Poisoned by Drinking water ;नांदेड जिल्ह्यातील नेरली गावात शेकडो जणांना पाणीपुरवठ्याच्या टाकीतल्या पाणी पिल्याने झालीय विषबाधा -NNL
नांदेड। जिल्ह्यातील नेरली या गावात शेकडो जणांना पाणी पुरवठा टाकीतील पाणी प्यायल्याने विषबाधा झाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. गावातील सार्वजानिक टाकीतून संपूर्ण गावाला पाणी पुरवठा केला जातो. याच टाकीतील पाणी पिल्याने विषबाधा झाल्याचं समजते आहे. कालरात्री काही जणांना उटल्या , जुलाब , चक्कर, मळमळ असा त्रास होऊ लागल्याने एकएक जण रुग्णालयात दाखल होत होता. रुग्णांची संख्या वाढू लागल्याने डॉक्टरांनी एक पथक गावातच पाठविले असून येथे रुग्णांवर उपचार केले जात असून, सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगितले जात आहे.
नेरली गावात असलेल्या पाणीपुरवठ्याच्या विहिरीची स्वच्छता केले आणि वर्षापासून केल्या गेली नसल्याने पाणीपुरवठा झाल्यानंतर गावातील नागरिकांना विषबाधा झाली आहे रुग्णाला दाखला होत असल्याने आणि मोठया संख्येने रुग्णांना शासकीय आणि खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णां...









