हदगांव, शेख चांदपाशा| तालुक्यातील सात गाव करिता शहराच्या परिसरातील शिवरस्ता मोकळा करावा अशी मागणी संघर्ष समितीचे अध्यक्ष आत्माराम जाधव यांनी नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांना निवेदन देऊन केली.


त्यांनी दि. 30 एप्रील 2025 च्या दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हदगांव तालुक्यातील वाटेगांव, बनचिंचोली, गोर्लेगांव, बाभळी, गुरफळी, बेलमंडळ, कोथळा या सात गांवामध्ये उसाची लागवड भरपुर प्रमाणात आहे. त्यामुळे सदर उसाची वाहाने साखर कारखाण्यास नेण्याकरीता व इतर पिकांच्या (सोयाबीन, हरभर, तुर ईत्यादी) मालाची विक्री करण्यासाठी हदगांव शहराच्या मुख्य बाजार पेठे मधुन जावे लागत. हदगांव शहरामधील रस्ते हे अत्यंत कमी रूंदीचे म्हणजेच १० फुटाचे असुन, सदर रस्त्यावर जड वाहने नेतांना वाहन धारकांना जिव मुठीत ठेवुन सदर रस्त्यावर प्रवास करावा लागतो.


तसेच सदर रस्त्यांवर बरीच जिवीत हानी झाली आहे. हा रस्ता अरुंद असल्यामुळे कारखाना सुध्दा आमच्या सात गांवाच उस वेळेवर नेण्यास टाळाटाळ करतो म्हणून वेळेवर उस जात नाही. उस नेण्याचा कालावधी वाढल्यामुळे उसाचे वजन सुध्दा कमी येते. यामुळे भरपुर शेतक-यांचे आर्थीक नुकसान होते आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रत्येक्ष नुकसान होत असून, आम्ही या समस्येबाबत वारंवार वरिष्ठ निवेदन केले असून आमच्या निवेदनाचे अद्यापही कोणीही दखल घेतलेली नाही. शिव रस्ते मोकळे करून रिंग रोड करून मुख्य राज्य मार्ग राष्ट्रीय महामार्गाला जोडून स्वतंत्र रस्ता उपलब्ध करून द्यावं. जेणेकरून सात गावातील लोकांचा रस्त्याचा प्रश्न निकाली निघेल अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर नागोराव सुर्यवंशी, अजय नरवाडे, विवेक वानखेडे, संदीप पालकर यांच्या सह्या आहेत.

हदगाव शहराला मुख्य प्रवेश रोड एकच असून, शहरातील अरुंद रस्ते त्यावर अतिक्रमण असल्याने या शहरातून परिसरातील ग्रामीण भागातील शहराकडे येणाऱ्या नागरिकांना शहरातूनच जावे लागते. इतर वाहनांना याचा फार त्रास होतो विशेष म्हणजे याबाबतीत अद्यापही कोणत्याही राजकीय पक्षाच्या नगराध्यक्ष, आमदार, खासदार यांनी जिवलग प्रश्नाबाबत प्रस्ताव आवाज उठवलेला दिसून येत नाही. विशेष म्हणजे शहरातून शासकीय पादण रस्ता अंबाळा शिव पर्यत आहे. पण काही राजकीय नेत्यांच्या जवळचे व काही धानड्य व्यकती व व्यापाऱ्यानी ती शासकीय पादणच गायब केली आहे. शहराच्या बायपास किवा रिंग रोडच्या संदर्भात नियोजन केल्याचे दिसून येत नाही. याबाबत आता तरी आमदार खासदार यांनी या जीवलग प्रश्नाकडे लक्षदेतील काय..? याकडे सर्वसामान्य शहरातील जनतेचे लक्ष लागले आहे..!
