
उस्माननगर, माणिक भिसे। लोहा तालुक्यातील मौजे कलंबर बु येथील शिवारात वन्यप्राणी पाण्याच्या शोधात भटकंती करीत आहेत.नुकताच बाबु अण्णा उमाजीराव गोरे यांच्या शेतातील विहीरीमध्ये हारीण पडल्याचे लक्षात येताच गांवकरी व वनविभाग अधिकारी यांनी परिश्रम करून हरिणास बाहेर सुखरूप काढुण जंगलात सोडून दिले.


कलंबर बु परिसरात मागील आठवड्यात अवकाळी पावसामुळे मानवा प्रमाणे वन्यप्राणी देखील भयभीत झाले आहेत. जंगलात पानवटे नसल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधात भटकत असतात. हरणाचा कळप सोडून एक हरिण बाबु अण्णा उमाजीराव गोरे यांच्या शेतातील विहीरीमध्ये पडल्याचे दिसून आले.

तयानंतर गावचे माजी सरपंच श्रीधर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील रवि अशोक तुपेकर , संभा नृसिंह कांबळे , साहेबराव भुजंगराव कांबळे , डिगाबर घुगराळे व वनविभागाचे मुंडे , चांदोबा भिसे यांनी परिश्रम करून हरिणास सुखरूप बाहेर काढले.व पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अजय शिवनकर यांनी दवाखान्यात तपासणी करून वनविभागाचे अधिकारी यांच्या ताब्यात देऊन जंगलात सुखरूप सोडण्यात आले.





