Friday, May 15

कृषी

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Lightning strikes and hailstorms : विजांचा कडकडाट होऊन गारपीट ; शिजवलेल्या हळदीसह, मका, ज्वारीचं नुकसान

Lightning strikes and hailstorms : विजांचा कडकडाट होऊन गारपीट ; शिजवलेल्या हळदीसह, मका, ज्वारीचं नुकसान

कृषी, नांदेड, व्हिडीओ
हिमायतनगर,अनिल मादसवार| हिमायतनगर शहर तालुक्यात विजांचा कडकडाट होऊन गारपीट झाली असून, अर्धा तास झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांनी शिजवलेल्या हळदीसह, मका, उन्हाळी ज्वारीचं प्रचंड नुकसान झालं आहे. या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने मदतीचा हाथ द्यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुका परिसरात उन्हाचा तडाखा वाढला असून, प्रशासनाने दिलेल्या वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याच्या ईशाऱ्याने शेतकरी उन्हाची परवा न करता शेतीत राबत आहेत. अश्यातच मंगळवारी सायंकाळी अचानक वातावरणात बदल होऊन वादळी वारे, विजांचा कडकडाट होऊन जोरदार गारपीट झाली. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची दैना होऊन शिजविलेले हळद भिजून उत्पन्नाची क्वालिटी खराब होण्याची भीती व्यक्त होत आहे. तसेच कापून ठेवलेला मका भिजून गेला असून, उन्हाळी ज्वारी जमीनदोस्त झाली आहे. या पिकांना वाचवण्यासाठी शेतक...
Aruna Sangewar ; लोहा कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांनी “जीवंत सातबारा” मोहिमेचा लाभ घ्या – -उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार

Aruna Sangewar ; लोहा कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांनी “जीवंत सातबारा” मोहिमेचा लाभ घ्या – -उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार

कृषी, नांदेड
लोहा l महाराष्ट्र शासनाने "जीवंत सातबारा" मोहीम सुरू केली आहे, ज्यामध्ये सात बारा (7/12) वर वारस नोंदणी अद्ययावत करण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे.तेव्हा लोहा कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार यांनी केले आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी जीवंत सातबारा (७/१२) मोहीम राज्य।सरकारने सुरू केली आहे त्याअनुषंगाने लोहा कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे असे उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार यांनी सांगितले . गावोगावी १ ते ५ एप्रिल या काळात तलाठी चावडी वाचनाद्वारे मयतांची यादी तयार करतील..६ ते २० एप्रिल या कालावधीत मृत्यू प्रमाणपत्र वारसा प्रमाणपत्र ओळखपत्र अशी आवश्यक कागदपत्रे शेतकऱ्यांनी तलाठ्यांकडे जमा करावीत २१ एप्रिल ते १० मे या काळात – तलाठी व मंडळ अधिकारी चौकशी करून वारसांची नोंदणी पूर्ण करतील त्यासाठी मृत्यू प्रम...
Com. Arjun Aade : कर्जमाफी बाबत सरकार शेतकऱ्यांचा विश्वासघात करत आहे- कॉ. अर्जुन आडे

Com. Arjun Aade : कर्जमाफी बाबत सरकार शेतकऱ्यांचा विश्वासघात करत आहे- कॉ. अर्जुन आडे

नांदेड, कृषी
किनवट, परमेश्वर पेशवे| शेतकऱ्यांची मतं काढून घेण्यासाठी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. आज मात्र राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता कर्जमाफी करता येणार नाही अशी विधाने केली जात आहेत. सरकारने केलेला शेतकऱ्यांचा हा पुन्हा एकदा नवा विश्वासघात आहे. सरकारने निवडणुकीत शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन पाळावे व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी अशी मागणी किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष कॉ. अर्जुन आडे यांनी केली आहे. माणसाने अंथरूण पाहून पाय पसरावे, शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी इतके मोठे अंथरूण राज्य सरकारचे सध्या नाही, असे विधानही राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी केलेले आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याएवढे मोठे अंथरूण राज्य सरकारचे नव्हते याची जाणीव निवडणुकीत शेतकऱ्यांना आश्वासन देऊन मते पदरात पाडून घेतेवेळी नव्हती का...
insurance compensation : राज्यातील ६४ लाख शेतकऱ्यांना मिळणार रु. २५५५ कोटी विमा नुकसान भरपाई

insurance compensation : राज्यातील ६४ लाख शेतकऱ्यांना मिळणार रु. २५५५ कोटी विमा नुकसान भरपाई

