उस्माननगर, माणिक भिसे | शनिवारच्या मध्यरात्री पासून जोरदार पावसाने हजेरी लावली होती. रविवारीही दिवसभर पावसाने झोडपले दोन तीन दिवस झालेल्या संततधार व जोरदार पावसाने नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे शेतात पाणीच पाणी झाल्याने खरिपाचे पिके खरडून गेली असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. जिल्ह्यासह उस्माननगर परिसरात झालेल्या अतिवृष्टीने व पुरामुळे अनेकांची शेती खरडून व सखल भागातील पिकात पाणी साचून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे .
परिसरात झालेल्या संततधार पावसामुळे घरांची ही पडझड झाली आहे. कंधार तालुक्यातील उस्माननगर सह परिसरात रविवारी दि. १ रोजी झालेल्या संततधार पावसामुळे शेतशिवारात पाणीच पाणी चहूकडे झाल्याने खरिपाचे पिक पाण्याने खरडून नेले आहे. या पावसामुळे परिसरात पुरपरिस्थितीने नदी नाल्यांना पूर येऊन जमिनी खरडून, व सखल भागातील शेतातील पिकात पाणी साचून परिसरातील शिवारातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.