Sunday, May 17

मुंबई

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Dhananjay Munde : बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – कृषी मंत्री धनंजय मुंडे -NNL

Dhananjay Munde : बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – कृषी मंत्री धनंजय मुंडे -NNL

महाराष्ट्र, मुंबई
मुंबई| राज्यातील अनुसूचित जमातीसाठी राबविण्यात येणाऱ्या बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणि अनुसूचित जाती / नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या आर्थिक निकषांमध्ये सुधारणा व नवीन घटकांचा समावेश झाला असून याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. राज्यातील अनुसूचित जाती / नवबौद्ध शेतकरी आणि आदिवासी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या कृषी विभागामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत विविध बाबी राबविण्यात येतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत लाभार्थी निवड निकष यासाठी अर्जदार शेतकऱ्याकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याच्या ...
Deputy Chief Minister Devendra Fadnavis ; मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना पुढील पाच वर्ष चालू राहील – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – NNL

Deputy Chief Minister Devendra Fadnavis ; मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना पुढील पाच वर्ष चालू राहील – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – NNL

राजकीय, मुंबई
सोलापूर| राज्य शासनाने महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. राज्यातील 2 कोटी 20 लाख बहिणींच्या खात्यात थेट पैसे जमा झालेले आहेत. महिलांच्या सक्षमीकरणाचा विचार प्रथम या शासनाने केलेला असून त्याचा लाभ राज्यातील लाडक्या बहिणींना मिळत असल्याने त्यांना एक प्रकारचा आनंद व समाधान मिळत आहे. हा आनंद व समाधान टिकून राहण्यासाठी शासन ही योजना कोणत्याही अडचणींशिवाय पुढील पाच वर्ष चालू ठेवणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा अंतर्गत होम मैदान येथे आयोजित जिल्हास्तरीय कार्यक्रमात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस मार्गदर्शन करत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार सर्वश्री विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, राजेंद्र राऊत, समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, संजय शिंदे, ...
President Draupadi Murmu ; ‘राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते 70 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान – NNL

President Draupadi Murmu ; ‘राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते 70 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान – NNL

मनोरंजन, मुंबई
नवी दिल्ली| 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे आज विज्ञान भवन येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते आज आयोजन करण्यात आले. या प्रसंगी ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना ‘दादासाहेब फाळके जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विज्ञान भवनात 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरूगन, माहिती व प्रसारण विभागाचे सचिव संजय जाजू आणि पर्यवेक्षक समितीचे अध्यक्ष मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. आज प्रदान झालेले पुरस्कार वर्ष 2022 चे आहेत. ‘ममर्स ऑफ द जंगल’, ‘वारसा’, ‘या मराठी चित्रपटांनाही विविध श्रेणींमध्ये सन्मानित करण्यात आले. फिचर फिल्म श्रेणीत 38 पुरस्कार जाहीर झाले. यात विविध भाषेतील उत्कृष्ट चित्रपटांचाही समावेश आहे. तर नॉन फिचर फिल्...
Nana Patole ; हरियाणातील निकाल हा व्यवस्थेचा विजय आणि लोकशाहीचा पराभव: नाना पटोले – NNL

Nana Patole ; हरियाणातील निकाल हा व्यवस्थेचा विजय आणि लोकशाहीचा पराभव: नाना पटोले – NNL

