Wednesday, May 20

मुंबई

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Nana Patole : विधानसभेतील पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी यापुढेही काँग्रेस पक्ष काम करेल: नाना पटोले -NNL

Nana Patole : विधानसभेतील पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी यापुढेही काँग्रेस पक्ष काम करेल: नाना पटोले -NNL

राजकीय, मुंबई
मुंबई| महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जनतेच्या अपेक्षित भावनांच्या विरोधातील आहे. राज्यातील सर्वच स्तरातील प्रमुख लोक, काँग्रेस व मविआचे नेते, पदाधिकारी, तळागाळातील कार्यकर्ते, पत्रकार यांच्याशी संवाद साधला असता हा निकाल अपेक्षित नव्हता असाच सुर निघत आहे. एक्झिट पोल मध्येही भाजपा युती व महाविकास आघाडी यांच्यात काटें की टक्कर दिसली. परंतु आज आलेला निकाल हा अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्विकार्य आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिली आहे. टिळक भवनमधील पत्रकार परिषदेत बोलताना रमेश चेन्नीथला म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीला जनतेने घवघवीत यश दिले आणि अवघ्या ५ महिन्यात एवढा बदल होईल असे वाटत नाही. विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभर दौरे केले, लोकांशी संवाद साधला, पूर्ण तयारीनिशी निवडणुका लढल्या. राज्यात शेतकऱ्यांपुढे गंभीर समस्या आहेत, महागाई, बेरो...
voters for Legislative Assembly : लोकसभेसाठी 19 लाख तर विधानसभेसाठी 27 लाखांच्यावर मतदार -NNL

voters for Legislative Assembly : लोकसभेसाठी 19 लाख तर विधानसभेसाठी 27 लाखांच्यावर मतदार -NNL

नांदेड, महाराष्ट्र, मुंबई
नांदेड| नांदेड जिल्ह्यामध्ये 25 वर्षानंतर प्रथमच नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणूक एकत्रित होत आहे. त्यामुळे 9 विधानसभा मतदारसंघासाठी 27 लाखावर मतदार मतदान करणार आहेत. तर लोकसभेसाठी 6 मतदारसंघात 19 लाखांच्यावर मतदार मतदान करणार आहेत. 6 विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना एकदाच बोटाला शाई लावून दोन वेळा मतदान करता येणार आहे. या संधीचा लाभ घ्यावा व मोठया संख्येने मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. लोकसभेसाठी 9 लाख 78 हजार 234 पुरुष तर 9 लाख 30 हजार 158 महिला, तृतीयपंथी 154 असे एकूण 19 लाख 8 हजार 546 मतदार 2 हजार 82 केंद्रावर आपला मतदानाचा हक्क्‍ बजावतील. तर विधानसभेसाठी 14 लाख 30 हजार 365 पुरुष तर 13 लाख 57 हजार 410 महिला तर 172 तृतीयपंथी असे एकूण 27 लाख 87 हजार 947 मतदान नऊ विधानसभा मतदार संघासाठी मतदान करतील. लोकसभा व विधा...
Nana Patole : भाजपाच्या राज्यात शेतकऱ्याच्या सोयाबीन, कापसाला भाव नाही; मविआची सत्ता आल्यानंतर कर्जमाफीसह शेतकरी हिताचे निर्णय घेऊ – नाना पटोले -NNL

Nana Patole : भाजपाच्या राज्यात शेतकऱ्याच्या सोयाबीन, कापसाला भाव नाही; मविआची सत्ता आल्यानंतर कर्जमाफीसह शेतकरी हिताचे निर्णय घेऊ – नाना पटोले -NNL

मुंबई, राजकीय
अकोला/मुंबई| नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली सत्तेत येताना शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने अजूनही पूर्ण केलेली नाहीत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट केले नाही, शेतमालाला भाव नाही, उलट मोदींनी शेती साहित्याचा खर्च वाढवला, बी बियाणे, डिझेल महाग केले. केंद्रात व राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार असूनही शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कांदा, कापसाला भाव दिला जात नाही. हमीभावापेक्षा कमी भावाने शेतमाल विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. भाजपा हा शेतकरी विरोधी पक्ष असून शेतकऱ्यांना मते मागण्याचा भाजपाला काही एक अधिकार नाही. काँग्रेस मविआची सत्ता आल्यास शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह शेतकरीहिताचे निर्णय घेऊ, असे आश्वासन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अकोट विधानसभा मतदार संघाचे काँग्रेस व मविआचे उमेदवार महेश सुधाकरराव गणगणे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेला संबोधित केले. यावे...
In Mahavikas aghadi advertisement : मविआच्या जाहिरनाम्यात महिलांना वर्षाला ५०० रुपयात ६ सिलेंडर, २.५ लाख सरकारी रिक्त पदांची भरती, कंत्राटी भरती बंद, १०० युनिट मोफत वीज -NNL

