Friday, May 15

मुंबई

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

‘Ladki Bahin Yojana’ ; ‘लाडकी बहीण योजना’ बंद तर होणारच नाही, भविष्यात दरमहा रकमेत वाढ करू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – NNL

‘Ladki Bahin Yojana’ ; ‘लाडकी बहीण योजना’ बंद तर होणारच नाही, भविष्यात दरमहा रकमेत वाढ करू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – NNL

राजकीय, मुंबई
कोल्हापूर| ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेमुळे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला अधिक बळकटी मिळत आहे. ही योजना बंद तर होणारच नाही उलट भविष्यात या योजनेतील मिळणाऱ्या दरमहा रकमेत वाढ करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. कोल्हापूर येथील ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना वचनपूर्ती सोहळा कार्यक्रमात जिल्ह्यातील हजारो महिलांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणेचे उपाध्यक्ष प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, धैर्यशील माने, आमदार सदाभाऊ खोत, ...
Union Ministry of Education  ; सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा आदेश – NNL

Union Ministry of Education ; सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा आदेश – NNL

करियर, मुंबई
नवी दिल्ली| देशातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय जारी केला आहे. केंद्रीय मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 'शालेय सुरक्षा आणि सुरक्षिततेबाबतच्या मार्गदर्शक सूचना' लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. शाळा आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी शिक्षण मंत्रालय कटिबद्ध आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि पोक्सो कायद्याच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, मंत्रालयाने 'शालेय सुरक्षा आणि सुरक्षितताबाबत मार्गदर्शक सूचना-2021' विकसित केल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांमध्ये शाळा व्यवस्थापनाची जबाबदारी स्पष्ट करण्यासोबतच, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रतिबंधात्मक प्रशिक्षण, अहवाल देण्याची प्रक्रिया आणि सहाय्य यांच्या तरतूदी नमूद आहेत. मार्गदर्शक सू...
Nana Patole ; महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी दिल्ली व गुजरात लॉबीसमोर झुकलेले, भाजपा सरकार उखडून फेका: नाना पटोले – NNL

Nana Patole ; महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी दिल्ली व गुजरात लॉबीसमोर झुकलेले, भाजपा सरकार उखडून फेका: नाना पटोले – NNL

नांदेड, करियर, मुंबई, राजकीय
नंदूरबार/ मुंबई| महायुती सरकारने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. कर्नाटकतील भाजपा सरकार ४० टक्के कमीशनवाले होते महायुती सरकार तर त्यापुढे गेले आहे, भ्रष्टाचाराचे नवनवे विक्रमच या सरकारने रचले आहेत. महाराष्ट्राच्या डोक्यावर कर्ज लादून महागाई वाढवली आहे, महाराष्ट्र हे सर्वात महागडे राज्य अशी ओळख निर्माण झाली आहे. महायुती सरकार गुजरातधार्जिणे असून गुजरातमधून मोठ्या प्रमाणात ड्रग आणायचे व राज्यातले उद्योग गुजरातला पाठवायचे काम मागील दोन वर्षांपासून सुरु आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी दिल्लीसमोर व गुजरात लॉबीसमोर झुकणारे भाजपा युती सरकार उखडून फेका, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले. उत्तर महाराष्ट्र विभागातील नंदरूबार, धुळे, जळगाव जिल्ह्यातील आढावा बैठक नंदूरबारमध्ये पार पडली या बैठकीला काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, प्रदेश कार्याध...
Departure of Chief Minister ; मुख्यमंत्री, केंद्रीय कृषी मंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे नांदेड विमानतळावरून प्रस्थान – NNL

Departure of Chief Minister ; मुख्यमंत्री, केंद्रीय कृषी मंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे नांदेड विमानतळावरून प्रस्थान – NNL

