Sunday, July 5

नांदेड

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना व स्वाभिमान योजने अंतर्गत मंजूर झालेली जमीन वाटप करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण – NNL

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना व स्वाभिमान योजने अंतर्गत मंजूर झालेली जमीन वाटप करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण – NNL

नांदेड
नांदेड| वस्ताद लहुजी साळवे यांच्या नावाची कमान लावण्याच्या वादातून जातीयवादाकडून संदीप गंगाधर जाधव यांची निघृण हत्या करण्यात आली होती. पिडीत कुटूंबाला दिलासा म्हणून शासनाने 2 एकर जमीन मंजूर करण्यात आली होती. ती पिडीत मंजूर झालेली जमीन देण्यास सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, नांदेड हे गेल्या चार वर्षापासून टाळाटाळ करीत असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवार दि.24 जून 2024 पासून पिडीत वंचित लाभार्थी गंगाधर जाधव यांनी आमरण उपोषणास सुरूवात केली आहे. आजचा उपोषणाचा चौथा दिवस आहे. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजने अंतर्गत 2 एकर जमीन बागायत जमीन मिळवून देण्याचे पत्र शासनाच्यावतीने जिल्हाधिकारी नांदेड व लाभार्थ्याला दिले होते. सर्व कागदपत्रांची पुर्तता करूनही नांदेड येथील सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय यांनी विनाकारण टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हाध...
सहयोग सेवाभावी संस्था संचलित कॉलेज ऑफ फार्मसीच्या सात विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्हयू मध्ये निवड -NNL

सहयोग सेवाभावी संस्था संचलित कॉलेज ऑफ फार्मसीच्या सात विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्हयू मध्ये निवड -NNL

नांदेड
नांदेड| जिल्हयाच्या शिक्षण क्षेत्रात मोलाची भर घालणाऱ्या सहयोग सेवाभावी संस्थेच्या कॉलेज ऑफ फार्मसी चे विद्यार्थी राजश्री शाहू कॉलेज ऑफ फार्मसी, बुलढाणा येथे आयोजित Alembic Pharmaceutical या कंपनी तर्फे घेण्यात आलेल्या कॅम्पस इंटरव्यू मध्ये 7 विद्यार्थी अनुक्रमे, गणेश अन्नपुर्णे, स्वप्नील हंबर्डे, सतीश पवार, नेहा हंबर्डे, पुनम मेश्राम, प्रतीक्षा हातागळे आणि अस्मिता बोकारे यांची निवड झाली आहे. सहयोग कॅम्पसच्या कॉलेज ऑफ फार्मसी मधून दरवर्षी अनेक विद्यार्थी व्यावसायिक पदविका प्राप्त करून नव्या रोजगाराची संधी निर्माण करतात. व्यवसाय आणि नोकरीची पुरेपूर हमी असलेले हे शिक्षण अलिकडच्या काळात अत्यंत महत्वपूर्ण ठरले आहे. डी.फार्मसी, बी.फार्मसी, एम.फार्मसी व फार्मा डी चे शिक्षण पुर्ण झाल्यानंतर या विद्यार्थ्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळावी यासाठी संस्था दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस सिलेक्शन...
हदगाव शहरात आतिक्रमणे बोकाळली … वाहतुकीची कोंडी – NNL

हदगाव शहरात आतिक्रमणे बोकाळली … वाहतुकीची कोंडी – NNL

नांदेड
हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव शहरातील मुख्यप्रवेश रोडवरील प्रशासनाच्या दुर्लक्षमुळे अतिक्रमणे दिवसेंदिवस वाढत असल्याने पदचा-याना व वाहनधारकांना रोडवरुन चालणे म्हणजे मृत्यला आमञण दिल्या सारखे झाले आहे. विशेष म्हणजे हदगाव शहरात मुख्यप्रवेश रोड एकच आहे. गेल्या ५० वर्षात आता पर्यत कोणत्या ही नगराध्यक्ष किवा आमदार खासदार या बाबतीत गार्भियन लक्ष घातलेले नाही. जर शहराच्या मुख्यप्रवेश रोडची अशी आवस्था असेल तर शहरातील रोडची काय...? परिस्थिती आसेल. शहरात एखादे वाहन जाण्यापुरत रोड जरी असले तरी पुढील वाहनाला जाण्यासाठी रोडच नाही अनेक महाभागानी सरकारी रोडवरच अतिक्रमण केलेले आहे. जर ऐखादी आप्रिय घटना घडली आग्निशमन वाहनाला जाण्यासाठी तितक्या रुदीचा रोड पण नाही ही वस्तुस्थिती आहे. शहरातील उमरखेड टी पाईट पासुन जुने बस्थानक तसे राठी चौक ते आझाद चौक या रोडवर प्रचंड प्रमाणात आतिक्रमण झालेले आहे. यामुळे वाह...
बारा वर्षीय मुलावर गंभीर लिम्फोवेनस विकृतीवर यशस्वी उपचार..यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद येथील तज्ञ डॉक्टरांचे यश -NNL

