Friday, May 22

महाराष्ट्र

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Communist Party : राज्यस्तरीय अभ्यास शिबिरात माकप कार्यकर्त्यांना विविध आव्हानांची शिदोरी – पॉलिट ब्युरो आणि राज्य कमिटीने केले मार्गदर्शन

Communist Party : राज्यस्तरीय अभ्यास शिबिरात माकप कार्यकर्त्यांना विविध आव्हानांची शिदोरी – पॉलिट ब्युरो आणि राज्य कमिटीने केले मार्गदर्शन

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड l मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पूर्णवेळ कार्यकर्त्यांचे दोन दिवसीय राज्यस्तरीय अभ्यास शिबीर चेंबूर (मुंबई) येथील आदर्श विद्यालयातील कॉम्रेड लहानू कोम सभागृहात मोठ्या उत्सहात संपन्न झाले. सुरवातीला पक्षाच्या ध्वजाचे ध्वजारोहन आणि शहीद हुतात्म्यांना पुष्पांजली वाहण्यात आली. या अभ्यास शिबिरास मार्गदर्शन करण्यासाठी पक्षाचे पॉलिट ब्युरो सदस्य माजी खासदार कॉ. निलोत्पल बसू, अ.भा.किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा पॉलिट ब्युरो सदस्य कॉ.डॉ.अशोक ढवळे, माजी खासदार तथा राष्ट्रीय नेत्या कॉ.वृंदा करात आदींची प्रमुख उपस्थिती होती. उपरोक्त शिबिरात एकूण सहा सत्र घेण्यात आले. स्वागत आणि प्रस्ताविक राज्य सचिव कॉ.डॉ.अजित नवले यांनी केले. कॉ. निलोत्पल बसू, कॉ.अशोक ढवळे, कॉ.वृंदा करात,कॉ.अजित अभ्यंकर, कॉ.डॉ.डी. एल.कराड यांनी वेगवेगळ्या विषयांवर सोप्या भाषेत मांडणी केली. अध्यक्षीय मंडळामध्ये आ...
Majhi Vasundhara Abhiyan : माझी वसुंधरा अभियानात ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घ्यावा – मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली

Majhi Vasundhara Abhiyan : माझी वसुंधरा अभियानात ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घ्यावा – मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| पर्यावरणाच्या संरक्षण व संवर्धनासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत माझी वसुंधरा हा अभिनव उपक्रम सन 2020 पासून राज्यभरात राबविण्यात येत आहे. यावर्षी माझी वसुंधरा अभियान 6.0 अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी केले आहे. या अभियानात निसर्गातील पंचमहाभूतांवर भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश यावर आधारित पर्यावरणपूरक उपक्रमांचे प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतींमध्ये स्‍पर्धात्‍मक वातावरण निर्माण करण्यात येते. शासनाने निर्धारित केलेल्या टूलकिटमधील निर्देशांनुसार, ग्रामपंचायतींनी एप्रिल ते मार्च या कालावधीत विविध उपक्रम राबवायचे असून त्याची नोंद शासनाच्या पोर्टलवर करणे आवश्यक आहे. त्यानंतर डेस्कटॉप व क्षेत्रीय मूल्यांकनाच्या आधारे उत्कृष्ट का...
Investigate the building repair work : हिमायतनगर हदगाव पंचायत समिती इमारत दुरुस्तीच्या कामाची दक्षता व गुण नियंत्रण मंडळ पथकामार्फत चौकशी करा

Investigate the building repair work : हिमायतनगर हदगाव पंचायत समिती इमारत दुरुस्तीच्या कामाची दक्षता व गुण नियंत्रण मंडळ पथकामार्फत चौकशी करा

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड, अनिल मादसवार| पंचायत समिती हिमायतनगर व पंचायत समिती हदगांव जि. नांदेड येथील प्रशासकीय ईमारत दुरुस्तीचे होत असलेले काम निकृष्ट दर्जाचे केले जातत आहे. या कामाची दक्षता व गुण नियंत्रण मंडळ पथकामार्फत चौकशी करुन संबंधित जिल्हा परिषद बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता, शाखा अभियंता यांची खातेनिहाय व मालमत्तेची चौकशी व सदरचे काम करणाऱ्या कन्स्ट्रक्शन कंपनी व एजन्सीवर दंडात्मक कार्यवाही करावी आणि त्या एजन्सीचे नाव काळ्या यादीत समाविष्ट करावे अशी मागणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्याकडे बहुजन टायगर युवा फोर्स महाराष्ट्र राज्याच्या वतीने करण्यात आली असल्याने नांदेड जिल्हा परिषदेच्या देखरेखीत चालणाऱ्या पंचायत समिती अंतर्गत होत असलेल्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्हा बांधकाम उपविभाग हदगांव जि. नांदेड कार्यालयाकडून पंचायत समिती हदगाव व पंचायत समिती...
Not a bridge but a deth trap ; पूल नव्हे, मृत्यूचा सापळा! गवंडगावातील पूल धोकादायक अवस्थेत; ग्रामस्थ संतप्त, आंदोलनाचा इशारा

