिया देत, खासदार नागेश पाटील...
Sushma patil passes away : खा. नागेश पाटील आष्टीकर यांच्या पत्नी सुषमा पाटील यांचे निधन

Sushma patil passes away : खा. नागेश पाटील आष्टीकर यांच्या पत्नी सुषमा पाटील यांचे निधन

नांदेड, लाइफस्टाइल, हिंगोली
नांदेड/हिंगोली | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या पत्नी सौ. सुषमा पाटील (वय 51) यांचे बुधवारी (दि. 10 सप्टेंबर) मुंबईतील जसलोक रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. गेल्या वर्षभरापासून त्या आजारी होत्या. तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपचारानंतरही त्यांची प्रकृती सुधारली नाही आणि उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर आष्टी येथे दि. 11 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पती, मुलगा कृष्णा पाटील, एक मुलगी, सुन, नातवंडे असा परिवार आहे. सुषमा पाटील या हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार स्व. बापुराव पाटील आष्टीकर यांच्या मोठ्या सुनबाई होत. 1991 मध्ये नागेश पाटील आष्टीकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. त्या मनमिळावू, धार्मिक वृत्तीच्या असून विविध धार्म...
Banjara community : बंजारा समाजाच्या अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील आरक्षणासाठी लढा उभा करणार-  बापूराव राठोड

Banjara community : बंजारा समाजाच्या अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील आरक्षणासाठी लढा उभा करणार- बापूराव राठोड

नांदेड, सोशल वर्क, हिंगोली
हिंगोली| ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर संपूर्ण मराठवाड्याचा दौरा करणारे प्रदेशाध्यक्ष बापूराव राठोड यांनी हिंगोली जिल्ह्याचा दौरा करताना समाज बांधवांशी संवाद साधला. यावेळी बंजारा समाजाची जुनी मागणी अनुसूचित जमात प्रवर्गातील आरक्षण या प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करून लढा उभा करण्याचा मानस बोलून दाखवला. कारण बंजारा समाज हा अनुसूचित जमाती आरक्षणाची सर्व निकष पूर्ण करत असून, हा समाज भारताचा प्राचीन समाज आहे. संपूर्ण देशामध्ये विविध राज्यात हा समाज आढळतो ज्याची बोलीभाषा संपूर्ण देशात एकच असून यामध्ये सांस्कृतिक ,सामाजिक, आर्थिक एकता आढळते त्यामुळे अनुसूचित जमातीचे आरक्षण हे बंजारा समाजाचा अधिकार असून त्यापासून बंजारा समाजास वंचित ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे आरक्षणाचा हा अधिकार मिळवून देण्यासाठी ऑल इंडिया बंजारा सेवा संघ लढा उभारणार असल्याचे मत व्यक्त ...
Nagesh patil ; पूरग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्या – खासदार नागेश पाटिल आष्टिकर

Nagesh patil ; पूरग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्या – खासदार नागेश पाटिल आष्टिकर

नांदेड, राजकीय, हिंगोली
नांदेड/हिंगोली, अनिल मादसवार | हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश बापूराव पाटिल आष्टिकर यांनी नांदेड जिल्ह्यातील हदगाव, हिमायतनगर, किनवट तसेच माहूर तालुक्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. मुसळधार पावसामुळे पैनगंगा व कयाधू नदी काठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून, शेतपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अजूनही काही भागात पाण्याचा प्रवाह ओसरलेला नसल्याने कृषी विभागाला प्रत्यक्ष पाहणी करता आलेली नाही. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. याशिवाय हदगाव, किनवट, हिमायतनगर या शहरी भागांसह ग्रामीण भागात देखील अनेकांच्या घरामध्ये पूरपाणी शिरल्याने मालमत्तेचे नुकसान झाले आहे. याबाबत तातडीने पंचनामे करून शेतकरी व नागरिकांना नियमानुसार आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी खासदारांनी केली. “ही एक नैसर्गिक आपत्त...
Paniganga river floods : इसापूर धरणाचा विसर्ग; पैनगंगा नदीला महापूर, शेतकरी संकटात

Paniganga river floods : इसापूर धरणाचा विसर्ग; पैनगंगा नदीला महापूर, शेतकरी संकटात