बारा वर्षीय मुलावर गंभीर लिम्फोवेनस विकृतीवर यशस्वी उपचार..यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद येथील तज्ञ डॉक्टरांचे यश -NNL

नांदेड
नांदेड। यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद येथे नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील बारा वर्षे वयाचा रुग्ण श्रेयश रविकांत कांबळे या मुलावर व्हॅस्क्युलर वेन्स मॉलफॉर्मेशन या गंभीर आजारावर यशस्वीरित्या उपचार करण्यात यशोदा हॉस्पिटल चे तज्ञ डॉक्टर भावीन राम व डॉक्टर प्रभाकर डी आणि त्यांच्या टीमला यश आले आहे. याविषयी अधिक माहिती अशी की नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील व्हॅस्क्युलर वेन्स मॉलफॉर्मेशन या आजाराचा रुग्ण असलेल्या श्रेयस कांबळे या मुलाला धावताना, चालताना ,बसताना , उठताना प्रचंड वेदना होत होत्या त्याला त्या आजाराचा त्रास मागील तीन ते चार वर्षापासून होता तो त्रास दिवसेंदिवस वाढतच जात होता. या आजारावर उपचारासाठी त्याने नांदेड येथील यशोसाई हॉस्पिटलचे अस्थिरोग तज्ञ डॉक्टर देवेंद्र पालीवाल यांच्याकडे संपर्क साधला त्यावेळी प्राथमिक तपासण्यानंतर डॉक्टर पालीवाल यांच्या लक्षात आले की हा आजार अत्यंत गंभीर...
ओबीसी, व्हीजेएनटी व एसबीसी विद्यार्थ्यांकरिता ‘महाज्योती’तर्फे मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाची सुवर्ण संधी -NNL

ओबीसी, व्हीजेएनटी व एसबीसी विद्यार्थ्यांकरिता ‘महाज्योती’तर्फे मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाची सुवर्ण संधी -NNL

नांदेड, लातूर
लातूर| शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर या स्वायत्त संस्थेमार्फत राज्यातील इतर मागास वर्ग (ओबीसी), विमुक्त जाती-भटक्या जमाती (व्हीजेएनटी) व विशेष मागास प्रवर्ग (एस.बी.सी) तील विद्यार्थ्यांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण राबविण्यात येते. सन 2024-25 या वर्षातील स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी महाज्योतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया 19 जून 2024 पासून सुरु केलेली आहे. हे अर्ज www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर 3 जुलै, 2024 पर्यंत स्वीकारण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेण्याचे आवाहन महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. महाज्योतीमार्फत युपीएससी(UPSC) नागरी सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण, एमपीएससी(MPSC) राज्यसेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण, एमपीएससी(MPSC) अभियांत्रिकी सेवा परीक्षा पू...
ग्रामसेवक,तलाठी,यांना मुख्यालयाची ॲलर्जी; माहूर तालुक्यातील नागरीकांची भटंकती -NNL

ग्रामसेवक,तलाठी,यांना मुख्यालयाची ॲलर्जी; माहूर तालुक्यातील नागरीकांची भटंकती -NNL

नांदेड, महाराष्ट्र
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। तालुक्यातील बहुतांश ग्रामसेवक, तलाठी मुख्यालयी तर राहत नाही व पुसद, किनवट, नांदेड, यवतमाळ.येथून अप -डाउन करतात ह्यामुळे शेतकरी, विद्यार्थी, नागरीक त्रस्त झाले आहेत . ग्रामसेवक आणि तलाठयांना मुख्यालयी राहण्याची सक्ती करण्यात यावी अशी मागणी समनक जनता पार्टी ता.अध्यक्ष रवी राठोड यांनी केली आहे. माहूर तालुक्यातील ग्रामीण भागातील विकासाचे तिन-तेरा वाजले असुन तलाठी व ग्रामसेवक हे मुख्यालयी राहत नसल्याने तालुक्यातील शेतकरी.विद्यार्थी.निराधार वर्ग व इतर नागरिकांना लहान-लहान कामासाठी शहर मुख्यालयी येवून तलाठी आणि ग्रामसेवकाचा शोध घ्यावा लागत आहे. सध्या शेतकऱ्यांना क्रॉप लोन, घरकूल.तसेच विद्यार्थ्यांना, जेष्ठ नागरिक, निराधार.ना काही दाखल्यांची आवश्यकता आहे. यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांना मुख्यालयी राहत नसलेल्या ग्रामसेवक आणि तलाठ्याचा शोध घ्यावा लगत आहे. ग्रामी...
हिमायतनगरात स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केलं -NNL