मुंबई, राजकीय
मुंबई| हरियाणा विधानसभा निवडणूकीत काँग्रेससाठी अनुकूल व भाजपासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना आज जे निकाल आले ते आश्चर्यकारक आणि धक्कादायक आहेत. सकाळी बहुतांश मतदारसंघात काँग्रेस पक्ष आघाडीवर असताना अचानक उलटे चक्र कसे फिरले? मतमोजणी केंद्रावर अनेक तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले गेले. हरियाणाचा विजय हा भाजपाने प्रशासनाच्या मदतीने मिळवला असल्याने हा व्यवस्थेचा विजय आणि लोकशाहीचा पराभव आहे, अशी प्रतिक्रीया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, काही जिल्ह्यातील ईव्हीएम मशिनची बॅटरी ९९ टक्के चार्ज होती आणि त्याच ठिकाणी काँग्रेस उमेदवारांचा पराभव झाला व भाजपाचे उमेदवार निवडून आले. ज्या ईव्हीएमच्या बॅटरी ६०-७० टक्के चार्ज होत्या त्या ठिकाणी काँग्रेसचे उमेद...
Digital midia ; भविष्यात प्रिंट मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्व वाढणार — एस एम देशमुख -NNL

Digital midia ; भविष्यात प्रिंट मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्व वाढणार — एस एम देशमुख -NNL

महाराष्ट्र, मुंबई
गेवराई। समाजात घडणाऱ्या चुकीच्या गोष्टी आणि राज्यकर्त्यांच्या विरोधात लोकहितासाठी भूमिका मांडण्याचे काम पत्रकारांचे आहे यासाठी प्रिंट मीडिया जितका महत्त्वाचा आहे तितकाच महत्त्वाचा भविष्यात डिजिटल मीडिया असणार आहे. त्यामुळे पत्रकारांनी डिजिटल मीडियामध्ये अधिक सक्रिय व्हावे असे आवाहन अभा मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी केले आहे. सत्ताधाऱ्यांचे चुकत असेल तर ते चूक म्हणण्याची भूमिका पत्रकारांनी ठेवावी आणि जनतेचा आवाज होऊन प्रिंट मीडिया आणि डिजिटल मीडियाने काम करावे असे आवाहन माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी केले आहे. गेवराई येथील शासकीय विश्रामगृह येथे दिनांक 6 ऑक्टोबर 2024 रोजी अभा मराठी पत्रकार परिषदेची सलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषदेच्या वतीने मराठी पत्रकार परिषद आणि डिजिटल मीडिया परिषदेच्या सदस्यांचा मेळावा आणि नूतन पदाधिकारी सत्कार सोहळ्याची आयोजित करण्...
Chief Minister Eknath Shinde : चेंबूरच्या सिद्धार्थंनगरमधील आग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL

Chief Minister Eknath Shinde : चेंबूरच्या सिद्धार्थंनगरमधील आग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL

राजकीय, मुंबई
मुंबई| चेंबूर येथील सिद्धार्थनगर मधील आगीच्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत दिली जाईल. तसेच जखमींवर शासनाच्या खर्चाने उपचार केले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आज या दुर्घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यात त्यांनी दुर्दैवी कुटुंबियांची आस्थेने विचारपूस केली. तसेच त्यांना सर्वतोपरी आधार देण्याचा दिलासा दिला. दूर्घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले की, ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. गुप्ता कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होईल. अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी काळजी घेता यावी यासाठी उपाययोजनांचाही आढावा घेतला जाईल. याठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसनाचे काम रखडले असेल,तर त्याबाबतही बैठक घेऊन योग्य ते निर्णय घेतले जातील, असेही मुख्यमंत्र...
Marathi Classic Language Pride Day : तीन ऑक्टोबर मराठी अभिजात भाषा गौरव दिन म्हणून साजरा करणार -NNL

Marathi Classic Language Pride Day : तीन ऑक्टोबर मराठी अभिजात भाषा गौरव दिन म्हणून साजरा करणार -NNL

महाराष्ट्र, मुंबई
मुंबई| मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल आज राज्य मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व त्यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाचे अभिनंदन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व इतर मंत्रीगण या बैठकीस उपस्थित होते. तीन ऑक्टोबर हा दिवस यापुढे 'मराठी अभिजात भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. या संदर्भातील मंत्रिमंडळाचा ठराव मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी वाचून दाखवला. यात म्हटले आहे की, या ऐतिहासिक निर्णयाबद्धल राज्य मंत्रिमंडळ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचे आभार व्यक्त करते, तसेच राज्य मंत्रिमंडळाच्यावतीने केंद्रीय मंत्रिमंडळाचे अभिनंदन करण्यात येत आहे. या प्रस्तावाचा आशय असा, मराठी भाषा मुळातच अभि...
Nana Patole : राज्यातील वाढत्या महिला अत्याचाराला सरकारच जबाबदार, बहिणींना सुरक्षेची गरज: नाना पटोले -NNL

