Wednesday, May 13

कृषी

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Why the readiness of public representatives..? Not visible : पुरग्रस्त शेतक-याच्या बाबतीत लोकप्रतिनिधीची तत्परता का..? दिसुन येत नाही -NNL

Why the readiness of public representatives..? Not visible : पुरग्रस्त शेतक-याच्या बाबतीत लोकप्रतिनिधीची तत्परता का..? दिसुन येत नाही -NNL

नांदेड, कृषी
हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पावसाने शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र केवळ फोटो सेशन पुरते राजकीय नेते काम करत असल्याने गतवर्षीच्या पिकविम्याच्या नुकसान भरपाईसह यंदाच्या अतिवृष्टीच्या मदतीपासून नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहतात कि काय..? असे साध्यतंरी दिसून येत आहे. पुरग्रस्त शेतक-याच्या बाबतीत लोकप्रतिनिधीची तत्परता का..? दिसुन येत नाही असे खडेबोल शेतकरी बोलून दाखवीत आहेत. हदगाव विधानसभा क्षेञात २०१९ च्या दरम्यान अशीच अतिवृष्टी झाली होती. त्यावेळी हिगोली लोकसभाचे सेनेचे खा.हेमत पाटील यांनी हदगाव हिमायनगर तालुक्यात धावती भेट दिली. आणि तात्काळ पुरग्रस्त भागातील नागरिकांना व ञस्त शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेट देवून हदगाव शहरातील तहसिल कार्यालयात ग्रामस्थ, नागरिक, शेतकरी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार दोन्ही तालुक्यातील सर्व संबधित कर्मचारी प्रमुख अधिकारी, ...
Co. Arjun Ade : “अतिवृष्टीचे तातडीने पंचनामे करून हेक्टरी ५० रु. हजार मदत जाहीर करा” – काॅ.अर्जुन आडे -NNL

Co. Arjun Ade : “अतिवृष्टीचे तातडीने पंचनामे करून हेक्टरी ५० रु. हजार मदत जाहीर करा” – काॅ.अर्जुन आडे -NNL

कृषी, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे| अखिल भारतीय किसान सभा किनवट तालुका कमिटीच्या वतीने अतिवृष्टीने झालेल्या नुकसानी बाबद आज दि.४ सप्टेंबर रोजी किनवट तहसिल येथे निवेदण देण्यात आले. किनवट तालुक्याच्या सर्वच मंडळात गेल्या चार-पाच दिवसापासून प्रचंड पावसाने थैमान घातले असुन शेती पिके उध्वस्त होऊन धोक्यात आली आहे. हातात तोंडाला आलेलेसोयाबीन ,कापूस ,मूग,उडीद, मका इत्यादी शेती पिके अतिवृष्टीच्या पाण्यामुळे प्रचंड नुकसान झालेली आहे. नदी नाल्यालगतच्या शेती संपूर्णपणे खरडून निघाल्याने पिके वाहून गेली आहे अशा अवघड वेळी शासन आणि प्रशासन स्तरावरून तातडीने शेतकऱ्यांना मदत करण्याची आवश्यकता असुन तातडीने विनाविलंब पंचनामे करुन हक्टरी ५० हजार जाहीर करावे असे मत निवेदण सादर करतांना किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष काॅ.अर्जुन आडे यांनी व्यक्त केले. निवेदनात अतिव्रष्टीच्या अनुशंगाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना हे...
Former MLA Pradeep Naik : गेल्या दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन त्वरीत नुकसान भरपाई द्यावी – माजी आमदार प्रदीप नाईक  -NNL

Former MLA Pradeep Naik : गेल्या दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन त्वरीत नुकसान भरपाई द्यावी – माजी आमदार प्रदीप नाईक -NNL

कृषी, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे| किनवट तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार व अतिवृष्टीने धो-धो पाऊस पडत असल्यामुळे शेतीतील शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी माजी आमदार प्रदीप नाईक यांनी आज दिनांक 4 रोजी किनवट तालुक्यातील अप्पारावपेठ दयाळधानोरा, शिवनी, झळकवाडी , तल्लारी कुपटी ,कोसमेट, मुळझरा,कोल्हारी, इस्लापूर, भिशी, या गावांमध्ये थेट शेतीच्या बांधावर जाऊन शेतीची पाहणी केली. त्याच बरोबर कापुस, सोयाबिन, उडीद, ज्वारी, तुर या पिकांची व घर, गाई, गोठे, पशुधनाची जिवित हाणी झाली आहे. तालुक्यातील सर्व महसुल मंडळ निहाय तलाठी व ग्रामसेवक यांना पंचनामा करण्याकरीता आदेश काढण्यात यावा पिक नुकसानहीसह इतर सर्व नुकसानीची भरपाई देण्यात यावी तथापि विना विलंब सरसकट तालुक्यात झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानीचा हेक्टरी ५०,०००/- रुपये मोबदला शेतकऱ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँ...
Guardian Minister Girish Mahajan  ; पालकमंत्री गिरीश महाजन यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाची केली पाहणी – NNL

