Monday, June 29

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

क्रिकेट दरम्यान निर्णयामुळे गेम पलटी होणार नाही याची खबरदारी घ्यावी -आ.माधवराव पाटील जवळगावकर -NNL

Uncategorized
हिमायतनगर,अनिल मादसवार| क्रिकेटचे सामने घेताना आलेल्या खेळाडूंना सन्मानपूर्वक वागणूक दिली पाहिजे. क्रिकेट सुरु असताना कोणताही निर्णय घाईगडबडीत न घेता विचारपूर्वक घ्यावा. चुकीचा निर्णय दिला जाणार नाही याची खबरदारी घेतली तर क्रिकेटचे सामने सुरळीत होतील. आणि कोणत्याही संघावर किंवा खेळाडूवर अन्याय होणार नाही. यासाठी विचारपूर्वक निर्णय द्यावा अश्या सूचना आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी क्रिकेट सामने आयोजित करणाऱ्या कमिटीला केल्या. ते हिमायतनगर येथील राष्ट्रीय महामार्गाच्या लगत असलेल्या ड्रीम सिटी प्लॉटिंगच्या मैदानावर स्वर्गीय पंजाबराव पाटील जवळगावकर यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित क्रिकेट स्पर्धेचे दि.२० डिसेंबर रोजी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. स्पर्धेच्या सुरुवातीला स्वर्गीय पंजाबराव पाटील जवळगावकर यांच्या प्रतिमेला पुष्पह...

अर्धापूर तालुक्यातील देगाव कु. व डौर ग्रामपंचायतीवर महिलाराज -NNL

Uncategorized
अर्धापूर, निळकंठ मदने| तालुक्यातील देगाव कु व डौर ग्रामपंचायत निवडणुक निकाल मंगळवारी जाहीर झाला असून देगाव कु येथे उषा फुलारी तर डौर येथे राधा आढाव यांची थेट जनतेतून सरपंच पदी वर्णी लागली आहे. अर्धापूर तालुक्यातील दोन ग्रामपंचायतीचा निवडणूक निकाल जाहीर झाला असून देगाव कु.येथे उषा राजेश्वरराव फुलारी १०२० मते घेऊन विजयी झाल्या तर मीरा रघुनाथ आमलगौंड यांचा ६७ मतांनी पराभव झाला आहे. भगवान कदम, रेणुका देविदास राजाळे, जिजाबाई गंगाधर कदम, लक्ष्मीबाई बालाजी कदम, संतोष कदम, रामकृष्ण कदम, मिरा महेंद्र अटकोरे, अर्चना संजय कदम,विश्वांभर नागोराव कदम सदस्य निवडून आले आहेत. डौर ग्रामपंचायत सरपंच पदी आढाव राधाबाई नरोजी आढाव या २५२ मतांनी विजयी झाल्या तर शितल अशोक शिंदे ९१ मतांनी पराभूत झाल्या येथील सदस्य अनिताबाई मधुकर राठोड,रामा जाधव,सिताबाई रघुनाथ शिंदे, श्यामबाला संदिप शिंदे,ज्ञानेश्वर शिंदे,...

रग्बी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी नांदेड जिल्ह्यातील दोन खेळाडूची महाराष्ट्र रग्बी संघात निवड…NNL

Uncategorized
नांदेड। नेरळ जिल्हा रायगड या ठिकाणी वयोगट १४ वर्षातील मुलीच्या संघात या खेळाडूंनी कर्णधार व उपकर्णधार म्हणून खेळाची पारी सांभाळत खेळ खेळत व्यवस्थित रित्या आपल्या संघाला सेमी फायनल पर्यंत पोहोचवले तसेच पहिलाच गोल करून आपल्या संघाला खेळ प्रदर्शन चांगल्या रीतीने करत असताना त्याच कामगिरीच्या बदल्यात त्या दोघींची महाराष्ट्र रग्बी निवड चाचणी सरावासाठी निवड झाली होती. महाराष्ट्र निवड प्रशिक्षण शिबिर दि.१६ ते १९ दरम्यान नंदुरबार जिल्हा येथे चालू असताना त्यामध्ये महाराष्ट्र भरातून आलेल्या खेळाडूंमध्ये नांदेड जिल्ह्यातील (केंद्रीय विद्यालय एस सी आर नांदेड) कु.आदिती प्रवीणराव बोरकर, (विमल इंग्लिश स्कूल भोकर) कु.किंजल गोविंद थोरात या दोन खेळाडू मुलींची रग्बी फुटबॉल महाराष्ट्र संघात निवड झाली असून दि. २१ ते २३ रोजी अहमदाबाद, गुजरात राज्य येथे होणाऱ्या राष्ट्रीय रग्बी स्पर्धेत भारतभरातून आलेल्या ...