कृषी, नांदेड, मुंबई
मुंबई| राज्यातील तब्बल ६४ लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असून, त्यांच्या खात्यावर थेट रु. २५५५ कोटी विमा नुकसान भरपाई जमा होणार आहे. शासनाने विमा कंपन्यांना देय असलेला प्रलंबित राज्य हिस्सा अनुदान म्हणून रु. २८५२ कोटी वितरित करण्यास मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे मागील विविध हंगामांतील प्रलंबित नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट जमा होणार आहे. ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना विमा कंपन्यांना देण्यात आल्या असून, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळणार असल्याचे कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी सांगितले. या अंतर्गत खरीप २०२२ आणि रब्बी २०२२-२३ या हंगामांसाठी रु. २.८७ कोटी, खरीप २०२३ साठी रु. १८१ कोटी, रब्बी २०२३-२४ साठी रु. ६३.१४ कोटी आणि खरीप २०२४ साठी रु. २३०८ कोटी इतकी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना वितरित होणार...
Releasing water from Babhali Dam : बाभळी बंधाऱ्यातील पाणी सोडणे तांत्रिकदृष्ट्या आवश्यक

Releasing water from Babhali Dam : बाभळी बंधाऱ्यातील पाणी सोडणे तांत्रिकदृष्ट्या आवश्यक

नांदेड, कृषी
नांदेड| बाभळी उच्च पातळी बंधाऱ्यातील पाणी सोडणे तांत्रिकदृष्ट्या आवश्यक आहे.त्यामुळे धरण सुरक्षिततेच्या नियमानुसार विभाग या धरणातून पाणी सोडण्याची कार्यवाही करण्यास बांधील आहे. कोणत्याही क्षणी बाभळी बंधाऱ्यातून तातडीने पाणी सोडले जाणार आहे, शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे. जलसंपदा विभागामार्फत दिनांक 17 मार्च रोजी जाहीर निवेदन देऊन बाभळी बंधार्‍यालगतच्या शेतकऱ्यांना याबाबत सूचना करण्यात आली होती. बळेगाव उच्च पातळी बंधाऱ्याच्या ऊर्जाव्यय व्यवस्थेचे क्षतिग्रस्त काम पावसाळ्यापूर्वी करणे आवश्यक असल्याकारणाने बाभळी बंधार्‍यातून काही प्रमाणात अंशतः पाणी नदीपात्रात सोडून ऊर्जाव्यय व्यवस्थेचे काम हाती घेतले जाणार आहे. 20 मार्च रोजी बाभळी बंधाऱ्याचे पाणी सोडण्याकरिता जलसंपदा विभागामार्फत कार्यवाही करण्याकरिता कर्मचारी बंधार्‍यावर आले असता, बळेगाव व बाभळी बंधाऱ्य...
Agriculture and Grain Festival ; दोन दिवसीय जिल्हा कृषी व धान्य महोत्सव संपन्न 50 लाख रुपयांपेक्षा अधिक शेत मालाची थेट विक्री

Agriculture and Grain Festival ; दोन दिवसीय जिल्हा कृषी व धान्य महोत्सव संपन्न 50 लाख रुपयांपेक्षा अधिक शेत मालाची थेट विक्री

नांदेड, कृषी
नांदेड l महाराष्ट्र शासन, कृषि विभाग व रोटरी क्लब, नांदेड यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित 2 दिवसीय जिल्हा कृषी व धान्य महोत्सव 17 व 18 मार्च 2025 रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान, नवा मोंढा, नांदेड येथे संपन्न झाला. या महोत्सवास नागरिक, ग्राहक उर्त्स्फूत प्रतिसाद दिला असून या दोन दिवसात 50 लाख रुपयांपेक्षा अधिक विक्री झाली असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी दिली आहे. जिल्हा कृषी व धान्य महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रामध्ये शास्त्रज्ञ शेतकरी परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादात कृषी विज्ञान केंद्र पोखरणी येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख यांनी शेतातील आधुनिक तंत्रज्ञान हवामान बदल व शेती पुढील आव्हाने या विषयावर सविस्तर असे मार्गदर्शन केले. कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथील शास्त्रज्ञ डॉ. माधुरी रेवनवार यांनी पौष्टिक ...
Gajanan Tuptewar honored : प्रगतिशील शेतकरी गजानन तूपतेवार यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सन्मान

Gajanan Tuptewar honored : प्रगतिशील शेतकरी गजानन तूपतेवार यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सन्मान

कृषी, नांदेड
हिमायतनगर। हिमायतनगर येथील प्रगतिशील शेतकरी गजानन प्रकाशराव तूपतेवार यांनी आपल्या शेतीत ड्रॅगन फ्रुट चे उत्पादन घेऊन शेती क्षेत्रात भरारी घेतली आहे. या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत मोठ्या प्रमाणात उत्पन्न काढले असून, त्यांच्या या शेतीनिष्ठ कार्याचे दखल घेऊन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते त्यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथील प्रगतिशील शेतकरी तथा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचीटनिस गजानन तुप्तेवार हे कृषी व्यापार क्षेत्रात साक्रीय आहेत, त्याच बरोबर ते स्वतः आणि मुलांच्या माध्यमातून शेती करतात, शेतीला जोडधंदा म्हणून त्यांनी मागील काही वर्षपासून शेतीत ड्रॅगन फ्रुट ची लागवड केली, आत्तापर्यंत त्यांनी भरघोस उत्पादन घेतले. त्यांना नुकतेच जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, पोलीस अधिक्षक अविनाशकुमार, दत्तकुमार कळसाईत जिल्हा कृषी अधिक्षक ह्यांच्या उपस्थितीत जिल...
‘Agristack’ registration for farmers : नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ‘ॲग्रीस्टॅक’ नोंदणीची १९ व २० मार्चला विशेष मोहीम !