Guardian Minister Girish Mahajan ; पालकमंत्री गिरीश महाजन यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाची केली पाहणी – NNL

कृषी, नांदेड
नांदेड| राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज लातूर व नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या काही ठिकाणांच्या नुकसानाची पाहणी केली. त्यांनी नांदेड जिल्हयातील लोहा तालुक्यातील सुनेगाव शिवारामध्ये भेट देऊन शेतीची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी त्यांनी चर्चा केली. नांदेड जिल्ह्यात गेल्या 3 दिवसापासून सर्वदूर अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीमुळे शेती, पशुधन, घरे व अन्य मालमत्तेचे नुकसान झाले आहे. पाऊस थांबताच प्रशासनाने तातडीने पंचनामे करण्यात यावे, असे निर्देश पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले. रविवारी जिल्हयातील 93 मंडळापैकी 68 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे उभ्या पिकाचे नुकसान झाले आहे. दरम्यान महसूल यंत्रणा कामी लागली असून जिल्ह्यामध्ये झालेल्या नुकसानाची नेमकी अंदाजित आकडेवारी उद्यापर्यंत पुढे येण्याची शक्यता आहे. आज पाहणी करत...
285 guests traveled half a km by boat for the funeral : पिंपरीच्या कोंडाबाई पवार यांच्या अंत्यविधीसाठी अर्धा किमी नावेतून 285 पाहुण्याने केला प्रवास -NNL

285 guests traveled half a km by boat for the funeral : पिंपरीच्या कोंडाबाई पवार यांच्या अंत्यविधीसाठी अर्धा किमी नावेतून 285 पाहुण्याने केला प्रवास -NNL

नांदेड, कृषी
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर तालुक्यात पैनगंगा नदीला पूर आल्याने सर्वत्र नदी नाले भरून वाहत आहेत. नदीच्या पुराचे पाणी पिंपरी गावच्या रत्स्यावर आल्याने कामारी ते पिंपरी गावचा तीन दिवसापासून संपर्क तुटला आहे. दरम्यान पिंपरीच्या कोंडाबाई पवार यांचा निधन झाल्याने आज अंत्यविधीसाठी आलेल्या 285 पाहुण्याने चक्क अर्धा किमी नावेतून प्रवास करून उपस्थिती लावली आहे. त्यामुळे येथील पुलासह रत्स्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, दरवर्षी या गावचा पुराच्या पाण्याने संपर्क तुटतो यावर राजकीय नेते व शेणाने उपाय काढून पुलासह उंच मजबूत रास्ता करून द्यावा अशी मागणी केली जात आहे. हिमायतनगर तालुक्यातील पैनगंगा नदीला महापूर आला आहे. केदारनाथ कडून लाखाडी नदी ही कामारी जवळ पैनगंगेला येऊन मिळते येथे नदीचा संगम झाल्याने पैनगंगेचे पाञ भरले की लाखाडी नदीचे पाणी पाञात जात नाही. त्यामुळे कामारी जवळील लाखाडी नदी पुराच्या...
Osmannagar area ; उस्माननगर परिसरात पावसामुळे शेतात पाणीच पाणी , पिकांचे नुकसान – NNL

Osmannagar area ; उस्माननगर परिसरात पावसामुळे शेतात पाणीच पाणी , पिकांचे नुकसान – NNL

कृषी, नांदेड
उस्माननगर, माणिक भिसे | शनिवारच्या मध्यरात्री पासून जोरदार पावसाने हजेरी लावली होती. रविवारीही दिवसभर पावसाने झोडपले दोन तीन दिवस झालेल्या संततधार व जोरदार पावसाने नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे शेतात पाणीच पाणी झाल्याने खरिपाचे पिके खरडून गेली असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. जिल्ह्यासह उस्माननगर परिसरात झालेल्या अतिवृष्टीने व पुरामुळे अनेकांची शेती खरडून व सखल भागातील पिकात पाणी साचून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे . परिसरात झालेल्या संततधार पावसामुळे घरांची ही पडझड झाली आहे. ‌‌ कंधार तालुक्यातील उस्माननगर सह परिसरात रविवारी दि. १ रोजी झालेल्या संततधार पावसामुळे शेतशिवारात पाणीच पाणी चहूकडे झाल्याने खरिपाचे पिक पाण्याने खरडून नेले आहे. या पावसामुळे परिसरात पुरपरिस्थितीने नदी नाल्यांना पूर येऊन जमिनी खरडून, व सखल भागातील शेतातील पिकात पाणी साचून परिसरातील शिवारातील पिकांचे मोठे नुकसान ...
Umrah residents demand ; बाधित शेतकरी व नागरिकांना शासनाकडून भरीव द्या उमरा वासीयांची मागणी – NNL

Umrah residents demand ; बाधित शेतकरी व नागरिकांना शासनाकडून भरीव द्या उमरा वासीयांची मागणी – NNL