लोहा तालुक्यातील ग्रामपंचायत कांजाळा येथे गुरुकृपा युवा परिवर्तन ग्राम विकास पॅनलचे एकतर्फी वर्चस्व -NNL

Uncategorized
नांदेड। लोहा तालुक्यातील ग्रामपंचायत कांजाळा येथे थेट जनतेतून संरपचपदासाठी गुरूकृपा युवा परिवर्तन ग्राम विकास पॅनलचे शामसुंदर माधवराव लोहकरे हे विजयी झाले या पॅनलचे नऊ पैकी आठ ठिकाणी उमेदवार विजयी झाले आहेत. लोहा तालुक्यातील कांजाळा येथील प्रतिष्ठेचा व अटीतटीच्या लढतीत तिन पॅनल मध्ये निवडणूक झाली यात थेट सरपंच पदासाठी गुरुकृपा युवा परिवर्तन ग्राम विकास पॅनलचे शामसुंदर माधवराव लोहकरे हे विजयी झाले तर सदस्यांसाठी माया कामाजी मरवाळे,वनिता माधव आढाव, सुमनबाई वामनराव लोहकरे,सायराबी इस्माईल साब शेख,महालनबाई गुणाजी पेटे,अनुसयाबाई केशव भोंग , चंद्रकांत संजय लोहकरे,कैलास सखाराम गायकवाड हे उमेदवार विजयी झाले. तर नऊ जागा पैकी आठ जागा जिंकून एकतर्फी विजय मिळवला तर अपक्ष उमेदवार गणपत शामा जाधव हे विजयी झाले असुन ग्रामस्थांनी जल्लोष व्यक्त करत विजयी उमेदवार यांच्ये स्वागत केले आहे. तर युवा भाजपा न...

बळीरामपुर ग्रामपंचायत थेट संरपचपदी अपक्ष सौ.रेणुका इंद्रजित पांचाळ…NNL

Uncategorized
नविन नांदेड। नांदेड तालुक्यातील व दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सर्वात मोठ्या असलेल्या बळीरामपुर ग्रामपंचायत थेट जनतेतुन संरपचपदचा निवडणुकीत संरपचपदी अपक्ष उमेदवार सौ.रेणुका इंद्रजित पांचाळ तर ग्रामपंचायत सदस्य पदासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य आंंनद गुंडीले यांच्या ग्रामविकास पनलला ७ व अपक्ष ८ वंचित बहुजन आघाडीला दोन असे १७ सदस्य निवडून आले आहेत, या झालेल्या निवडणुकीत धक्कादायक निकाल लागल्याने प्रस्थापित यांना धक्का बसला असुन विजयी उमेदवार यांच्ये ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे. बळीरामपुर ग्रामपंचायत निवडणूक साठी ७ उमेदवार संरपचपदासाठी तर १७ ग्रामपंचायत सदस्य साठी ८५ उमेदवार निवडणूक रिंगणात होते,१८ डिसेंबर रोजी झालेल्या मतदान निवडणूक मध्ये ६३ टक्के मतदान झाले होते. २० रोजी नांदेड येथील उपविभागीय कार्यालय येथे जिल्हाधिकारी तहसीलदार किरण अंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकार...

नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन हदतील चार गावातील संरपच व सदस्यांची निवड…NNL

Uncategorized
नविन नांदेड। ग्रामीण पोलीस स्टेशन हदतील थेट संरपच पदासाठीच्या निवडणूकीत बळीरामपुर येथे सौ.रेणुका पांचाळ, मार्कड नेहा बालाजी शिंदे, सिध्दनाथ सटवाजी शामराव तारू, पांगरी सौ .निलावती भिमराव घोगरे, यांच्यी थेट जनतेतून निवड झाली आहे तर ग्रामपंचायत सदस्य यांच्यी ही निवड झाली आहे. १८ डिसेंबर रोजी ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत चार गावातील ग्रामपंचायत निवडणूक झाल्यानंतर २० डिसेंबर रोजी तहसील कार्यालय येथे मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आला. सिध्दनाथ येथे थेट जनतेतून संरपचपदासाठी सटवाजी शामराव तारू हे विजयी झाले तर ग्रामपंचायत सदस्य हे निवडणूक पुर्व बिनविरोध निवड झाली,यात दुर्गजी संभाजी आवातिकर,वंदना बाई शिवाजी दगडफोडे,स्नेहा एकनाथ दगडफोड, नारायण नंदाजी आवातिरक, सुमनबाई राजेराम खाडे ,किष्णाबाई दतराम अवातिरक हे होत. मार्कंड येथे संरपच पदासाठी नेहा बालाजी शिंदे हे निवडणून आल्या आहेत तर ग्रामपंचा...