Not a bridge but a deth trap ; पूल नव्हे, मृत्यूचा सापळा! गवंडगावातील पूल धोकादायक अवस्थेत; ग्रामस्थ संतप्त, आंदोलनाचा इशारा

नांदेड, महाराष्ट्र
देगलूर, गंगाधर मठवाले। देगलूर तालुक्यातील गवंडगावजवळील मुख्य रस्त्यावर असलेला पूल सध्या अक्षरशः धोकादायक अवस्थेत असून, पावसाळ्याच्या सुरुवातीलाच त्याची दयनीय अवस्था उघड झाली आहे. पुलाच्या दुतर्फा वाढलेली झाडाझुडपे, तळातून वाहणाऱ्या पाण्यामुळे झालेली झीज आणि रस्त्यावरचे खड्डे पाहता, मोठ्या अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. हा रस्ता बल्लूर फाटा ते मानूर दरम्यान सुमारे १० ते १५ गावांना जोडतो. या पुलावरून दररोज शेकडो वाहनचालक, शालेय विद्यार्थी, वृद्ध नागरिक व महिला यांची ये-जा सुरू असते. मात्र, पुलाची बाजूची संरचना पूर्णपणे कोसळली असून, रस्त्यावर जागोजागी मोठाले खड्डे तयार झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना प्रचंड धोका पत्करून प्रवास करावा लागत आहे. प्रशासन झोपेत... दुर्घटना होईपर्यंत वाट पाहणार का? ग्रामस्थांनी अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभाग व स्थानिक प्रशासनाकडे तक्रारींचा पाढा वाचूनही कोणत...
Minister Pankaja Munde : पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचे देशी गोवंश संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

Minister Pankaja Munde : पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचे देशी गोवंश संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

नांदेड, महाराष्ट्र
मुंबई| राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी देशी गायींच्या संवर्धनासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, दरवर्षी २२ जुलै हा दिवस "शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन" म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आहे. या निर्णयाचा अध्यादेश राज्य शासनाने निर्गमित केला आहे. यापूर्वीच देशी गायीस "राज्यमाता–गोमाता" म्हणून घोषित करण्यात आले असून, या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात मराठवाडा विभागात देवणी, लालकंधारी. पश्चिम महाराष्ट्रामध्ये खिल्लार, उत्तर महाराष्ट्रात डांगी तर विदर्भात गवळाऊ यांसारख्या देशी गायींच्या जाती आढळतात. मात्र, कमी उत्पादनक्षमता व प्रजननक्षमतेमुळे या गायींच्या संख्येत सातत्याने घट होत चालली आहे. यामुळे त्यांचे जतन व संवर्धन करण्याची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, देशी गायींचे जतन व संवर्धन करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांच्या...
Vande Bharat : अखेर वंदे भारत नांदेड पर्यंत धावणार : खा. डॉक्टर अजित गोपछडे यांच्या प्रयत्नांना यश

Vande Bharat : अखेर वंदे भारत नांदेड पर्यंत धावणार : खा. डॉक्टर अजित गोपछडे यांच्या प्रयत्नांना यश

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| नांदेड ते मुंबई रेल्वे प्रवास अति जलद व्हावा आणि मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांना अधिकाधिक सुविधा मिळाव्यात यासाठी वंदे भारत रेल्वे नांदेड पर्यंत आणण्यासाठी खा. डॉ अजित गोपछडे यांनी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले असून रेल्वे मंत्रालयाने वंदे भारत नांदेड एक्सप्रेस रेल्वे नांदेडपर्यंत विस्तार करत असल्याचे अधिकृत पत्र आज जारी केले आहे. मुंबई - जालना असलेल्या वंदे भारत रेल्वे चा विस्तार नांदेड पर्यंत करावा यासाठी खा. डॉ. अजित गोपछडे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे यापूर्वीच गेल्या एक वर्षापासून पाठपुरावा केला होता. शिवाय राज्यसभेतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला . खा.डॉ. अजित गोपछडे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सकारात्मक प्रतिसाद देत वंदे भारत जालन्याहून नांदेड पर्यंत विस्तार करण्याचे अनुषंगाने सर्वे करण्यासाठी आप...
Himayatnagar bandh called on Sunday : बच्चु कडु यांनी सुरु केलेल्या अन्नत्याग उपोषनाच्या समर्थानात रविवारी हिमायतनगर बंदची हाक

Himayatnagar bandh called on Sunday : बच्चु कडु यांनी सुरु केलेल्या अन्नत्याग उपोषनाच्या समर्थानात रविवारी हिमायतनगर बंदची हाक