नांदेड, उमरखेड, यवतमाळ, व्हिडीओ, हिंगोली
यवतमाळ/नांदेड, अनिल मादसवार| गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसासह इसापूर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पैनगंगा नदीने रौद्ररूप धारण केले आहे. बोरीच्या जुन्या पुलावरून वेगवान प्रवाह सुरू असून, परिसरातील शेतजमिनी पाण्याखाली गेल्याने ऊस, सोयाबीन, कापूस, हळद, उडीद, मूग, तूर आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कयाधू नदीचे पाणी पैनगंगेत मिसळल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. गांजेगाव बंधाऱ्यावरून पाणी वाहत असून ढाणकी मार्गे विदर्भ–मराठवाड्याचा संपर्क तुटला आहे. हिमायतनगर व उमरखेड तालुक्यातील घारापुर, कामारी, विरसनी, दिघी, चाथरी, बोरी, देवसरी, कोपरा, पळसपुर, डोलारी, सिरपल्ली, कोठा, धानोरा, एकंबा, सावळेश्वर, बोरगडी, वारंगटाकळी आदी परिसरातील शेतीपिकांना पुराचा मोठा धोका निर्माण झाला तर गावांलागत पाणी आल्याने गावातील घरातही पाणी शिरण्याची शक्यता वर्तविली जात आहे....
Isapur Dam opened : ईसापुर धरणाचे 13 दरवाजे उघडले…..हदगाव तालुकयातील नदीकाठच्या शेतीचे प्रचंड नुकसान

Isapur Dam opened : ईसापुर धरणाचे 13 दरवाजे उघडले…..हदगाव तालुकयातील नदीकाठच्या शेतीचे प्रचंड नुकसान

कृषी, नांदेड, व्हिडीओ, हिंगोली
हदगाव, शेख चांदपाशा| उर्ध्व पेनगंगा प्रकल्पांतर्गत ईसापुर धरणावरून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला असून, इसापूर धरण पूर नियंत्रण प्रशासनाने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. धरणाच्या वरच्या बाजूस असलेल्या जयपूर बंधाऱ्यातून वाढता पाण्याचा विसर्ग पाहता, धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. धरण प्रशासनाचा निर्णय - आज दि. 18 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 3.30 वाजता धरणातील 3 गेट्स पूर्वीच्या 1.50 मीटर वरून थेट 2 मीटर पर्यंत उघडण्यात आले. याशिवाय, धरणाच्या सांडव्यावरील 10 गेट्स प्रत्येकी 1.50 मीटर ने उघडे ठेवण्यात आले आहेत.अशा प्रकारे एकूण 13 दरवाजा मधून नदीपात्रात 68,328 क्युसेक्स (1934.803 क्युमेक्स) इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सध्याची परिस्थिती धरणातील पाण्याची आवक सतत सुरू असून, तिच्या वेगानुसार पुढील काही तासांत विसर्ग वाढवणे अथवा कमी करणे बाबत प्रशासन निर...
Vidarbha-Marathwada : मुसळधार आणि इसापूर धरणातून सोडलेल्या विसर्गामुळे गांजेगाव पुलावरून पाणी; विदर्भ–मराठवाड्याचा संपर्क तुटला

Vidarbha-Marathwada : मुसळधार आणि इसापूर धरणातून सोडलेल्या विसर्गामुळे गांजेगाव पुलावरून पाणी; विदर्भ–मराठवाड्याचा संपर्क तुटला

नांदेड, महाराष्ट्र, हिंगोली
हिमायतनगर, अनिल मादसवार| मुसळधार पाऊस आणि इसापूर धरणातून सोडलेल्या विसर्गामुळे पैनगंगा नदी दुथडी भरून वाहू लागली असून, गांजेगाव पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे सलग विदर्भ–मराठवाड्याचा संपर्क तुटला असून दळणवळण ठप्प झाले आहे. गांजेगाव पुलाची उंची वाढविण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. पावसाळ्यात वारंवार पूल पाण्याखाली जातो आणि मार्ग बंद पडतो. नागरिकांना आपल्या गावी जाण्यासाठी ३०–३५ किमी वळसा घ्यावा लागतो. मात्र अद्यापही पूल उंचावण्याची मंजुरी मिळालेली नाही. शेतकऱ्यांचे नुकसान - पैनगंगेत इसापूर धरणाचा विसर्ग आणि कयाधू नदीचा पुर मिसळल्याने आणि मुसळधार पावसामुळे नदीला महापूर येतो. यामुळे काठावरील शेतात पाणी शिरून शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. महत्त्वाचा मार्ग ठप्प - हा पूल विदर्भ–मराठवाडा–तेलंगणा–आंध्र प्रदेश–कर्नाटकला जोडणारा आहे. माहूर, बासर, पोहरा देवी आदी ...
Multimedia Exhibition : शासकीय योजना तळागाळात पोहचविण्यासाठी केंद्र शासनाच्या मल्टीमीडिया चित्रप्रदर्शनीचे मोलाचे योगदान….तहसीलदार हरीश गाडे

