मुंबईमहाराष्ट्र

9.7 crore voters in the state : राज्यात ९.७ कोटी मतदार; पुण्यात सर्वाधिक; पाच जिल्ह्यांमध्ये महिला मतदारांची संख्या अधिक -NNL

मुंबई| विधानसभा निवडणुकीसाठी २८८ मतदारसंघातील सुमारे ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारसंख्येत पुणे जिल्हा आघाडीवर आहे. रत्नागिरीनंदुरबारगोंदियाभंडारा आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांच्या तुलनेत अधिक आहे.

पुण्यात ८८ लाखांहून अधिक मतदार

पुण्यातील एकूण मतदारसंख्या ८८ लाख ४९ हजार ५९० आहे तर मुंबई उपनगरात ७६ लाख ८६ हजार ९८ मतदार आहेत. ठाण्यात ७२ लाख २९ हजार ३३९नाशिक जिल्ह्यात ५० लाख ६१ हजार १८५ आणि नागपुरात ४५ लाख २५ हजार ९९७ मतदार आहेत.

पाच जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या अधिक

रत्नागिरीनंदुरबारगोंदियाभंडारा आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक आहे. रत्नागिरीतील एकूण मतदार संख्या १३ लाख ३९ हजार ६९७ असून यामध्ये ११ तृतीयपंथींची नोंद आहे. यामध्ये पुरुष मतदार ६ लाख ४६ हजार १७६ आणि महिला मतदार ६ लाख ९३ हजार ५१० आहेत. नंदुरबारमध्ये एकूण मतदार १३ लाख २१ हजार ६४२ असून यामध्ये १३ तृतीयपंथींची नोंद आहे. यामध्ये पुरुष मतदार ६ लाख ५४ हजार ४१२ आणि महिला मतदार ६ लाख ६७ हजार २१७ आहेत.

गोंदिया जिल्ह्यात एकूण मतदार ११ लाख २५ हजार १०० असून यामध्ये १० तृतीयपंथींची नोंद आहे. यामध्ये पुरुष मतदार ५ लाख ५३ हजार ६८५ आणि महिला मतदार ५ लाख ७१ हजार ४०५ आहेत. भंडारा येथे एकूण मतदार १० लाख १६ हजार ८७० असून यामध्ये ४ तृतीयपंथींची नोंद आहेपुरुष मतदार ५ लाख ६ हजार ९७४ आणि महिला मतदार ५ लाख ९ हजार ८९२ आहेत. सिंधुदुर्गात एकूण मतदार ६ लाख ७८ हजार ९२८ असून यामध्ये ३ तृतीयपंथींची नोंद आहे. पुरुष मतदार ३ लाख ३६ हजार ९९१ आणि महिला मतदार ३ लाख ४१ हजार ९३४ आहेत.

राज्यात ४.६९ कोटी महिला मतदार

राज्यात विधानसभेसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. एकूण ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदारांची नोंद आहे ज्यामध्ये ५ कोटी २२ हजार ७३९ पुरुष४ कोटी ६९ लाख ९६ हजार २७९ महिला आणि ६ हजार १०१ तृतीयपंथी मतदार आहेत.

५ जिल्ह्यात ३० लाखांहून अधिक मतदार

अहमदनगरसोलापूरजळगावकोल्हापूर आणि औरंगाबाद या पाच जिल्ह्यांमध्ये ३० लाखांहून अधिक मतदार आहेत. सोलापूरमध्ये ३८ लाख ४८ हजार ८६९, अहमदनगरमध्ये ३७ लाख ८३ हजार ९८७जळगावमध्ये ३६ लाख ७८ हजार ११२कोल्हापूरमध्ये ३३ लाख ५ हजार ९८ आणि औरंगाबादमध्ये ३२ लाख २ हजार ७५१ मतदार आहेत. बुलढाणाअमरावतीयवतमाळनांदेडरायगडमुंबई शहरबीडसातारासांगली आणि पालघर या १० जिल्ह्यांमध्ये २० लाखांहून अधिक मतदार आहेत.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button