Wednesday, May 13

देश विदेश

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Chief Minister meets Prime Minister Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली प्रधानमंत्री मोदींची भेट ;  पूरग्रस्तांसाठी मागितली केंद्राकडून मदत

Chief Minister meets Prime Minister Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली प्रधानमंत्री मोदींची भेट ; पूरग्रस्तांसाठी मागितली केंद्राकडून मदत

मुंबई, देश विदेश, राजकीय
नवी दिल्ली| प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली आणि त्यांना महाराष्ट्रातील पाऊस, पूरस्थिती आणि त्यातून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती दिली. केंद्र सरकारकडून भरीव मदतीसाठी निवेदनही त्यांना सादर केले. महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू, असे आश्वासन प्रधानमंत्र्यांनी यावेळी दिले. याशिवाय, महाराष्ट्रातील संरक्षण कॉरिडॉर, गडचिरोलीतील पोलाद उत्पादनासाठी सवलती, दहिसर येथील भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या जागेचे हस्तांतरण तसेच ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’च्या दृष्टीने महाराष्ट्र शासन करीत असलेले उपाय इत्यादींबाबत मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी अतिशय सविस्तर चर्चा केली. गडचिरोली पोलाद सिटी गडचिरोली येथे पोलाद सिटीत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत असून, हा एक आकांक्षित जिल्हा आहे. महाराष्ट्र राज्य...
Maharashtra : महाराष्ट्रातील स्वयंसहाय्यता गटांचे यश पाहून मला अभिमान वाटतो”  – निवासी आयुक्त आर. विमला

Maharashtra : महाराष्ट्रातील स्वयंसहाय्यता गटांचे यश पाहून मला अभिमान वाटतो” – निवासी आयुक्त आर. विमला

देश विदेश
नवी दिल्ली| नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडियम येथे 5 ते 22 सप्टेंबर 2025 या कालावधीत आयोजित सरस जीवनोपार्जन मेळावा 2025 चे उद्घाटन केंद्रीय कृषी व किसान कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या हस्ते  झाले आहे. या मेळाव्यात महाराष्ट्रातील स्वयंसहाय्यता गटांनी ‘व्होकल फॉर लोकल आणि ‘स्वदेशी अपनाओ’ या संकल्पनांना चालना देणारे खाद्यपदार्थ आणि हस्तकला उत्पादनांचे स्टॉल आहेत. आज महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त आर. विमला यांनी सरस जीवनोपार्जन मेळावा 2025 ला भेट देऊन पाहणी केली. श्रीमती आर. विमला यांनी प्रत्येक स्टॉलला भेट देऊन तिथल्या उत्पादनांची बारकाईने पाहणी केली आणि अनेक उत्पादने खरेदी करून या गटांच्या कार्याला प्रोत्साहन दिले. त्यांनी स्वयंसहाय्यता गटाच्या सदस्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या उत्पादन प्रक्रिया, आव्हाने आणि भविष्...
Shri Krishna Goshala ; स्वराज्य पब्लिक स्कूल मध्ये मा.पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचा वाढदिवस गोमाता पूजनाने साजरा श्रीकृष्ण गोशाळेच्या वतीने उपक्रम

Shri Krishna Goshala ; स्वराज्य पब्लिक स्कूल मध्ये मा.पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचा वाढदिवस गोमाता पूजनाने साजरा श्रीकृष्ण गोशाळेच्या वतीने उपक्रम

देश विदेश, नांदेड
उस्माननगर l मातृभूमी सेवा संघ गोसेवा व श्रीकृष्ण गोशाळा पोखरभोसी ता.लोहाच्या वतीने स्वराज्य पब्लिक स्कूल ढाकणी पाटी,किवळा येथे मा.पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचा वाढदिवस गोमाता पूजनाने आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. प्रथम सर्वांनी फुलांचा वर्षाव करून गोमातेचे स्वागत केले.चिमुकल्यांनी "गोमाता की जय"अश्या घोषणा देत फुले उधळून आनंद व्यक्त . गाईच्या पाठीवर भगवी झुल,गोंडे,मटाटी,घागर माळा,डोक्यावर अलंकृत छत्री लावून सजविण्यात आले होते. "छोटी छोटी गैया,छोटे छोटे ग्वाल,छोटेसे मेरे,मदन गोपाल" या गीताच्या तालावर विद्यार्थ्यांनी ठेका धरत गोमाता भोवती फेर धरला होता. गोशाळा महासंघाचे नांदेड जिल्हा सचिव प्रल्हाद घोरबांड यांचे हस्ते गोपुजन करण्यात आले.समस्त महाजन मुंबईचे अध्यक्ष गिरीशभाई शहा यांच्या सूचनेवरून कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शाळेच्या वतीने मान्यवरांचे शाल व पुष्प देऊन स्वागत करण्...
C.P. Radhakrishnan : महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयी

C.P. Radhakrishnan : महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयी

नांदेड, देश विदेश, मुंबई
नवी दिल्ली| महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार सी.पी. राधाकृष्णन हे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीमध्ये विजयी झाले आहेत. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी संसदेत मतदान झाले. एकूण ९८ टक्के मतदान झाले असून यामध्ये एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांना एकूण 752 मतांपैकी पहिल्या पसंतीची 452 मते मिळाली आहेत तर इंडिया आघाडीचे उमेदवार आणि माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी 300 मते मिळाली आहेत. उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक प्रक्रिया सकाळी 10 वाजता संसद भवनात सुरू झाली. देशभरातील खासदारांनी आपले मतदान केले. सायंकाळी 5 वाजता मतदान प्रक्रिया संपल्यानंतर सायंकाळी 6 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. काटेकोर सुरक्षा व्यवस्था आणि पारदर्शक पद्धतीने पार पडलेल्या या प्रक्रियेचा निकाल सायंकाळी 7:30 वाजता राज्यसभेचे महासचिव आणि निवडणूक निर्णय अधिकारी पी. सी. मोदी यांनी ...
Indian woman ; आफ्रिकेतील टांझानिया देशातील सर्वोच्च शिखरावर भारतीय महिलेनी फडकविला राष्ट्रध्वज

Indian woman ; आफ्रिकेतील टांझानिया देशातील सर्वोच्च शिखरावर भारतीय महिलेनी फडकविला राष्ट्रध्वज

नांदेड, करियर, देश विदेश
नांदेड l येथील उस्माननगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लोपामुद्रा आनेराव कुबडे यांनी आफ्रिकेतील टांझानिया देशातील सर्वोच्च शिखर किलोमांजारो येथे आपल्या भारताचा व महाराष्ट्र पोलीस चा झेंडा 15ऑगस्ट रोजी फडकविला आहे. 15 सौ.लोपामुद्रा दत्तराव आनेराव/(सौ.लोपामुद्रा सुशील कुबडे) नांदेड जिल्ह्यातील रोहिपिंपळगावातील एका गरीब शेतकऱ्यांच्या पोटी जन्म झाला. पहिली ते चौथी जि.प.शाळा वसंतवाडी ,पाचवी ते सातवी जि.प.शाळा रोहिपिंपळगाव,आठवी ते दहावी कै.यादवरावजी शाळा चिकाळा येथे शिक्षण झाले. पुढील शिक्षण मुदखेड व नायगाव येथे केले.वडीलांना खेळाची आवड असल्याने स्वतः ला स्पर्धेत जाता आले नाही म्हणून, आपली चार एकर शेती पडीत ठेवून स्वतः त्यांची प्रॅक्टिस घेतली . मुला - मुलीत कुठलाही भेदभाव न करता त्यांनी आपल्या मुलीला मुलाच्या बरोबरीने शेतामध्ये सराव करून घेतला . अवघ्या वयाच्या चौदाव्या वर्षी ...
Deepstambh Manobal Kendra : दिल्लीत दीपस्तंभ मनोबल केंद्राचा शुभारंभ दिव्यांग, अनाथ आणि ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण

Deepstambh Manobal Kendra : दिल्लीत दीपस्तंभ मनोबल केंद्राचा शुभारंभ दिव्यांग, अनाथ आणि ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण

नांदेड, देश विदेश
नवी दिल्ली| दीपस्तंभ फाउंडेशनद्वारे संचालित मनोबल प्रकल्प केंद्राचा शुभारंभ सोमवारी सायंकाळी दिल्लीत झाला. या केंद्राद्वारे दिव्यांग, अनाथ, ट्रान्सजेंडर आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना यूपीएससीसह विविध स्पर्धा परीक्षांसाठी मोफत निवासी प्रशिक्षण दिले जाणार आहे. जळगाव आणि पुण्यात यशस्वीपणे कार्यरत असलेला हा प्रकल्प आता राष्ट्रीय राजधानीतही सुरू झाला आहे. उद्घाटन समारोह कस्तूरबा गांधी मार्गावरील नवीन महाराष्ट्र सदनाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला. यावेळी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते, तर केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, दिव्यांगजन कल्याण विभागाचे सचिव राजेश अग्रवाल, दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक-संचालक यजुर्वेंद्र महाजन आणि ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर उपस्थित होते. राजेश अग्रवाल यांनी नमूद केले की, गेल्या दहा वर्षांत दिव्यांगांन...
Uttarakhand : उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे परिस्थिती गंभीर : बिलोली तालुक्यातील 11 युवक अडकले

Uttarakhand : उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे परिस्थिती गंभीर : बिलोली तालुक्यातील 11 युवक अडकले