Multimedia Exhibition : शासकीय योजना तळागाळात पोहचविण्यासाठी केंद्र शासनाच्या मल्टीमीडिया चित्रप्रदर्शनीचे मोलाचे योगदान….तहसीलदार हरीश गाडे

हिंगोली, मनोरंजन
हिंगोली | येथील औंढा नागनाथ मंदिर परिसरातील भक्त निवास क्र. 2 येथे आयोजित प्रदर्शनात शासकीय योजना तळागाळात पोहचविण्यासाठी केंद्र शासनाच्या मल्टीमीडिया चित्रप्रदर्शनीचे मोलाचे योगदान ठरत आहे असे औंढा येथील तहसीलदार हरीश गाडे यांनी प्रतिपादन केले. केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाच्या नांदेड येथील केंद्रीय संचार ब्यूरोच्यावतीने आयोजित केंद्र सरकारची 11 वर्षे-सेवा सुशासन आणि गरीब कल्याणाची, हर घर तिरंगा, आजादी का अमृत महोत्सव या संकल्पनेवर आधारित मल्टी मीडियाच्या चित्रप्रदर्शनच्या उद्घाटन करण्यात आले. पुढे बोलताना तहसीलदार गाडे म्हणाले की मागील 11 वर्षात शासनाने जनसामान्यांच्या विविध योजना राबविल्या आणि त्याचा उपयोग समाजातील विविध घटनांना मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याचं जीवनमान उंचावत असून जनतेनेही यामध्ये सहभागी व्हाव. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी ,औंढा नागनाथ संस्‍थानचे प्...
Hingoli News Rakshabandhan : रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून हिंगोली जिल्ह्याचे प्रशासकीय नेतृत्व मुलींच्या हाती

Hingoli News Rakshabandhan : रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून हिंगोली जिल्ह्याचे प्रशासकीय नेतृत्व मुलींच्या हाती

हिंगोली, महाराष्ट्र
• जिल्ह्यातील आठ मुलींना उपलब्ध करुन दिली एक दिवस अधिकारी होण्याची संधी • मुलींनी मानले प्रशासनाचे आभार हिंगोली| जिल्ह्यातील मुलींचे जन्मदर वाढविणे, बालविवाहाचे प्रमाण कमी करणे, मुलींमध्ये जिद्द, प्रेरणा व नेतृत्व गुणांचा विकास तसेच त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी जिल्ह्यातील आठ शालेय मुलींना जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, अपर जिल्हाधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, अपर पोलीस अधीक्षक, विभागीय वन अधिकारी या पदावर एक दिवस मानद अधिकारी होण्याची संधी मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांच्या प्रेरणेतून उपलब्ध करुन देण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी सांगितले. हिंगोली जिल्ह्यात मुला-मुलींचे लिंग गुणोत्तर वाढावे, बालविवाह निर्मूलन व महिलांचे सक्षमीकरण व्हावे या उपाययोजनाचा एक भाग म्हणून रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून मुलींचा सन्मान होण्...
Aundha Nagnath : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून श्रीक्षेत्र औंढा नागनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा आढावा

Aundha Nagnath : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून श्रीक्षेत्र औंढा नागनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा आढावा

हिंगोली, धार्मिक
हिंगोली| महाराष्ट्रातील प्रमुख ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्रापैकी असलेल्या श्रीक्षेत्र औंढा नागनाथच्या सर्वांगीण विकासासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्याचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सविस्तर आढावा घेतला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डी.जी. पोत्रे, संस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार हरिष गाडे, भारतीय पुरातत्व विभागाचे सहायक संचालक श्री. गोटे, पुजारी शेखर मनोहर भोपी, महंत सुरेश गिरी, वद्रमाक्ष पाठक, विकासक यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत औंढा नागनाथ परिसरातील पायाभूत सुविधा, भाविकांसाठी आवश्यक सुविधा, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, सौंदर्यीकरण, तसेच पर्यावरणपूरक विकास यावर विशेष चर्चा करण्यात आली. भाविकांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी प्रस्तावित विकासकामांमध्ये कोणताही विलंब होऊ नये. धार्मिक, ऐति...
error: Content is protected !!