Sahasrakund waterfall : निसर्गनिर्मित सहस्रकुंड धबधबा पर्यटकांचे वेधतो लक्ष

हिमायतनगर, अनिल मादसवार| सप्टेंबर महिन्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने निसर्गाचा अद्भुत चमत्कार ठरलेला सहस्रकुंड धबधबा ओसंडून वाहत असून, पर्यटकांचे मोठे आकर्षण ठरत आहे.

नांदेड जिल्ह्यातील किनवट, हिमायतनगर तालुक्यासह विदर्भातील उमरखेड, ढाणकी परिसरात यंदा चार ते पाच वेळा मुसळधार पाऊस झाला. त्यासोबतच ईसापुर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे मराठवाडा-विदर्भ सीमेवरून वाहणारी पैनगंगा नदी दुथडी भरून वाहते आहे.

याच नदीच्या प्रवाहावर अवलंबून असलेला सहस्रकुंड धबधबा चौथ्यांदा ओव्हरफ्लो होऊन प्रवाहीत झाला आहे. शुक्रवारी रात्री झालेल्या पावसानंतर नदीचे पाणी प्रचंड वेगाने वाहू लागले असून, शेकडो फूट उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्याचे फवारे अंगावर येताच पर्यटकांच्या अंगावर शहारे येत आहेत.

शनिवार-रविवारी हे निसर्गरम्य दृश्य पाहण्यासाठी दूरवरून पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. परिसर हिरवाईने नटल्याने व धबधब्याचा कर्णमधुर आवाज घुमल्याने पर्यटकांचे मन प्रसन्न होत असून, या रम्य निसर्गदर्शनाचा आनंद घेत डोळ्यांचे पारणे फेडत आहेत.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button