Tuesday, July 14

नांदेड

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

‘Marathwada Bhushan’ award announced to Dr.Ashok Belkhode ; पुण्याच्या मराठवाडा समन्वय समितीचा डॉ.अशोक बेलखोडे यांना ‘मराठवाडा भूषण’ पुरस्कार जाहीर – NNL

‘Marathwada Bhushan’ award announced to Dr.Ashok Belkhode ; पुण्याच्या मराठवाडा समन्वय समितीचा डॉ.अशोक बेलखोडे यांना ‘मराठवाडा भूषण’ पुरस्कार जाहीर – NNL

करियर, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे l मराठवाडा समन्वय समिती, पुणे च्या वतीने देण्यात येणारा सामाजिक क्षेत्रातील 'मराठवाडा भूषण' पुरस्कार किनवट येथील जेष्ठ समाजसेवक डॉ. अशोक बेलखोडे यांना नुकताच जाहीर झाला आहे. हा पुरस्कार येत्या ता.१९ ला पुण्यात मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. मराठवाडा समन्वय समितीच्या वतीने २००९ सालापासून दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी बालगंधर्व रंगमंदिर पुणे, येथे मराठवाडा मुक्ती दिन महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. या कार्यक्रमात मराठवाड्यातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्वान व्यक्तींना पुण्यातील तमाम मराठवाडा वासीय व पुणेकरांच्या वतीने 'मराठवाडा भूषण' पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. डॉ.बेलखोडे हे सामाजिक क्षेत्रातील एक नामवंत व्यक्तिमत्व आहेत. ते मागील तीस वर्षाहून अधिक काळ नांदेड जिल्ह्यातील किनवट परिसरातील आदिवासी समाजासा...
Girish mahajan ; शासनाच्या कल्पक योजनातून महाराष्ट्राची आर्थिक संपन्न राज्याकडे वाटचाल : ना. गिरीश महाजन -NNL

Girish mahajan ; शासनाच्या कल्पक योजनातून महाराष्ट्राची आर्थिक संपन्न राज्याकडे वाटचाल : ना. गिरीश महाजन -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना अशा अनेक कल्पक योजनांच्या माध्यमातून आर्थिक सामाजिक संपन्नतेच्या महाराष्ट्राची पायाभरणी होत आहे. शासन या योजनांच्या माध्यमातून आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व रोजगाराच्या क्षेत्रातील संपन्न राज्याकडे वाटचाल करीत असल्याचे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज येथे केले. नांदेड येथील माता गुजरीजी विसावा उद्यानातील स्मृतीस्तंभावर मानवंदना व मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमानंतर त्यांनी जनतेला संबोधित केले. सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टी मधील सर्व नुकसाना संदर्भातील पंचनामे अंतिम टप्प्यात असून तातडीने शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. मराठवाडा मुक्ती संग्रामा...
Ashokrao Chavan ; स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना महायुतीकडून दिलासा खा. अशोकराव चव्हाण यांचा पाठपुरावा फळाला – NNL

Ashokrao Chavan ; स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना महायुतीकडून दिलासा खा. अशोकराव चव्हाण यांचा पाठपुरावा फळाला – NNL

नांदेड
नांदेड l राज्य शासनाच्या वर्ग-३ व वर्ग-४ पदांवर कार्यरत स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना महायुतीने मोठा दिलासा दिला असून, त्यांची सेवासमाप्ती होणार नसल्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी केलेला पाठपुरावा फलदायी ठरला आहे. एका न्यायालयीन आदेशामुळे स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांच्या नोकऱ्या संकटात आल्या होत्या. यातील काही लोकांनी तब्बल २५-३० वर्ष सेवा दिलेली होती. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती अन्यायकारक असल्याची बाब त्यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिली. यातील काही जणांनी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्याशी संपर्क साधून याविषयी राज्य सरकारकडून न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता खा. चव्हाण यांनी तातडीने विविध पातळ्यांवर राज्य सरकारशी चर्चा करून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरु केले....
A neglected ‘father’ man : चळवळीतला उपेक्षित ‘बाप’ माणूस – डॉ.शिवदास हमंद -NNL

