Wednesday, May 20

मुंबई

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Rainfall : राज्यातील विविध भागांमध्ये २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान पावसात वाढ अपेक्षित

Rainfall : राज्यातील विविध भागांमध्ये २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान पावसात वाढ अपेक्षित

नांदेड, महाराष्ट्र, मुंबई
विविध भागांमध्ये पावसात वाढ आणि काही भागांमध्ये मुसळधार पाऊस अपेक्षित असल्यामुळे शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठेवावीत. दक्षिण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रासह कोकणातील घाट परिसरात नदी-नाल्यांना पूर येण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे मुंबई| बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, आणि त्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांमध्ये २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान ढगाळ हवामान आणि पावसात वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. राज्यात किमान ५ ऑक्टोबरपर्यंत तरी मान्सून निरोप घेण्याची शक्यता नाही. २६ तारखेला दक्षिण विदर्भ आणि लगतच्या मराठवाड्यात दुपारनंतर ढगाळ हवामान आणि पावसात वाढ होऊ शकते. यात गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यांचा समावेश आहे. उर्वरित विदर्भ आणि मराठवाड्यात आभाळी हवामान आणि हलका पाऊस पडू शकतो. २६ तारखेच्या तु...
Harshvardhan Sapkal : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या, शेतकरी कर्जमाफीचे काय झाले? : हर्षवर्धन सपकाळ

Harshvardhan Sapkal : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या, शेतकरी कर्जमाफीचे काय झाले? : हर्षवर्धन सपकाळ

नांदेड, मुंबई, राजकीय
मुंबई| राज्यात यावर्षी सरसरीपेक्षा दुप्पट, तिप्पट पाऊस पडला आहे. ३६ जिल्हे व ३५८ तालुक्यापैकी ३० जिल्हे व जवळपास ३०० तालुके अतिवृष्टी आणि पूरग्रस्त आहेत. राज्यभरात जवळपास १४३ लाख हेक्टरवरील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. पाऊस सातत्याने पडत असून शेतकरी हवालदिल झाला आहे परंतु राज्यातील महायुती सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही, पालकमंत्र्याने पाहणी सुद्धा केली नाही. मंत्रिमंडळ बैठकीत फक्त कोरडी चर्चा झाली. सरकारने झोपेतून जागे व्हावे व संकटातील शेतकऱ्याला हेक्टरी सरसकट ५० हजार रुपये तातडीने द्यावेत व शेतजमीन खरडून गेली त्यांना हेक्टरी ५ लाख रुपये द्यावेत अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. टिळक भवन येथील पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारवर चौफेर हल्ला केला. ते पुढे म्हणाले की, मुसळधार पावसामुळे ...
Let’s go to Mumbai: आता पत्रकारांचेही “चलो मुंबई” — पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी राज्यव्यापी आंदोलनाची हाक

Let’s go to Mumbai: आता पत्रकारांचेही “चलो मुंबई” — पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी राज्यव्यापी आंदोलनाची हाक

नांदेड, महाराष्ट्र, मुंबई
मुंबई| राज्यातील पत्रकारांवरील वाढत्या हल्यांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारकडून पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पत्रकार संघटना आता रस्त्यावर उतरणार आहेत. विविध संघटनांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या “पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंच” च्या मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित बैठकीत “चलो मुंबई”चा नारा देत राज्यव्यापी आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला. बैठकीत नाशिक, त्र्यंबकेश्वर, मुंबई, अमरावती यासह राज्यातील पत्रकारांवरील झालेल्या हल्ल्यांचा तीव्र निषेध करण्यात आला. २०१९ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २९ म्हणून पारित झालेल्या पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी शासनाने तातडीने नोटिफिकेशन काढावे, असा ठराव या बैठकीत संमत झाला. 📅 आंदोलनाचा आराखडा : 11 ऑक्टोबर : मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना राज्यभरातून हजारो एस.एम.एस. पाठवून मागण्यांकडे लक्ष वेधले जाईल. 25 नोव्हेंबर...
Close these toll booths : बंद करा हे टोलनाके आणि टोलगुंडागर्दी..!

Close these toll booths : बंद करा हे टोलनाके आणि टोलगुंडागर्दी..!

