नांदेडमहाराष्ट्र

Vande Bharat Railway line : वन्दे भारत रेल्वे मार्गात हजुरसाहिब नांदेडला जोडण्याची मागणी -NNL

नांदेड| भारत देशात प्रवासी वाहतूक क्षेत्रात मोठी क्रांती घडवणाऱ्या वन्दे भारत या जल्दगती रेल्वे गाडीच्या मार्गात पवित्र पावन स्थल हजुरसाहेब नांदेड रेल्वे स्थानाकास जोडण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र सिख असोसिएशन मुंबई तर्फे करण्यात आली. रविवार, दि. 22 सप्टेम्बर रोजी महाराष्ट्र सिख असोसिएशन मुंबईचे समन्वयक स. मलकीत सिंघ बल यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने केंद्रीय गृहराज्य मंत्री श्री नित्यानंद राय यांची भेट घेऊन वरील मागणी प्रस्तुत करण्यात आली.

यावेळी गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ विजय सतबीर सिंघ यांची ही उपस्थिती होती. महाराष्ट्र सिख असोसिएशनचे मुख्य संयोजक सरदार दलजीत सिंघ बल यांनी वरील विषयी माहिती देताना सांगितले की सध्या वन्दे भारत रेल्वेच्या माध्यमातून देशाच्या प्रमुख केंद्रांना जोडण्याचे कार्य प्रगतिपथावर आहे. देशातील अनेक धार्मिक स्थळांना वन्दे भारतच्या मार्गाने जोडण्यात येत आहे.

नांदेड येथील सचखंड श्री हजुरसाहेब या तीर्थंस्थळाला लाखोंच्या संख्येत भाविक भेट देतात. जर वन्दे भारतच्या मार्गात नांदेडचा समावेश केला गेला तर भाविकांना आणी मराठवाड्यातील नागरिकांना त्याचा लाभ मिळेल. केंद्रीय गृहराज्य मंत्री नित्यानंद राय यांनी प्रस्तुत मागणी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या पर्यंत पोहचविण्याचे आश्वासन दिले असे दलजीत सिंघ बल आणि मालकितसिंघ बल यांनी सांगितले.

वन्दे भारत मुळे लाभ : वन्दे भारत रेल्वेगाडीला नांदेड जोडले गेले तर त्यामुळे वाहतूक क्षेत्रात क्रांती घडून येईल यात दुमत नाही. यामुळे नांदेड ते मुंबई प्रवास सहा तासात पूर्ण होऊ शकते. तसेच शिर्डी आणी इतर धार्मिक क्षेत्राच्या दर्शनासाठी भाविकांना सोयी उपलब्ध होतील. यामुळे मराठवाड्यातील प्रवाशीयांना, व्यापाऱ्यांना कमी वेळात आपले गणतंव्य गाठता येतील. नवीन रेल्वे मार्ग विकसित होण्यास मदत मिळेल. वन्दे भारत मुळे नांदेड ते अमृतसर सोळा तसात गाठणे शक्य होईल. तसेच दक्षिण राज्यातील मोठ्या महानगराना एका दिवसात भेट देणे देखील शक्य होणार आहे. शिवाय कोलकाता व पूर्वोत्तर राज्यांना कमी वेळात पोहोचणे शक्य होईल.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!