A neglected ‘father’ man : चळवळीतला उपेक्षित ‘बाप’ माणूस – डॉ.शिवदास हमंद -NNL

नांदेड, लेख
भारत स्वतंत्र झाला. संपूर्ण देशामध्ये स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले. स्वातंत्र्याचा उत्साह सर्वत्र पसरला असताना आमच्या भागात प्रचंड खदखद आणि अस्वस्थता जुलमी रजाकारांचे अत्याचार हे कायमच हेाते. या कालावधीत स्वातंत्र्यप्रिय धाडसी व्यक्तिंनी मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्याप्रतीची भावना जाज्वल्य करण्यासाठी पुढाकार घेतला. मराठवाडा मुक्ती संग्रामातील पहिले हुतात्मा गोविंदराव पानसरे. गोविंदराव पानसरे हे पूर्वाश्रमींच्या औरंगाबाद अर्थात संभाजीनगर जिल्ह्यातील बदनापूरचे होत. हल्ली हे गाव जालना जिल्‌ह्यात आहे. गोविंदराव पानसरे यांची जन्मभूमी हल्लीची छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) असली तरी कर्मभूमी बिलोली तालुका होता. धर्माबाद, नायगाव हे दोन्ही तालुके पूर्णत: बिलोली तालुक्यात होते. २३७ गावांचा बिलोली तालुका, महाराष्ट्रातील सर्वात मोठा विस्तारलेला तालुका होता. तालुक्याच्या विभाजनानंतर धर्माबाद, उमरी, ना...
“Vatsalya” scheme : “वात्सल्य”योजनेच्या राष्ट्रीय कार्यक्रमात नांदेड जिल्ह्याचा सहभाग राहणार -NNL

“Vatsalya” scheme : “वात्सल्य”योजनेच्या राष्ट्रीय कार्यक्रमात नांदेड जिल्ह्याचा सहभाग राहणार -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या अल्पवयीन मुलांसाठीच्या “वात्सल्य” नावाच्या नव्या पेन्शन योजनेची सुरूवात 18 सप्टेंबर रोजी होत आहे. नवी दिल्ली येथून होणाऱ्या राष्ट्रीय शुभारंभ सोहळ्यात नांदेड जिल्ह्याचा ऑनलाईन सहभाग आहे. देशातील मोजक्या जिल्ह्यामध्ये नांदेडचा सहभाग निश्चित झाला असून हा कार्यक्रम नांदेड येथील केंद्रीय विद्यालयात होणार आहे. नांदेड जिल्ह्याच्या अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अनिल गचके यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय विद्यालय विमानतळ रोड नांदेड येथे 50 विद्यार्थी व 50 पालकांच्या सहभागात जिल्हा या राष्ट्रीय शुभारंभ कार्यक्रमात सहभागी होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन व अन्य मान्यवर या कार्यक्रमाला दिल्ली येथून संबोधित करणार आहेत.18 सप्टेंबर रोजी दुपारी 1 ते 4.30 या काळामध्ये हा कार्यक्रम होणार असून नांदेड येथील स्टेट बँक...
Immersion of Shree Murthy : ग्रामीण पोलीस स्टेशन ठाण्यातील श्री मुर्तीचे ढोलताशांच्या गजरात विसर्जन -NNL

Immersion of Shree Murthy : ग्रामीण पोलीस स्टेशन ठाण्यातील श्री मुर्तीचे ढोलताशांच्या गजरात विसर्जन -NNL