नांदेड, मुंबई, लेख
टोलनाक्यावर होणारी गुंडागर्दी ही नवीन नाही. त्यात घट नाही तर वाढ होत चालली आहे. आता पत्रकारांनाही या टोलगुंडागर्दीचा सामना करावा लागत आहे. याचा राज्यकर्त्यांनी अत्यंत गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे, नसता लोकशाहीचा हा चौथा स्तंभ धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. थोडीशी गुंतवणूक करुन जनतेला अनेक वर्ष हजारो पटीत लुटण्याचा सरकारी परवाना ज्यांना मिळतो ते मस्तीला येणारच. टोलवसुलीसाठी ते आपल्या पदरी गुंडांना बाळगणारच. शेवटी पैसा बोलता है. पैसे वसुली करीत असतांना अरेरावी करणे, उद्धट बोलणे, दादागिरी करणे, अंगावर धावून येणे, मारहाण करणे असे प्रकार रोज कुठे ना कुठे टोलनाक्यावर घडत असतात. त्यात सामान्य जणांबरोबर कर्मचारी, अधिकारी, पुढारी, व्यापारी, शेतकरी आणि पत्रकारही भरडल्या जात असतील तर सरकार हे टोलनाके का बंद करीत नाहीत ? टोलधाडीच्या या वाढत जाणाऱ्या गुंडगिरीसमोर सरकार गुडघे का टेकत आहे ? परव...
Marathi Press Council  : त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा अ. भा. मराठी पत्रकार परिषदेकडून निषेध

Marathi Press Council : त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा अ. भा. मराठी पत्रकार परिषदेकडून निषेध

नांदेड, महाराष्ट्र, मुंबई
मुंबई| त्र्यंबकेश्वर येथे टोल वसुली करणारया गुंडांकडून पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि डिजिटल मिडिया परिषदेने तीव्र शब्दात धिक्कार केला.. हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी एस.एम देशमुख यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. त्र्यंबकेश्वर येथे साधू महंताची कुंभ मेळयाच्या संदर्भात बैठक होती त्या बैठकीचे वृत्तांकन करण्यासाठी काही पत्रकार नाशिक येथून त्र्यंबकेश्वर गेले होते.. त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी येणारया भाविकांना प्रवेश शुल्क भरावे लागते.. मात्र आम्ही पत्रकार आहोत आणि बातमी कव्हर करण्यासाठी आलो आहोत असे वारंवार सांगूनही टोलवरील कर्मचारी ऐकायला तयार नव्हते.. पत्रकार वरिष्ठांना फोन करीत असतानाच वसुली करणारया गुंडांनी पत्रकारांना मारहाण करायला सुरूवात केली.. यामध्ये झी - 24 तासचे योगेश खरे, पुढारी न्यूजचे ...
animal husbandry in agriculture : पशुपालनास कृषी समकक्ष दर्जा – ऐतिहासिक निर्णय घेणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य

animal husbandry in agriculture : पशुपालनास कृषी समकक्ष दर्जा – ऐतिहासिक निर्णय घेणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य

नांदेड, कृषी, मुंबई, लेख
पशुपालन व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाला कृषी समकक्ष दर्जा देण्याची अनेक पशुपालकांबरोबरच राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी आग्रही मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी या मागणीला सकारात्मक पाठिंबा दर्शविला आणि पावसाळी अधिवेशनात पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी हा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला. पशुसंवर्धन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय हा लोकाभिमुख असून असा निर्णय घेणारे महाराष्ट्र राज्य हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. महाराष्ट्र हे देशातील सर्वांत मोठ्या कृषिप्रधान राज्यांपैकी एक आहे. राज्यातील सुमारे ५५ टक्के लोकसंख्या थेट शेतीवर आणि संबंधित व्यवसायांवर अवलंबून आहे. शेतीसोबतच पशुपालन हे देखील शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थ...
Marathi language : मराठी भाषेच्या प्रचारासाठी निबंध लेखन व मराठी भाषा संस्कृती ज्ञान परीक्षा स्पर्धेचे आयोजन

Marathi language : मराठी भाषेच्या प्रचारासाठी निबंध लेखन व मराठी भाषा संस्कृती ज्ञान परीक्षा स्पर्धेचे आयोजन

करियर, नांदेड, मुंबई
नवी दिल्ली| मराठी भाषेचा प्रसार आणि विकास व्हावा यासाठी बृहन्महाराष्ट्र मंडळ, नवी दिल्ली आणि राज्यमराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने निबंध लेखन आणि मराठी भाषा संस्कृती ज्ञान परीक्षा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ५ ऑक्टोबर २०२५ रोजी होणार असून, अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 01 ऑक्टोंबर २०२५ आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रत्येकी २५ रुपये शुल्क आकारले जाईल, आणि दोन्ही परीक्षा प्रत्येकी दोन तासांच्या असतील. स्पर्धेत विविध वयोगटांसाठी तीन गट आणि वैविध्यपूर्ण विषय ठेवण्यात आले आहेत. गट क्र. १ (१२ ते १६ वर्षे, १५०-५०० शब्द) मध्ये ‘स्वातंत्र्यवीर सावरकर - एक अलौकिक व्यक्तिमत्त्व, ‘खेळामुळे मिळणारे जीवनाचे धडे, ‘माझी आई सर्वकाही हे विषय आहेत. गट क्र. २ (१७ ते ३० वर्षे, ५००-१००० शब्द) मध्ये ‘यशासाठी आहार आणि विहार, ‘फेक बातम्या व सूचनांचा अतिभार - एक गंभीर विषय’...
S M Deshmukh : डिजिटल मीडियामधील पत्रकांराच्या प्रश्नासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरू – एस.एम.देशमुख