५० खोके एकदम ओक्के पण आत्मचिंतन कधी करणार..? -NNL

Uncategorized
५० खोके, एकदम ओके ही घोषणा सध्या महाराष्ट्रात फारच गाजत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर या घोषणेचा जन्म झाला. शिंदे सरकार पदारुढ झाल्यापासून ५० खोके हा शब्द रोज कोणाच्या तरी मुखातून बाहेर पडतो. शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे तर एकही भाषण ५० खोक्याचा उद्धार केल्याशिवाय पूर्ण होत नाही. नागपुरच्या हिवाळी अधिवेशनात या घोषणेचे फलक झळकले आहेत. खरे म्हणजे ही घोषणा महाराष्ट्राला लाजेने माने खाली घालायला लावणारी आहे. दुर्देव असे की आजच्या राजकारणाचा समाजकारणाशी काहीही संबंध राहिला नसून राजकारण म्हणजे अर्थकारण झाले आहे. ही घोषणा त्याचेच द्योतक आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील आमदार फोडताना त्यांना ५० कोटी रुपये प्रत्येकी दिले असा या घोषणेमागे आरोप आहे. ५० खोके म्हणजे ५० कोटी रुपये. आता हा पैसा आमदारांना खरोखरच दिला की नाही याचा काही पुरावा नाही...

खा.चिखलीकर यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब; ग्रामपंचायत निवडणूकीत नांदेड जिल्ह्यात भाजपा नंबर एकवर – NNL

Uncategorized
नांदेड| जिल्ह्यातील 179 ग्रामपंचायत निवडणूकीचा अंतिम निकाल लागला असून 97 ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकला आहे. खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वावर ग्रामीण मतदारांनी शिक्का मोर्तब केल्यामुळे ग्रामपंचायत निवडणूकीत भारतीय जनता पार्टी जिल्ह्यात नंबर एकवर आहे तर दुसर्‍या क्रमांकावर राष्ट्रवादी तर तिसर्‍या क्रमांवर जाण्याची नामुष्की काँग्रेसवर ओढावली आहे. गेल्या दोन दिवसापूर्वी नांदेड जिल्ह्यातील 179 ग्रामपंचायतच्या निवडणूकीसाठी मतदान झाले. मंगळवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सायंकाळी उशिरा अंतिम निकाल हाती आला आहे. नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार तथा भाजपाचे नेते प्रतापराव पाटील चिखलीकर व भाजपाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगांवकर यांच्या नेतृत्वावर ग्रामीण भागातील जनतेने विश्‍वास व्यक्त करीत या निवडणूकीत भाजपाला एक नंबर पक्ष असल्याचा शिक्कामोर्तब केला आहे. या निवड...

श्रद्धा वालकर हत्या प्रकरण जलदगती न्यायालयात चालावे यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांना विनंती करणार -NNL

Uncategorized
नागपूर| श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी आरोपीला लवकरात लवकर कडक शिक्षा व्हावी यासाठी हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना विनंती करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. विधानसभा सदस्य अतुल भातखळकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवेळी झालेल्या चर्चेस उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, श्रद्धा वालकर हत्या प्रकरण ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. या प्रकरणाचा तपास दिल्ली पोलिस करत आहेत. यापूर्वी श्रद्धाने तिला होत असलेल्या त्रासाबद्दल पोलिसात तक्रार दिली होती. महिन्याभराने नंतर ती तक्रार मागे घेण्यात आली. याप्रकरणी कोणाचा दबाव होता का, याची विशेष पथकामार्फत चौकशी केली जाईल, असे त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, श्रद्धा वालकर हत्या प्रकरणानंतर...

मिनी ऑलिंपिकच्या निमित्ताने पुण्याचे क्रीडावैभव देशपातळीवर पोहोचविण्याची संधी -विभागीय आयुक्त सौरभ राव -NNL

Uncategorized
पुणे| महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे आयोजित करण्यात येत असलेल्या मिनी ऑलिंपिक स्पर्धेच्या निमित्ताने पुण्याचे क्रीडा वैभव आणि क्रीडा क्षेत्रातील ओळख देशपातळीवर पोहोचविण्याची संधी आहे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी केले. विधानभवन येथे महाराष्ट्र ऑलिंपिक स्पर्धा आयोजनाच्या पूर्वतयारीसाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक संघटनेचे सचिव नामदेव शिरगावकर, उपायुक्त नयना बोदार्डे, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, माहिती उपसंचालक डॉ.पुरुषोत्तम पाटोदकर उपस्थित होते. श्री.राव म्हणाले की, महाराष्ट्र ऑलिंपिक स्पर्धेचे आयोजन पुण्यासाठी गौरवाची बाब आहे. दोन दशकानंतर असे आयोजन पुण्यात होत आहे. यासोबत जी-२० बैठका आणि एटीपी टेनिस स्पर्धेचे देखील आयोजन नववर्षाच्य...
error: Content is protected !!