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड| ग्रामीण पोलीस स्टेशन येथील श्री गणेश मुर्तीचे ढोलताशांच्या गजरात गुलाब पुष्प उधळून मिरवणूक काढून दहाव्या दिवशी झरी खदान येथे विसर्जन करण्यात आले. ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गणेश चतुर्थीला ग्रामीण पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांच्या हस्ते विधीवत पुजन करून स्थापना करण्यात आली तर दैनंदिन आरती महाप्रसाद आयोजित करण्यात आले होते, दहा दिवसांच्या काळात भक्ती मय वातावरण मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन गढवे, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ.रेखा काळे, उपनिरीक्षक महेश कोरे भोसले,ज्ञानेश्वर मठवाड यांच्या सह महिला पोलीस कर्मचारी,पोलीस अंमलदार, होमगार्ड यांनी सेवा केली तर दव्हाया दिवशी उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिल कुमार नायक यांच्या हस्ते महाआरती करून महाप्रसाद वाटप करण्यात आल्यानंतर श्री विसर्जन मिरवणुक काढण्यात आली. ग्रामीण पोलीस स्टेशन ते विसर्जन मिरवणूक दरम्यान फेटा बांधलेल्या अ...
Dr.Hansraj Vaidya : उद्या 18 रोजी न भूतो “ज्येष्ठ नागरिकांची लक्षवेधी मागनी पदयात्रा-डाॅ.हंसराज वैद्य -NNL

Dr.Hansraj Vaidya : उद्या 18 रोजी न भूतो “ज्येष्ठ नागरिकांची लक्षवेधी मागनी पदयात्रा-डाॅ.हंसराज वैद्य -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| केंद्र व राज्य शासन अनेक लोकपयोगी तथा लोकप्रिय योजना कार्यान्वित करून अंमल बजावनी करताना दिसत आहेत. केंद्र शासनाने "आयुष्यमान भारत योजना,प्रधान मंत्री वयोश्री योजना,तर महाराष्ट्र शासनाने मुख्य मंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यान्वित करून अंमल बजावनी करत आहेत. पण ज्येष्ठ नागरिकांचे अनेक प्रश्न अनेक वर्षा पासून शासन दरबारी प्रलंबित आहेत.ज्येष्ठ नागरिकांच्या फेस्काॅम महासंघ व आयस्काॅन वरिष्ठ संघटणा,सहयोग ज्येष्ठ नागरिक संघासह राज्यातील इतरही ज्येष्ठ नागरिक संघ शासनाकडून त्या सोडऊन घेण्यासाठी सतत पाठपुरावा करत आहेत.पण स्थानिक लोकप्रतिनिधी, केंद्र व राज्य शासनही त्यांच्या मागण्यांकडे फारसे सकारात्मक दृष्टीने व संवेदनशील रित्या पहाण्यास तयार नाहीत! म्हणून उद्या दि.18/9/24 रोजी स्थानिक लोक प्रतिनिधी, महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाचे लक्ष वेध...
Gurdwara Board : गुरुद्वारा बोर्डात अडीच दशक घडलयं तरी काय? -लेखक : रविंद्रसिंघ मोदी – NNL

Gurdwara Board : गुरुद्वारा बोर्डात अडीच दशक घडलयं तरी काय? -लेखक : रविंद्रसिंघ मोदी – NNL

