
उस्माननगर, माणिक भिसे| कंंधार तालुक्यातील पेठवडज येथील शेतकरी सुरेश मुगावे व नायगाव तालुक्यातील रातोळी येथील शेतकरी राम गायकवाड शेतकऱ्यांचे 2021 साली सोयाबीन,तुला खरेदी करून व्यापारी दिलीप बाबुराव येवतीकर (गायकवाड) रा.येवती ता.मुखेड यांनी पैसे दिले नसल्यामुळे पिडीत शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने सदरील व्यापाऱ्यांविरोधात भादवी 420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु अद्याप आरोपीला अटक करण्यात आली असल्याने पिडित शेतकऱ्यांनी उपविभागी पोलीस अधिकाऱ्यांना 15 जुलै रोजी निवेदन देऊन अटक करण्याची मागणी केली आहे .


व्यापारी दिलीप येवतीकर यांनी सुरेश मागावे यांच्याकडून 12 क्विंटल 28 किलो सोयाबीन दोन क्विंटल 65 किलो तुर असे 1 लाख 8 हजार 795 रुपयाचा किती मला खरेदी केले तर साथीदाराचा मला त्यांच्या कडून सोयाबीन तूर हरभरा असे 1 लाख 44 हजार रुपयाचा धान्य खरेदी करून पैसे देण्यासाठी टाळाटाळ करून शेतकऱ्यांना 2021पासुन अध्याप पैसे दिले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे. परंतु नायगाव पोलीस स्टेशनकडून अध्याप आरोपीस अटक केली जात नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे..