नांदेड, मुंबई, राजकीय
नांदेड | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार रात्री उशिरा नांदेड विमानतळावरून रवाना झाले. केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान नवी दिल्ली येथे तर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे मुंबईला रवाना झाले. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण, ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे परळी वैजनाथ या ठिकाणच्या कृषी महोत्सवासाठी आज दुपारी 12 वाजता नांदेडच्या गुरुगोविंद सिंगजी विमानतळावर आगमन झाले होते. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज दुपारी लातूर येथे आगमन झाले होते. परळी वैजनाथ येथील कार्यक्रम संपून त्यांनी नांदेड येथून प्रस्थान केले. शिवराज सिंह चौहाण यांनी रात्री 9.15 वाजताच्या सुमारास नवी दिल्लीला प्रयाण केले. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्य...
School Education Minister Deepak Kesarkar : विद्यार्थ्यांच्या सुरक्षा उपाययोजनांशी तडजोड नाही – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर -NNL

School Education Minister Deepak Kesarkar : विद्यार्थ्यांच्या सुरक्षा उपाययोजनांशी तडजोड नाही – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर -NNL

राजकीय, मुंबई
मुंबई| शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांची सुरक्षा देखील अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. यासाठीच्या  उपाययोजनांसंदर्भात शासन स्तरावरून वेळोवेळी आदेश निर्गमित करण्यात आले असून या उपायोजनांशी तडजोड केली जाणार नाही, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने अलीकडील काळात काही अनुचित घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच काही नवीन उपाययोजना लागू करण्याबाबतचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे. शाळा व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे शाळा व परिसरात विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा हा उत्तम पर्याय असून खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांकरिता येत्या एक महिन्यात मोक्याच्या ठिकाणी पर्याप्त संख्येने सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधन...
Mallikarjun Kharge : हुकूमशाह बनून सत्ता नियंत्रीत करण्याचा अहंकारी नरेंद्र मोदींचा प्रयत्न: मल्लिकार्जून खरगे -NNL

Mallikarjun Kharge : हुकूमशाह बनून सत्ता नियंत्रीत करण्याचा अहंकारी नरेंद्र मोदींचा प्रयत्न: मल्लिकार्जून खरगे -NNL

राजकीय, मुंबई
मुंबई| राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला सर्वात जास्त ४१५ जागी विजय मिळवला पण त्यांना अहंकार नव्हता मात्र नरेंद्र मोदींनी ४०० पारचा नारा दिला पण त्याला महाराष्ट्राने झटका दिला. जेडीयू व तेलुगु देसमच्या दोन पायाचा टेकू घेऊन सरकार बनवावे लागले. मोदी सरकार अल्पमतातील सरकार आहे. नरेंद्र मोदी देशाच्या भल्यासाठी नाही तर हुकूमशाह बनून सत्ता नियंत्रीत करु पहात आहेत पण महाराष्ट्राच्या जनतेने लोकसभा निवडणुकीत त्यांना हिसका दाखवला, असा हल्लाबोल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. माजी पंतप्रधान भारत रत्न स्व.राजीव गांधी जयंतीनिमित्त सद्भावना दिवस व संकल्प मेळाव्याचे आयोजन षण्मुखानंद सभागृहात करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, भाजपाने महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तराखंड, मध्य प्रदेश, गोवा, मणिपूर येथील विरोधी पक्षांची सरकारे तोडफोड करून घालवली व भा...
Congress : घोटाळेबाज व कमीशनखोर महायुती सरकारला सत्तेतून बाहेर काढा व मविआची सत्ता आणा: रमेश चेन्नीथला -NNL

Congress : घोटाळेबाज व कमीशनखोर महायुती सरकारला सत्तेतून बाहेर काढा व मविआची सत्ता आणा: रमेश चेन्नीथला -NNL

मुंबई, राजकीय, लातूर
लातूर/मुंबई| महायुती सरकार हे घोटाळ्याचे सरकार असून या असंवैधानिक सरकारच्या विरोधात जनतेत प्रचंड रोष आहे. कामांची कंत्राटे देताना ५० टक्के कमिशन घेतले जाते, या कमीशनखोर सरकारला सत्तेतून बाहेर काढले पाहिजे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले तसेच यश विधानसभेलाही मिळावे यासाठी कामाला लागा, एकजूट होऊन लढा विजय आपलाच आहे, असे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले. विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी रमेश चेन्नीथला यांच्यासह राज्यातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते आजपासून मराठवाडा आणि विदर्भाच्या दौ-यावर आहेत. या दौ-याची सुरुवात आज लातूर येथे झाली. लातूर येथे या सर्व नेत्यांनी लातूर शहर, लातूर ग्रामीण, धाराशीव आणि बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठका घेऊन विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर लातूर येथे मराठवाड्यातील नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार सोहळा व कार...
Chief Minister Eknath Shinde :’घरोघरी तिरंगा अभियान’ आता लोकचळवळ -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – NNL