‘Agristack’ registration for farmers : नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ‘ॲग्रीस्टॅक’ नोंदणीची १९ व २० मार्चला विशेष मोहीम !

कृषी, नांदेड
नांदेड| केंद्र व राज्य शासनाच्या ‘ॲग्रीस्टॅक’ योजनेत नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जवळपास ५६ टक्के नोंदणी झाली आहे. या योजनेचा अधिकाधिक लाभ मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनाने १९ आणि २० मार्च २०२५ रोजी विशेष नोंदणी मोहीम आयोजित केली आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, आपल्या गावातील नोंदणी केंद्रावर जाऊन आवश्यक कागदपत्रांसह नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी. जिल्‍हयातील सर्व शेतक-यांची अॅग्रीस्‍टॅक योजनेंतर्गत ३0 मार्च पर्यंत नोंदणी पुर्ण करावयाची आहे. सर्व शेतक-यांपेेकी पीएम किसान लाभार्थ्‍यांच्‍या नोंदणीसाठी दोन दिवशीय विशेष मोहिम आयोजित करण्‍यात आली आहे. पी एम किसान योजनेचा पुढील हप्ता ज्यांनी ऍग्री स्टिक नोंदणी केली आहे त्यांनाच मिळणार आहे. त्यामुळे ही नोंदणी गांभीर्याने घ्यावे गावातील सेतू केंद्रात संपर्क साधावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे. ॲग्रीस...
District Collector Kardile : प्रगतीशील व प्रयोगशील शेतकऱ्यांनी नांदेडच्या कृषी क्षेत्राचे नेतृत्व करावे : जिल्हाधिकारी कर्डिले

District Collector Kardile : प्रगतीशील व प्रयोगशील शेतकऱ्यांनी नांदेडच्या कृषी क्षेत्राचे नेतृत्व करावे : जिल्हाधिकारी कर्डिले

कृषी, नांदेड
नांदेड| नांदेड जिल्ह्यातील 80 टक्के नागरिक शेतीवर आधारीत अर्थव्यवस्थेशी जुळले आहेत. मात्र कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, जलसंधारण, कृषी यांत्रिकीकरण सर्वच क्षेत्रात आम्हाला सुधारण्यास वाव आहे. त्यामुळे ज्यांनी सेंद्रियशेतीपासून शेतीवर आधारीत अर्थव्यवस्थेत प्रगती केली आहे त्या प्रथीतयश शेतकऱ्यांनी नांदेडच्या कृषीक्षेत्राचे नेतृत्व करावे. कृषी विभाग त्यांना पाठबळ देईल, अशा आश्वासक शब्दात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी प्रगतीशील शेतकऱ्यांना जिल्ह्याच्या विकासात पुढे येण्याचे आवाहन केले आहे. जिल्हाधिकारी नांदेड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, प्रकल्प संचालक आत्मा आणि नांदेड येथील रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा कृषी व धान्य महोत्सव 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान येथे 17 व 18 मार्च दोन दिवस हा महोत्सव सु...
District Collector Rahul Kardile : गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेतून शेतकऱ्यांनी जमीनीची पत वाढवावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

District Collector Rahul Kardile : गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेतून शेतकऱ्यांनी जमीनीची पत वाढवावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

कृषी, नांदेड
नांदेड| गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून आपली जमीन सुपीक, कसदार व चांगल्या प्रतीची करण्यासाठी या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. आज मुखेड तालुक्यातील हिब्बट ते माऊली आणि पुढे आळंदीपर्यत अशा 9 कि.मी नालाखोलीकरण व रुंदीकरण कामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा जलसंधारण अधिकारी ए.एस.काबंळे, जिल्हा परिषदेचे जलसंधारण अधिकारी भोजराज, उपविभागीय जलसंधारण अधिकारी कातडे, अनुलोमचे विश्वनाथ देशमुख, मोटरगाचे सरपंच शेळके, हिब्बटचे सरपंच केंद्रे, नंदगावचे सरपंच हनमंत पाटील, नाम फाऊंडेशनचे राजाभाऊ शेळके तसेच परिसरातील शेतकरी आदींची उपस्थिती होती. जलयुक्त शिवार 2.0 या महत्वाकांक्षी योजनेमधून जिल्ह्यात अनेक जलसंधारणाची कामे हाती घेण्यात येत आहेत. तलाव, नाले यातील काढलेल्या गाळामुळे तलाव व नाल्याची साठवण क्षमता म...
error: Content is protected !!