हिमायतनगरात स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केलं -NNL

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर| मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला. हिमायतनगर येथे स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने राधाकृष्ण विखे पाटील यांच्या फोटोला जोडे मारून प्रतिमेचे दहन करून एक मराठा लाख मराठा अश्या घोषणा दिल्या. यावेळी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्तेचा माज आलेल्या महसुल मंत्री राधाकृष्ण विखें पाटील हे नांदेड येथे आले असता त्यांनी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात बेताल वक्तव्य केलं होतं. स्वताचा मुलाचा पराभव पचला नसल्याने त्यांनी आकसा पोटी मनोज जंरागे पाटलांवर बेताल वक्तव्य करून मराठा समाज बांधवांच्या भावनांना ठेस पोचविली आहे. राधाकृष्ण विखे हे मराठा नेते आहेत, एकीकडे अन्य समाजाचे नेते वेगवेगळ्या पक्षात राहुन देखील आपल्या जातीच...
भारतीय स्टेट बँकेच्या फ्रॉड एस. एम. एस. मुळे ग्राहक हैराण, सायबर गुन्हे शाखा याचा शोध घेणार का ? -NNL

भारतीय स्टेट बँकेच्या फ्रॉड एस. एम. एस. मुळे ग्राहक हैराण, सायबर गुन्हे शाखा याचा शोध घेणार का ? -NNL

नांदेड, क्राईम
हिमायतनगर। गेल्या चार दिवसापासून हिमायतनगर शहर व तालुका परिसरात अँड्रॉइड मोबाईल फोनवर भारतीय स्टेट बँकेकडून रिवॉर्ड पॉईंट मिळवा. असा एक एस. एम. एस. सर्वांच्या मोबाईलवर फिरतो आहे, त्या सोबत असलेल्या लिंकला क्लिक केल्यास संबंधित व्यक्तीचा फोन हॅक होण्याचे प्रकार हिमायतनगर शहरात मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्याचे परिणाम हिमायतनगर शहरातील सोशल मीडियावर चालणाऱ्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर सुद्धा दिसून येत आहेत. अनेक ग्रुपचे नाव अचानकपणे बदलून तिथे भारतीय स्टेट बँकेचा लोगो व नाव येत आहे. त्यामुळे फोन हॅक होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या बाबीकडे भारतीय स्टेट बँक व सायबर सेल यांनी लक्ष देऊन नागरिकांची होणारी गैरसोय तात्काळ दूर करावी, अशी मागणी हिमायतनगर शहरातील प्रतिष्ठित व्यापारी व नागरिकांनी केली आहे. गेल्या काही वर्षांपासून डिजिटल मैद्याचा जमाना आल्याने इंटरनेटचा युगात सोशल मीडियाचा...
शेतकऱ्यांच्या मदतीच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी 30 जून अखेरची तारीख : अभिजीत राऊत -NNL

शेतकऱ्यांच्या मदतीच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी 30 जून अखेरची तारीख : अभिजीत राऊत -NNL

नांदेड
नांदेड| नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसंदर्भातील नुकसान भरपाई, मदत व प्रलंबित सर्व प्रकरणे 30 जून पर्यंत निकालात निघाले पाहिजे, असे सक्त आदेश आज संपूर्ण जिल्हा यंत्रणेला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत. राज्यस्तरीय आढावा बैठकीला उपस्थित महसूल व कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी व जिल्ह्यातील संपूर्ण यंत्रणेला त्यांनी याबाबतीत स्पष्ट निर्देश आज दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषी मंत्री धनंजय मुंडे, ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक सदस्य व वरिष्ठ अधिकारी मुंबईतून खरीप आढावा बैठकीत सहभागी झाले होते. तर जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा ...
मतदार यादीमध्ये आपल्या नावांची खातरजमा करण्यासाठी पुनरिक्षण कार्यक्रमात सहभागी व्हा : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत -NNL

मतदार यादीमध्ये आपल्या नावांची खातरजमा करण्यासाठी पुनरिक्षण कार्यक्रमात सहभागी व्हा : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत -NNL

नांदेड
नांदेड| मतदार यादी मध्ये आपले नाव नाही, आपले नाव व्यवस्थित नाही, छायाचित्र नाही, आपल्या नगरातील मृत व्यक्तींची नावे आहे, चुकीची नावे आहे अशा अनेक तक्रारी मतदानाच्या दिवशी केल्या जातात. मात्र या सर्व बाबींवर मात करण्याची संधी आता येणाऱ्या निवडणुकांसाठी भारत निवडणूक आयोगांनी मतदारांना दिली आहे. २५ जून पासून मतदान पुनरिक्षण कार्य नांदेड जिल्ह्यात सुरू झाला आहे. आपले नाव आहे अथवा नाही, याची खातरजमा करण्याची संधी आयोगाने दिली असून याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. भारत निवडणूक आयोगाने आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक विचारात घेऊन दि. 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (Special Summary Revision) घोषित केला आहे. 25 जुलै रोजी जिल्ह्यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रारूप निवडणूक यादी तयार होणार आहे...
error: Content is protected !!