S M Deshmukh : डिजिटल मीडियामधील पत्रकांराच्या प्रश्नासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरू – एस.एम.देशमुख

नांदेड, महाराष्ट्र, मुंबई
मुंबई/छत्रपती संभाजीनगर| अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न डिजिटल मीडिया परिषदेच्या पहिले राज्यस्तरीय अधिवेशन छत्रपती संभाजीनगर येथे उत्साहात पार पडले. यावेळी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन करताना मोठी घोषणा केली आहे. ‘डिजिटल मीडियामधील पत्रकारांना आजही शासन दरबारी पत्रकार म्हणून मान्यता दिली जात नाही, ही मोठी शोकांतिका आहे. एखादी बातमी काही क्षणामध्ये जगभर पोहोचवणाऱ्या डिजिटल मीडियातील पत्रकारांच्या प्रश्नांबाबत सरकार चालढकल करीत आहे. सरकारने तातडीने या पत्रकारांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा वेळप्रसंगी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद व डिजिटल मीडिया परिषद रस्त्यावर उतरून आंदोलन करू,’ असा इशारा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी दिला आहे. माजी केंद्रीय अर्थ राज्...
Suchita Khallal : कवयित्री सुचिता खल्लाळ यांना कविवर्य ना. धों. महानोर साहित्य पुरस्कार जाहीर

Suchita Khallal : कवयित्री सुचिता खल्लाळ यांना कविवर्य ना. धों. महानोर साहित्य पुरस्कार जाहीर

करियर, नांदेड, मुंबई
नांदेड| यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने देण्यात येणाऱ्या कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती- पाणी पुरस्काराची घोषणा खासदार सुप्रिया सुळे यांनी केली असून नांदेडच्या कवयित्री सुचिता खल्लाळ यांना कविवर्य ना. धों. महानोर साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुरस्काराचे हे दुसरे वर्ष असून चव्हाण सेंटर मुंबई येथे सेंटरचे अध्यक्ष शरद पवार आणि जैन फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत येत्या २६ सप्टेंबर रोजी मुंबईत या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. राज्यातील साहित्य क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या चार जणांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे . सुचिता खल्लाळ यांचे पायपोळ, तहहयात, प्रलयानंतरची तळटीप हे तीन काव्यसंग्रह, स्त्री कविचेचं भान : काल आणि आज (समीक्षा) आणि डिळी कादंबरी ही साहित्य संपदा प्रकाशित असून, त्यांच्या कवितेचा सदानिरा, वागर्थ (हिंदी मासिक), ब...
S.M. Deshmukh : “डिजिटल मिडिया परिषदेच्या” संभाजीनगर अधिवेशनास राज्यभरातून पत्रकार येणार : एस.एम.देशमुख

S.M. Deshmukh : “डिजिटल मिडिया परिषदेच्या” संभाजीनगर अधिवेशनास राज्यभरातून पत्रकार येणार : एस.एम.देशमुख

छत्रपती संभाजीनगर, नांदेड, महाराष्ट्र, मुंबई
छत्रपती संभाजीनगर| अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची एक विंग असलेल्या डिजिटल मिडिया परिषदेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन रविवार दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी संभाजीनगर येथे होत असून अधिवेशनास एक हजार पत्रकार उपस्थित राहतील असा विश्वास एस.एम. देशमुख यांनी व्यक्त केला आहे. डिजिटल मिडियातील पत्रकारांची संख्या उत्तरोत्तर वाढत असून त्यांना संघटीत करून त्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकी बाबत अधिवेशनात विचार विनिमय करून ठोस भूमिका घेतली जाणार आहे. क्रांती चौक परिसरातील एकनाथ रंगमंदिर येथे पालकमंत्री संजय शिरसाट आणि कँबिनेट मंत्री अतुलजी सावे यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन होणार असून एस.एम.देशमुख अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी असतील.. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. "मुक्तपीठ" चे संपादक आणि नवा काळचे सल्लागार संपादक तुळशीदास भोईटे...
error: Content is protected !!