Due to shock ; शॉक लागून शेतकऱ्यासह बैलाचा मृत्यू; पोळ्याच्या दिवशी घडलेल्या घटनेने हळहळ -NNL
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। तालुक्यातील मौजे हिवळणी शिवारातील शेतात पोळ्याच्या दिवशी बैलांना चारण्या करीता,आंघोळ करून आणण्यासाठी गेलेले तरुण शेतकरी विलास दारासिंग राठोड वय २८ यांचे सह एका बैलास खांबावरून तुटून शेतातील पिकात पडलेल्या जिवंत विद्युत तारांचा करंट लागल्याने बैलांसह शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि. २ रोजी सकाळी ९.३० वाजता घडली आहे
माहूर तालुक्यातील मौजे हिवळनी येथील अल्पभूधारक शेतकरी विलास दारासिंग राठोड यांनी त्याचे काका मंगल राठोड यांचे शेत मंत्याने केले होते तसेच स्वतःची एक एकर कोरडवाहू शेती आहे दोन दिवसापासून माहूर तालुक्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस सुरू असल्याने सर्व शेतात पाणी साचले आहे. पोळ्याच्या दिवशी त्यांनी बैलांना शेतात नेऊन आंघोळ,बैलांना चारने करीता शेतात गेला.
पोळा सणासाठी बैलांना तयार करावे या हेतूने शेतात सकाळीच गेला होता शेतात असलेल्या विद्युत...