Nana Patole : राज्यातील वाढत्या महिला अत्याचाराला सरकारच जबाबदार, बहिणींना सुरक्षेची गरज: नाना पटोले -NNL

मुंबई, राजकीय
मुंबई/नागपूर| महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था रसातळाला गेलेली आहे. शासन व प्रशासनात प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला आहे, त्यांना फक्त मलई खाण्यात जास्त रस असल्याने जनतेच्या प्रश्नांकडे त्यांचे लक्ष नाही. राज्यात मुली व महिला सुरक्षित नाहीत हे सातत्याने होत असलेल्या घटनांवरून दिसत आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे महिला असुरक्षित आहेत पण सरकारने याची जबाबदारी घेऊन गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी व अशा घटनांना पायबंद घालावा, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. नागपूर येथे पत्रकारांशी बोलातना नाना पटोले म्हणाले की, पुण्यात शाळकरी मुलीवर ड्रायव्हरने अत्याचार केला, त्याआधी एका कॉलेजमध्ये मुलीवर अत्याचाराची घटना घडली. आणि आता बोपदेव घाटात एका मुलीवर सामूहिक अत्याचाराची घटना झाली हे महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालायला लावणारी आहे. सावित्रीबाईच्या भूमीत अशा घटना वाढ...
Naseem Khan : पोलीस अधिकारी व बीएमसीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे स्वागत: नसीम खान -NNL

Naseem Khan : पोलीस अधिकारी व बीएमसीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे स्वागत: नसीम खान -NNL

मुंबई, राजकीय
मुंबई| मुंबई महानगरपालिका आणि पवई पोलीस स्टेशनच्या अधिका-यांनी बिल्डरशी संगनमत करून ६ जूनच्या पहाटे जयभीम नगरमधील गरीब कुटुंबांच्या घरावर कारवाई करून त्यांना बेघर केले. या कारवाईतील बीएमसी अधिकारी व पोलीस अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे स्वागत करून पोलीस उपायुक्त, एस वार्डचे वार्ड अधिकारी, पालिका उपायुक्त आणि पवईच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक या मुजोर अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, या मागणीचा प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष व CWC सदस्य नसीम खान यांनी पुन्नरुच्चार केला आहे. यासंदर्भात बोलताना नसीम खान म्हणाले की, अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली नियमबाह्य कारवाई करून पवईच्या जयभीम नगर मधील ६०० कुटुंबियांना भर पावसाळ्यात बेघर करण्यात आले. यासंदर्भात एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले होते, आज एसआयटीच्या अहवालावर सुनावणी करताना क...
Education : शिक्षण हेच विकासाचे द्वार – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन -NNL

Education : शिक्षण हेच विकासाचे द्वार – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन -NNL

करियर, मुंबई
गडचिरोली। शिक्षण ही मोठी ताकद आहे, शिक्षणामुळेच विद्यार्थ्यांच्या आयुष्याला वळण लागून विकासाचे द्वार खुले होत असल्याच मत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज व्यक्त केले. गोंडवाना विद्यापीठाचा अकरावा आणि बारावा दीक्षांत सोहळा राज्यपाल यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाच्या प्रांगणात संपन्न झाला. याप्रसंगी ते बोलत होते. वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रविण पोटदुखे, वित्त व लेखाधिकारी सी ए भास्कर पठारे व्यासपीठावर उपस्थित होते. तर आमदार देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल, प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह आद...
error: Content is protected !!