In Mahavikas aghadi advertisement : मविआच्या जाहिरनाम्यात महिलांना वर्षाला ५०० रुपयात ६ सिलेंडर, २.५ लाख सरकारी रिक्त पदांची भरती, कंत्राटी भरती बंद, १०० युनिट मोफत वीज -NNL

मुंबई, राजकीय
मुंबई| महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रनामा या जाहिरनाम्याचे हॉटेल ट्रायडंट मधील भव्य पत्रकार परिषदेत प्रकाशन करण्यात आले. मविआ सत्तेत आल्यानंतर पहिल्या १०० दिवसात काय कामे करणावर व पाच वर्षांत काय काम करणार हे या जाहीरनाम्यात सविस्तर मांडण्यात आले आहे. या महाराष्ट्रनामामध्ये महिलांना वर्षाला ६ सिलेंडर ५०० रुपयात दिले जातील, महिला अत्याचाराला आळा घालण्यासाठी शक्ती कायदा आणला जाईल. ३०० युनिट पर्यंत वीजवापर असणा-या ग्राहकांना १०० युनिट मोफत वीज, नवीन औद्योगिक धोरणात रोजगार निर्मितीवर भर असेल. सरकारच्या विविध विभागातील रिक्त २.५ लाख जागा भरल्या जातील. एमपीएससीच्या माध्यमातून नोकर भरती केली जाईल. सरकारी नोकऱ्यातील कंत्राटी भरती पद्धत बंद करणार, सरकारी विभागातील जागांचा अनुषेश भरून काढणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेळापत्रक ठरवून निवडणुका घेतल...
More than 1 lakh polling booths : विधानसभा निवडणुकीसाठी 1 लाखांहून अधिक मतदान केंद्र -NNL

More than 1 lakh polling booths : विधानसभा निवडणुकीसाठी 1 लाखांहून अधिक मतदान केंद्र -NNL

मुंबई, महाराष्ट्र
मुंबई| विधानसभेच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगामार्फत राज्यभरात 1 लाख 427 मतदान केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. मतदारांना सुलभतेने मतदान करता यावे, या दृष्टीकोनातून राज्यात मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. राज्यात सर्वाधिक मतदान केंद्र पुणे जिल्ह्यात आहे. पुण्यात 8 हजार 462 मतदान केंद्र आहेत. त्यानंतर मुंबई उपनगर येथे 7 हजार 579, ठाणे - 6 हजार 955, नाशिक – 4 हजार 922 तर नागपूर येथे 4 हजार 631 मतदान केंद्र आहेत. निवडणूक आयोगाने शहरी भागातील मतदाराची अनास्था विचारात घेऊन गृहनिर्माण संकुलात मतदान केंद्र उभारली आहेत तसेच ग्रामीण आणि आदिवासी भागातील मतदारांना मतदान केंद्राच्या जवळ लवकरात लवकर पोहोचावे यासाठी मतदान केंद्राची संख्या वाढवली आहे. महाराष्ट्रातील 241 विधानसभा मतदारसंघात मुख्य आणि सहायक मतदान केंद्रांची संख्या निश्चित केली आहे. यंदा राज्यात मुख्य मतदान केंद्र ही 1 लाख 1...
Prepare the system for assembly elections : विधानसभा निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज; 4 हजार 140 अंतिम उमेदवार -NNL

Prepare the system for assembly elections : विधानसभा निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज; 4 हजार 140 अंतिम उमेदवार -NNL

मुंबई, महाराष्ट्र
मुंबई| विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सन 2024 साठी राज्यातील एकूण 288 विधानसभा मतदारसंघासाठी एका टप्प्यांमध्ये दिनांक 20 नोव्हेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी यंत्रणेची सर्व तयारी पूर्ण झाली असून या निवडणुकीतील अंतिम उमेदवारांची संख्या 4 हजार 140 असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस.चोक्कलिंगम यांनी आज दिली. मंत्रालय व विधीमंडळ वार्ताहर संघाच्या पत्रकार कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत श्री.चोक्कलिंगम बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.किरण कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी पी.प्रदीप उपस्थित होते. श्री.चोक्कलिंगम यांनी सांगितले की, राज्यातील लोकसभेच्या 16 नांदेड या एका लोकसभा मतदारसंघात सुद्धा दिनांक 20 नोव्हेंबर, 2024 रोजी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी नामनिर्देशनपत्रे सादर करण्याचा अ...
9.7 crore voters in the state : राज्यात ९.७ कोटी मतदार; पुण्यात सर्वाधिक; पाच जिल्ह्यांमध्ये महिला मतदारांची संख्या अधिक -NNL