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर, अनिल मादसवार| माजी राज्यमंत्री बच्चु कडु यांनी मोझरी ता. तिवसा जि.अमरावती येथे गेल्या 6 दिवसापासुन अन्नत्याग उपोषण सुरु केलं आहे. त्यांच्या उपोषणाची शासनाने अद्याप कुठलीच दखल घेतली नाही. त्यामुळे शेतकरी हितार्थ करण्यात येणाऱ्या उपोषणाला पाठिंबा देत शासनाच्या निषेधार्त प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने दि.15 जुन 2025 रविवारी हिमायतनगर बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला शहरातील व्यापारी, नागरिक, शेतकरी व सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन दत्ता पंडीतराव देशमुख तालुका प्रमुख हिमायतनगर यांनी केलं आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री बच्चु कडु यांनी राज्यकर्ते शासनाला निवडणूक काळात दिलेल्या आश्वासन अथवा करून देण्यासाठी गेल्या 6 दिवसापासुन अन्नत्याग उपोषण सुरु केलं आहे. उपोषणाच्या मह्द्यमातून दिव्यांग व विधवा महिलांना रु.6000/- मानधन देण्यांत यावे, आपल्या संकल्पा...
Aurangabad ; औरंगाबाद, अकोला आणि पूर्णा रेल्वे स्थानकांवर लोको पायलट व सहाय्यक लोको पायलटांसाठी कुटुंबीय संवाद सत्राचे आयोजन

Aurangabad ; औरंगाबाद, अकोला आणि पूर्णा रेल्वे स्थानकांवर लोको पायलट व सहाय्यक लोको पायलटांसाठी कुटुंबीय संवाद सत्राचे आयोजन

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड l दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात लोको पायलट व सहाय्यक लोको पायलट तसेच त्यांच्या कुटुंबीयांसाठी एक विशेष संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले. नांदेड विभागातील औरंगाबाद, पूर्णा आणि अकोला रेल्वे स्थानकांवर हे संवाद सत्र गत सप्ताहात आयोजित करण्यात आले. यात श्री रवी तेजा, वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता /टी.आर.एस.ओ. यांनी प्रामुख्याने रेल्वे कुटुंबियांना मार्गदर्शन केले. त्यांच्या सोबत श्री जयप्रकाश, सहायक अभियंता/नांदेड विभाग हे उपस्थित होते. या सत्राचा उद्देश कर्मचाऱ्यांचे मानसिक व शारीरिक आरोग्य, कर्तव्यनिष्ठा, तसेच त्यांच्या कुटुंबीयांची भूमिका याबाबत जागरूकता वाढवणे हा होता. गाड्यांचे सुरक्षित व वेळेवर संचालन ही अत्यंत जबाबदारीची बाब असून, यासाठी जागरूकता, सतर्कता आणि नियमांचे काटेकोर पालन आवश्यक आहे. सत्रात या भूमिकेचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. थकवा व अपघात टाळण्यासाठी पुरेश...
Workers Protest march ;  हजारो बांधकाम व घरेलू कामगारांचा आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला

Workers Protest march ; हजारो बांधकाम व घरेलू कामगारांचा आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड। सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील नोंदणी अधिकारी यांच्या मनमानीमुळे नोंदीत आणि जीवित कामगार आपल्या न्याय हक्क आणि अधिकारापासून वंचीत असल्यामुळे १२ जून रोजी दुपारी १२ वाजता हजारोच्या संख्येने मोर्चा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले व मोर्चास सुरवात झाली. मोर्चाचे नेतृत्व सीटू कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉ. गंगाधर गायकवाड आणि प्रगती महिला पुरुष बांधकाम संघटनेचे सचिव अब्दुल वसीम अब्दुल सलीम यांनी केले. सहाय्यक कामगार आयुक्त श्री अनिकेत थोरात यांनी संघटना प्रतिनिधी यांच्या सोबत बैठक घेऊन चर्चा केली परंतु समाधान झाले नसल्याने मोर्चा काढण्यात आला. इमारत बांधकाम कामगार व घरेलू तसेच असंघटित कामगारांना कल्याणकारी मंडळा मार्फत अनेक प्रकारचे लाभ देण्यात येतात. त्यामध्ये नोंदीत कामगारां...
Pradhan Mantri Dharti Aaba Janajati Gram Utkarsh Abhiyan : प्रधानमंत्री धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानात 15 ते 30 जून या कालावधीत विशेष शिबिराचे आयोजन

Pradhan Mantri Dharti Aaba Janajati Gram Utkarsh Abhiyan : प्रधानमंत्री धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानात 15 ते 30 जून या कालावधीत विशेष शिबिराचे आयोजन

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| प्रधानमंत्री धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानात नांदेड जिल्ह्यातील माहूर व किनवट तालुक्यातील गावांमध्ये 15 ते 30 जून 2025 या कालावधीत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात आदिवासी समाजाच्या लाभार्थ्यांना विविध आवश्यक प्रमाणपत्रे, कागदपत्रे यांचे वितरण करण्यात येणार आहे. तरी लाभार्थ्यांनी या शिबिराचा आवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी जेनित चन्द्रा दोन्तुला यांनी केले आहे. आदिवासी जमातींच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेद्वारे आदिवासी जमातींच्या सामाजिक व आर्थिक विकास साध्य करण्याचे उद्दिष्ट आहे. या योजनेत नांदेड जिल्ह्याचा समावेश असून नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील 128 गावे तर माहूर तालुक्यातील 4 गावांचा समावेश आहे. दिनांक...
error: Content is protected !!