उमरखेड l लोकशाहीर कॉ.डॉ.आण्णाभाऊ साठे नगर हे १०० टक्के मातंग वस्ती असलेले नगर असून ते मागिल २५ वर्षांपासून नागरी सुविधा पासून वंचीत आहे.


तेथील राहणाऱ्या मातंग समाजातील नागरिकांना घरटॅक्स पावती,घर नंबर,रस्ते,नाल्या,अभ्यासिका, अंगणवाडी,खेळाचे मैदान,समाज मंदिर आदी नागरी सुविधा देण्यात याव्यात यासाठी मागील दोन वर्षापासून मोर्चे आंदोलने काढून पाठपुरावा सुरु आहे.


दि.२८ एप्रिल रोजी साठे नगर येथे माकप नेते कॉ.गंगाधर गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत व त्यांच्या हस्ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष प्रणित लोकविकास संघर्ष समिती फलाकाचे अनावरण केले.

दुपारी ३ वाजता फलकाचे अनावरण करून दुर्लक्षित असलेल्या वस्तीपासून नगरपरिषदेवर मोर्चा काढण्यात आला आणि मुख्याधिकारी श्री महेश पाटील यांच्यासोबत चर्चा करून उपरोक्त मागण्याचे निवेदन देण्यात आले. मुख्याधिकारी यांनी लेआऊट, सातबारा, गृहनिर्माण संस्थेचे प्रमाणपत्र आणि उपविभागीय अधिकारी यांनी जमीन दिल्याचे कागजपत्र सादर करण्यासाठी मोर्चेकऱ्यांना सांगितले.

त्यावर लोकविकास संघर्ष समितीने आक्षेप घेतला आणि ती सर्व कागजपत्र नगरपरिषद कार्यालया कडे आहेत आपण स्वतः पुढाकार घ्यावा आणि मागण्यांची पूर्तता करावी अशी मागणी केली.
संबंधित अण्णाभाऊ साठे नगर येथे राहत असलेल्या ७ ते ८ राहिवाशांना नगरपरिषद उमरखेड कडून घरटॅक्स पावती व घर नंबर देण्यात आले आहेत.
आणि इतरांप्रति दुजाभाव केला जात असल्याचा आरोप माकपच्या वतीने करण्यात येत आहे.
सरसगट सर्वांना घरटॅक्स पावती व घर नंबर देण्यात यावा तसेच नागरी सुविधा पुरविण्यात याव्यात यासाठी नगरपरिषदे समोर २८ एप्रिल पासून आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे.यापूर्वी दि.८ ऑक्टोबर २०२४ रोजी येथील नागरिकांनी माकपच्या नेतृत्वात धडक मोर्चा काढून ह्याच मागण्या केल्या होत्या.
तेव्हा मुख्याधिकारी यांनी कामे करून मागण्याची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले होते.
परंतु अद्याप मागण्याची पूर्तता झाली नाही.
या मोर्चाचे नेतृत्व कॉ.गंगाधर गायकवाड,कॉ.नारायण साबळे, कॉ. ज्योती जोगदंड, कॉ.पंडित जोगदंड,कॉ.रत्नमाला गायकवाड, कॉ.उज्वला कांबळे,कॉ.संतोष पवार,कॉ.शारदा साबळे, कॉ. नंदा कांबळे आदींनी केले तर स्थानिक समितीच्या सचिव कॉ.ज्योती जोगदंड,अध्यक्ष कॉ. नारायण साबळे, कॉ. जयराज गायकवाड, कॉ. चंद्रकांत लोखंडे, कॉ. सुभाषचंद्र गजभारे,कॉ.सुनील गायकवाड आणि कॉ.नंदा कांबळे यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे.
यावेळी पोलीस ठाण्याचे बिट जमादार श्री संतोष चव्हाण, अंमलदार श्री जाधव आणि गोपनीय शाखेचे श्री किरण राठोड यांनी चोख पोलीस बंदोबस्त दिला.
जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आंदोलन थांबविण्यात येणार नाही असे कॉ.गंगाधर गायकवाड यांनी कळविले आहे.