नांदेड, लेख
शीख धर्मियांचा ऐतहासिक आणि धार्मिक स्थान म्हणून तखत सचखंड श्री हजूर अबचल नगर साहिब गुरुद्वाराचे महत्व आबाधित असे आहे. सन 1708 पासून या पवित्र धामाची पाठपूजा आणि नियोजन स्थानीक शीख समाजाच्यावतीने करण्यात येत होते. पण मागील चौवीस (24) वर्षापासून गुरुद्वाराचे व्यवस्थापन करणारी गुरुद्वारा बोर्ड ही संस्था शासन मर्जीतल्या प्रशासकांच्या आधीन होऊन गेलेली आहे. हे शल्य स्थानीक शीख समाजाच्या मनास राहून राहून बोचत आहे. त्यात, जख्मावर मीठ चोळण्याचे काम तत्कालीन भारतीय जनता पक्षाच्या शासन कालावधीत फेब्रुवारी, वर्ष 2015 मध्ये करण्यात आले. गुरुद्वारा बोर्डाच्या अध्यक्षाची नियुक्ति शासन करेन असा एकतर्फा ठरावच तत्कालीन शासनाने विधानसभेत पारित करून घेतला. बोर्ड अध्यक्ष निवडीचे सदस्यांचे अधिकार शासनाधीन करण्यासाठी थेट कायदा 1956 मधील कलम आकरा सह इतर कलमांमध्ये मनमर्जी संशोधन करण्यात आले. त्याआधारे स्थानीक...
Dr. Jyoti Tai Waghmare : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना बंद करण्यासाठी कोर्टात गेलेल्या सावत्र भावाला त्यांची जागा दाखवा -डाॅ. ज्योतीताई वाघमारे -NNL

Dr. Jyoti Tai Waghmare : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना बंद करण्यासाठी कोर्टात गेलेल्या सावत्र भावाला त्यांची जागा दाखवा -डाॅ. ज्योतीताई वाघमारे -NNL

नांदेड, राजकीय
हिमायतनगर| राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे गोरगरिबांसाठी योजना आखून राज्यात उत्कृष्ट रित्या काम करीत आहेत. अहोरात्र मेहनत घेणारा मुख्यमंत्री आपणाला लाभला, ही खऱ्या अर्थानं भाग्याची गोष्ट आहे. परंतू राजकीय स्वार्थासाठी काहि लोक मुख्यमंत्र्यांना विरोध म्हणून विकासात्मक कामामध्ये खोडा घालण्याचे पाप करीत आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना बंद करा म्हणून उबाठा व काँग्रेस,राष्ट्र वादी शरद पवार गट कोर्टात गेले आहेत. त्यांचा फाजील पणा हाणून पाडण्यासाठी आगामी विधान सभा निवडणुकीत महायुतीचे बाबुराव कदम कोहळीकर यांना साथ देवून चांगल्या कामात खोडा घालणाऱ्यां विरोधकांना त्यांची त्यांना जागा दाखवून द्यावी. असे अवाहन शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या डाॅ. ज्योतीताई वाघमारे यांनी केले. हिमायतनगर येथील परमेश्वर मंगल कार्यालयांच्या प्रांगणात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण सन्मान सोहळा व साडी चोळी वाटपाचा ...
Today’s e-publication of the neglected father man ;चळवळीतला उपेक्षित बाप माणूस ग्रंथाचे आज ई प्रकाशन – NNL

Today’s e-publication of the neglected father man ;चळवळीतला उपेक्षित बाप माणूस ग्रंथाचे आज ई प्रकाशन – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड l मराठवाडा मुक्ती संग्राम दिना निमित्त राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने विविध उपक्रम पंधरवड्यातील कार्यक्रमांपैकी एक "चळवळीतला उपेक्षित बाप माणूस" या विविध लढ्याच्या चळवळीतील योद्धाच्या सन्मानार्थ त्यांच्या कार्यावर आधारित लेख संग्रहातील संपादित ग्रंथाचे ई प्रकाशन दि.१७ सप्टेंबर रोजी करण्याचे आयोजन केले आहे. "चळवळीतला उपेक्षित बाप माणूस" या ग्रंथाचे ई प्रकाशन राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेश जिल्हा शाखा आनंद नगर येथील संपर्क कार्यालयातुन होत आहे.याप्रसंगी परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष मधुसूदनजी कुलथे, माजी कुलगुरू उद्धव भोसले, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, आमदार बालाजीराव कल्याणकर,राजेश पावडे,गोविंद मुंडकर,डॉ. शिवदास हमंद यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.१७सप्टेंबर २०२४ रोज मंगळवार दुपारी साडेबारा वाजता संपन्न होत आहे. सौ ललिता बंडे संपादित "चळव...
error: Content is protected !!