Congress : खरात प्रकरणात राजकीय पाठबळाचा संशय; काँग्रेसचा गंभीर आरोप
मुंबई | नाशिकमधील भोंदूबाबा प्रकरणावरून महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गंभीर आरोप केले आहेत. महिलांचे शोषण करणारा अशोक खरात हा महाराष्ट्राचा ‘आसाराम बापू’ असल्याचा घणाघात त्यांनी केला.
सपकाळ म्हणाले की, अशोक खरातच्या विरोधात समोर आलेले प्रकार धक्कादायक असून सखोल चौकशी केल्यास आणखी गंभीर बाबी उघड होण्याची शक्यता आहे. महिलांचे शोषण करणाऱ्या या भोंदूबाबाला कठोर शिक्षा झालीच पाहिजे, तसेच त्याच्या मागे कोणाचा राजकीय आशिर्वाद आहे, याचीही चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्र हा शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचा पुरोगामी राज्य आहे. तरीही अंधश्रद्धेविरोधी कायदा असतानाही अशा भोंदूबाबांचे प्रकार सुरू राहणे चिंताजनक आहे. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आयुष्यभर लढा देणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली, हेही त्...









