नांदेडसोशल वर्क

Gram Panchayat ; ग्रामपंचायत स्तरावर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची प्रभावीपणे अमलबजावणी

नांदेड l ग्रामविकास विभागाने ग्रामपंचायत स्तरावर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत सर्व विभागांनी अधिसूचीत केलेल्या सेवा आपले सरकार सेवा केंद्रामार्फत नागरीकांसाठी उपलब्ध करून देण्यास मंजूरी दिली आहे.

नांदेड जिल्ह्यात ग्रामीण भागात 816 आपले सरकार सेवा केंद्र आहेत. येत्या 1 मे पासून ग्रामपंचायत स्तरावरील आपले सरकार सेवा केंद्रामार्फत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत अधिसूचित केलेल्या 536 सेवा नागरीकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांनी ग्रामपंचायत स्तरावरील आपले सरकार सेवा केंद्रामार्फत सर्व सेवा उपलब्ध करून घ्याव्यात, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागा मार्फत करण्यात आले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हा कायदा राज्यभरात 28 एप्रिल 2015 पासून लागू करण्यात आला आहे. 28 एप्रिल 2025 रोजी सदर कायद्याचे अंमलबजावणीस 10 वर्ष पुर्ण होत असल्यामुळे दशकपुर्ती सोहळा साजरा करण्यात येणार आहे. तसेच 28 एप्रिल हा दिवस “सेवा हक्क दिन” म्हणून जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत स्तरावर साजरा करण्यात येणार आहे. 28 एप्रिल रोजी जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायतीच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात येणार असुन विशेष सभेत सर्व ग्रामपंचायत सदस्यांना महाराष्ट्र लोकसंवा हक्क अधिनियम 2015 च्या प्रतीचे वाटप करण्यात यावे. विशेष सभेत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम या कायद्याच्या ठळक तरतूदीचे वाचन करण्यात येणार आहे.

नांदेड जिल्हयात 1 हजार 310 ग्रामपंचायती असुन ग्रामीण भागात 816 आपले सरकार सेवा केंद्र सुरू आहेत. शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार ग्रामीण भागातील नागरीकांना आपले सरकार सेवा केंद्रामार्फत सेवा देण्यात येतात. ग्रामीण भागातील आपले सरकार सेवा केंद्र आदर्श बनविण्याबाबत शासन स्तरावरून आदेशीत केल्याप्रमाणे जिल्हयातील 5 हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायत स्तरावरील आपले सरकार सेवा केंद्र आदर्श बनविण्याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मेघना कावली यांच्या संकल्पनेतुन स्पर्धा आयोजीत करण्यात आली. सदर स्पर्धेत जिल्हयातील 49 आपले सरकार सेवा केंद्र हे आदर्श बनविण्यात आले.

जिल्हयातील 49 आदर्श आपले सरकार सेवा केंद्र हे 28 एप्रिल पासुन सुरू करण्यात येणार असुन ग्रामीण भागातील सर्व आपले सरकार सेवा केंद्रामार्फत 1 मे 2025 पासुन महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत सर्व विभागाच्या 536 अधिसुचीत केलेल्या सेवा नागरीकांना देण्यात येणार आहेत. सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय 27 मार्च 2025 अन्वये आपले सरकार सेवा केंद्रांतर्गत येणाऱ्या नागरीकांना घरपोच सेवा देण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर सेवादुत नेमन्यात येणार आहेत असे जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पं.) श्रीमती मंजुषा जाधव (कापसे) यांनी संगीतले.

जिल्हयात महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची अमलबजावणी प्रभावीपणे सुरू असुन 1 मे 2025 नंतर ग्रामपंचायत स्तरावर ऑफलाईन प्रमाणपत्र देण्यात येणार नाहीत. ग्रामीण भागातील सर्व नागरीकांनी आपल्याला आवश्यक असलेले दाखले ग्रा.पं. स्तरावरील आपले सरकार सेवा केंद्रातुन उपलब्ध करून घ्यावेत, असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांनी केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button