कृषी, नांदेड
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| १ सप्टेंबरच्या रात्री झालेल्या अतिवृष्टीने शेतातील पिकांचे व शेतजमिन, पशुधन शेतीउपयोगी औजारे व इतर साहित्यांचे प्रचंड नुकसान झाल्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ शासनाकडून अनुदान देण्याची मागणी तालुक्यातील उमरा वासीयांनी माहूर तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. १ सप्टेंबरच्या रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे मौजे उमरा शिवारातील नाल्या ओढ्यांना प्रचंड मोठा महापूर आल्याने उमरा शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतात महापुराचे पाणी वाहून गेल्याने शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांचे शेत खरडून गेले. तसेच गोठ्यावर बांधून असलेले पशुधन सुद्धा मृत्यू मुखी पडले. शेतकऱ्यांच्या शेतातील शेती उपयोगी औजारे व साहित्यांचे नुकसान झाले. तसेच गावातील काही नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले असून या बाबीची तातडीने द...
Yash Kharate ; नूकसान ग्रस्त शेतकर्‍यांना व मयत शेतकर्‍याला सरसकट मदत द्या – अॅड.यश खराटे – NNL

Yash Kharate ; नूकसान ग्रस्त शेतकर्‍यांना व मयत शेतकर्‍याला सरसकट मदत द्या – अॅड.यश खराटे – NNL

कृषी, नांदेड
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| माहूर तालुक्यासह इतर तालुक्यात अतिवृष्ठीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट भरपाई द्यावी,त्याच बरोबर हिवळणी येथील मयत शेतकरी विलास राठोड यांच्या कुंटूबाला तात्काळ अर्थीक मदत करावी अशी मागणी युवासेना जिल्हा प्रमुख अॅड.यश खराटे केली आहे. माहूर तालुक्यासह संपूर्ण नांदेड जिल्ह्यात अतिवृष्ठीने कहर केला आहे.झालेल्या पावसामुळे शेतातून पाणी वाहू लागले. मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. अशास्थितीत शासनाने सर्वेक्षण न करता शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी युवासेनाचे जिल्हाप्रमुख अॅड. यश खराटे यांनी केली आहे. पावसाने कहर केल्याने पिकांची अवस्था विदारक झाली आहे. सोयाबीन, मूग, उडीद, कापूस व अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सर्व पिके धोक्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.त्याच बरोबर माहूर तालुक्यातील मौजे हिवळणी येथ...
NCP’s Sharad Chandra Pawar  ; अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची मागणी – NNL

NCP’s Sharad Chandra Pawar ; अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची मागणी – NNL

कृषी, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे| सतत कोसळत असलेल्या मुसळधार पाऊसामुळे शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले असुन दिनांक ३१ ऑगस्ट रोजी रात्री झालेल्या ढगफुटीसदृष्य पाऊसामूळे किनवट तालुक्यातील अनेक घरात व शेतामध्ये पाणी शिरल्याने नागरीकांचे अतोनात नुकसान झाले आहे या अणूषंगाने माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे सहाय्यक जिल्हाधिकारी यांना निवेदनाव्दारे तत्काळ सरसकट शासकीय मदत जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉग्रेस श.प.पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात मागणी केली आहे कि, शेतक-यांना कोणत्याही तांत्रिक अडचणीत न आणता सरसकट शासनाची मदत जाहीर करण्यात यावी तथा झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करुन शेती व घरामध्ये अतिवृष्टीचे पाणी शिरुन झालेल्या नुकसानीचा मोबदला नागरीकांना देण्यात य...
Bullockpola festival is a big celebration : हिमायतनगर शहरात बैलपोळा सण मोठ्या साजरा; ढोल ताशाच्या गजरात काढली मानाच्या बैलजोडीची मिरवणूक -NNL

Bullockpola festival is a big celebration : हिमायतनगर शहरात बैलपोळा सण मोठ्या साजरा; ढोल ताशाच्या गजरात काढली मानाच्या बैलजोडीची मिरवणूक -NNL

कृषी, नांदेड, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| गेल्या महिन्याभरापासून पाऊस नसल्याने वाळू लागलेल्या पिकांची चिंता करत असताना दोन दिवसापासून हिमायतनगर तालुका परिसरात मुसळधार पावसाचे आगमन झाले. त्यामुळे हिमायतनगर शहरात बैलपोळा सण मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला आहे. यावेळी भर पावसात वाजत गाजत नगरपंचायतीच्या मनाच्या बैलजोडीची मिरवणूक काढण्यात आली होती. हर हर महादेवच्या नामाचा जयघोष करून विवाहसोहळा थाटात सपन्न झाला. कृषी प्रधान भारत देशात " बळीराजाचा बैलपोळा " हा सर्वात महत्वाचा सन आहे. या उत्सवाच्या पूर्व संध्येपासून पोळ्याची तयारी केली जाते. येथील युवा शेतकरी जंगल परिसर पिंजून काढून पळसाच्या पानाचा देठवा आणून अन्नदात्या सर्जाराजाची खांदे मळणी करतात. आणि बळीराजाला पोळ्याच्या दिवशीचे जेवणाचे निमंत्रण दिले आहे. शेतात घाम गाळून काळ्या आईची सेवा करणाऱ्या शेतकर्यांसोबत खांद्याला खांदा लाऊन काम करणाऱ्या (ऋषभराजाचा) ब...
error: Content is protected !!