9.7 crore voters in the state : राज्यात ९.७ कोटी मतदार; पुण्यात सर्वाधिक; पाच जिल्ह्यांमध्ये महिला मतदारांची संख्या अधिक -NNL

मुंबई, महाराष्ट्र
मुंबई| विधानसभा निवडणुकीसाठी २८८ मतदारसंघातील सुमारे ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारसंख्येत पुणे जिल्हा आघाडीवर आहे. रत्नागिरी, नंदुरबार, गोंदिया, भंडारा आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांच्या तुलनेत अधिक आहे. पुण्यात ८८ लाखांहून अधिक मतदार पुण्यातील एकूण मतदारसंख्या ८८ लाख ४९ हजार ५९० आहे तर मुंबई उपनगरात ७६ लाख ८६ हजार ९८ मतदार आहेत. ठाण्यात ७२ लाख २९ हजार ३३९, नाशिक जिल्ह्यात ५० लाख ६१ हजार १८५ आणि नागपुरात ४५ लाख २५ हजार ९९७ मतदार आहेत. पाच जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या अधिक रत्नागिरी, नंदुरबार, गोंदिया, भंडारा आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक आहे. रत्नागिरीतील एकूण मतदार संख्या १३ लाख ३९ हजार ६९७ असून यामध्ये ११ तृतीयपंथींची नोंद आहे. यामध्ये पुरुष मतदार ६ लाख ४६ हजार १७...
2452 complaints of violation of code : आचारसंहिता भंगाच्या 2452 तक्रारी निकाली 253 कोटींची मालमत्ता जप्त -NNL

2452 complaints of violation of code : आचारसंहिता भंगाच्या 2452 तक्रारी निकाली 253 कोटींची मालमत्ता जप्त -NNL

क्राईम, मुंबई
मुंबई| विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ साठी  15 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर २०२४ पर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण 2469 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 2452 तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.  नागरिकांना आचारसंहिता पालनासाठी सहकार्य करणारे सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲप हे कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाऊनलोड करता येते. या ॲपद्वारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते. 253 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत एकूण 253 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात...
Thanks for removing Rashmi Shukla : पोलीस महासंचालक पदावरून रश्मी शुक्लांना हटवल्याबद्दल धन्यवाद, पण एवढा वेळ का लागला?:  नाना पटोले -NNL

Thanks for removing Rashmi Shukla : पोलीस महासंचालक पदावरून रश्मी शुक्लांना हटवल्याबद्दल धन्यवाद, पण एवढा वेळ का लागला?: नाना पटोले -NNL

मुंबई, राजकीय
मुंबई| वादग्रस्त आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना भाजपा युती सरकारने बेकायदेशीपणे दोन वर्षाची मुदतवाढ देत त्यांना राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नेमले होते. रश्मी शुक्ला या सत्ताधारी भाजपाला मदत करणाऱ्या अधिकारी असल्याने त्यांना पदावरून हटवण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती त्या मागणीला यश आले आहे. निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवले त्याबद्दल धन्यवाद पण झारखंड व पश्चिम बंगालच्या पोलीस महासंचालकांना तात्काळ हटवले होते, रश्मी शुक्ला यांना हटवण्यास एवढा उशिर का लागला? असा प्रश्न उपस्थित करुन आता रश्मी शुक्ला यांना निवडणुसंदर्भातील कोणतेही काम देऊ नये, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. पोलीस महासंचालक पदावरून रश्मी शुक्ला यांना हटवल्यानंतर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले की, रश्मी शुक्ला या वादग्रस...
Immediately ban the import of cotto : कापसाच्या आयातीवर तात्काळ बंदी घालून हमीभावाने कापूस खरेदी करा -NNL

Immediately ban the import of cotto : कापसाच्या आयातीवर तात्काळ बंदी घालून हमीभावाने कापूस खरेदी करा -NNL

राजकीय, मुंबई
मुंबई| कापूस उत्पादनात महाराष्ट्र देशातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य असून ४० लाखांपेक्षा जास्त शेतकरी कापसाचे उत्पादन घेतात. राज्यात भरपूर कापूस उत्पादन होत असताना २२ लाख गाठी कापसाची आयात करण्यात आल्याच्या बातम्यांमुळे देशात कापसाच्या भावात मोठी घसरण होण्याची भिती आहे. भारतीय कापूस महामंडळाकडेही विक्री न झालेल्या ११ लाख कापूस गाठी पडून आहेत. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन केंद्र सरकारने कापसाच्या आयातीवर तत्काळ बंदी घालून भारतीय कापूस महामंडळाला (CCI) हमीभावाने कापूस खरेदी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या पत्रात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणतात की, सध्या कापसाचे भाव ६५०० ते ६६०० रुपये प्रति क्विंटल असून हा भाव ७१२२ रुपये या हमीभावापेक्षा कमी आहे. बाजा...
error: Content is protected !!