नांदेड, देश विदेश
नांदेड| उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे परिस्थिती गंभीर निर्माण झाली असून, बद्रीनाथ केदारनाथ दर्शनाला गेलेले नांदेडच्या बिलोली येथील 11युवक अडकले आहेत. हे सर्व युवक सुखरूप व भूसखलन झालेल्या ठिकाणापासून दिडशे किलोमीटर दुरवर आहेत. दि. 5 ऑगस्ट 2025 रोजी, उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे परिस्थिती गंभीर आहे. उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली येथे ढगफुटी झाली असून, ज्यामुळे खीरगंगा नदीला मोठा पूर आला आहे. अनेक घरांचे नुकसान झाले आहे, आणि काही ठिकाणी भूस्खलन देखील झाले आहे. उत्तराखंडमध्ये अतिवृष्टी झाली आहे. अनेक ठिकाणी ढगफुटीच्या घटना घडल्या आहेत, ज्यामुळे भूस्खलन आणि पूर आले आहेत. उत्तरकाशी जिल्ह्यात महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील मौ. डोणगाव येथील 11 जण केदारनाथ बद्रीनाथ यात्रेसाठी दि. 01 ऑगस्ट 2025 रोजी नांदेड येथून निघाले होते त्यांचा संपर्क झाला असून ते सर्व सद्यस्थित...
Kisan Samman : पंतप्रधान किसान सन्मान निधीची 20वा हप्ता 2 ऑगस्टला जारी होणार

Kisan Samman : पंतप्रधान किसान सन्मान निधीची 20वा हप्ता 2 ऑगस्टला जारी होणार

कृषी, देश विदेश, नांदेड, मुंबई
नवी दिल्ली| पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता येत्या 2 ऑगस्ट 2025 रोजी जारी केला जाणार आहे. यासंदर्भात आज केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री श्री. शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत 2 ऑगस्ट रोजी वाराणसी येथे पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली आयोजित होणाऱ्या कार्यक्रमाच्या तयारीबाबत आणि अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी सविस्तर चर्चा झाली. देशभरातील 731 कृषी विज्ञान केंद्रे (केव्हीके), भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) आणि कृषी विद्यापीठांचे संचालक, कुलगुरू आणि प्रमुख व्हर्च्युअल माध्यमातून या बैठकीत सहभागी झाले. केंद्रीय मंत्र्यांनी राष्ट्रीय, राज्य, जिल्हा आणि ग्रामीण स्तरावर शेतकऱ्यांना या कार्यक्रमाशी जोडण्यासाठी अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या आणि देशव्यापी स्तरावर मोहिमेच्या स्वरूपात कार्यक्रम आयोजित करण्यासाठी रूपरेषा ...
Chief Minister Devendra Fadnavis : “मातृभाषेचा अभिमान बाळगतांना अन्य भाषांचा सन्मान करावा”-  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Chief Minister Devendra Fadnavis : “मातृभाषेचा अभिमान बाळगतांना अन्य भाषांचा सन्मान करावा”- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, देश विदेश
नवी दिल्ली| भाषा हे संवादाचे प्रभावी साधन असून या माध्यमातून ज्ञानाचा खजिना उपलब्ध होतो. प्रत्येकाने आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगताना इतर भारतीय भाषांचा देखील सन्मान ठेवला पाहिजे असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ‘श्री. छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि सरंक्षण विशेष अध्यासन केंद्र ’ आणि ‘कुसुमाग्रज मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती अध्यासन केंद्राचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंत, जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. शांतिश्री धुलिपुडी पंडित , तंजावर घराण्याचे छत्रपती बाबाजीराजे भोसले, कुलसचिव प्रा. रविकेश उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सामरिक...
Union Cabinet approves : पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा टप्पा-2 ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Union Cabinet approves : पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा टप्पा-2 ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

पुणे, देश विदेश
नवी दिल्ली| पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा टप्पा-2 अंतर्गत वनाझ ते चांदणी चौक (कॉरिडॉर 2अ ) आणि रामवाडी ते वाघोली/विठ्ठलवाडी (कॉरिडॉर 2ब ) याला मंजुरी दिली आहे. हे प्रकल्प टप्पा -1 मधील विद्यमान वनाझ - रामवाडी कॉरिडॉरचा विस्तार असतील. हे दोन उन्नत कॉरिडॉर 12.75 किमी लांबीचे असतील आणि त्यात 13 स्थानके असतील, जी चांदणी चौक, बावधन, कोथरूड, खराडी आणि वाघोली यासारख्या वेगाने विकसित होणाऱ्या उपनगरांना मेट्रोशी जोडतील. हा प्रकल्प चार वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पाचा एकूण अंदाजे खर्च 3626.24 कोटी रुपये इतका असून तो भारत सरकार, महाराष्ट्र सरकार आणि परदेशी द्विपक्षीय/बहुपक्षीय संस्थांमध्ये समान प्रमाणात वाटून घेतला जाईल. हा धोरणात्मक प्रस्ताव विद्यमान कॉरिडॉर- 2 चा तार्किक विस्तार आहे आणि व्यापक गतिशीलता योजनेच्या ...
error: Content is protected !!