Chief Minister Eknath Shinde :’घरोघरी तिरंगा अभियान’ आता लोकचळवळ -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – NNL

मुंबई, महाराष्ट्र
मुंबई| देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लाखो स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणाचे बलिदान दिले. त्यांच्या त्याग आणि बलिदानाची जाणीव ‘घरोघरी तिरंगा अभियान‘ आपल्याला सतत करून देईल. घरोघरी तिरंगा अभियान राष्ट्रप्रेमाची नवी उभारी देईल, कारण आता हे अभियान लोकचळवळ बनले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. सांस्कृतिक कार्य विभाग, मुंबई महानगरपालिका यांच्या वतीने ऑगस्ट क्रांती मैदान येथे आज घरोघरी तिरंगा ( हर घर तिरंगा) अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, नगरविकास विकास विभागाचे प्रधान सचिव के. गोविंद राज, मुंबई म...
Bhiwandi Vilas Patil  ; भिवंडीचे माजी महापौर विलास पाटील यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश- NNL

Bhiwandi Vilas Patil ; भिवंडीचे माजी महापौर विलास पाटील यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश- NNL

मुंबई, राजकीय
मुंबई | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या टिळक भवनमध्ये आज भिवंडीचे माजी महापौर विलास पाटील तसेच नाशिक, भिवंडी व कल्याण, डोबिंवलीमधील भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे यांची शिवसेना व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, माजी सभापती यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. नाशिकमधील भाजपा पदाधिकारी व माजी सभापती खलील मिर्झा, उषाताई वेंडकुळे, तन्वीर तांबोळी खान, मुस्ताक कुरेशी, छात्रभारतीचे माजी प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पवार, समाधान बागुल, विशाल रनमाळे यांच्यासह मुस्लीम ओबीसी संघटनेचे पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. कल्याण डोंब...
Jobs Jobspeak ; जुलैमध्ये नोक-यांच्या मागणीत १२% वाढ: नोकरी जॉबस्‍पीक – NNL

Jobs Jobspeak ; जुलैमध्ये नोक-यांच्या मागणीत १२% वाढ: नोकरी जॉबस्‍पीक – NNL

करियर, मुंबई
मुंबई| नोकरी जॉबस्‍पीक इंडेक्‍स हा भारतातील व्‍हाइट कॉलर हायरिंगचा आघाडीचा निर्देशांक जुलै २०२४ मध्‍ये २८७७ पॉइण्‍ट्सपर्यंत वाढला, ज्‍याने जुलै २०२३ च्‍या तुलनेत वार्षिक १२ टक्‍क्‍यांची उल्‍लेखनीय वाढ आणि जून २०२४ च्‍या तुलनेत तिमाही-ते-तिमाही ११ टक्‍के वाढ नोंदवली. बहुतांश क्षेत्रांनी उत्तम दोन-अंकी वाढीची नोंद केली, जेथे फार्मा/बायोटेक (२६ टक्‍के), एफएमसीजी (२६ टक्‍के), रिअल इस्‍टेट (२३ टक्‍के) आणि एआय-एमएल (४७ टक्‍के) अग्रस्‍थानी होते. पण, लक्षात घेण्‍यासारखी बाब म्‍हणजे काही उत्तम कामगिरीचे श्रेय जुलै'२३ च्‍या प्रभावित बेसला जाऊ शकते, जेथे आयटी क्षेत्राच्‍या समस्‍यांमुळे निर्देशांकामध्‍ये असामान्‍य घसरण दिसण्‍यात आली. फार्मा, रिअल इस्‍टेट आणि एफएमसीजी २० टक्‍क्‍यांहून अधिक वाढीसह अग्रस्‍थानी: फार्मा/बायोटेक क्षेत्राने वार्षिक २६ टक्‍के वाढ नोंदवली, जेथे बडोदा (६१ टक्‍के) आणि हैदराब...
error: Content is protected !!