Farmers’ demand : शेतकऱ्यांची मागणी: खासदार-आमदारांचा पगार आणि मंदिरातील देणगी शेतकऱ्यांसाठी वापरा

देगलूर, गंगाधर मठवाले| शहापूर, तालुका देगलूर जि. नांदेड भागामध्ये सलग पडत असलेल्या पावसामुळे शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील सोयाबीन, कापूस, तुरी, उडीद, मुग यासह रब्बी पिकांची तयारी करणे कठीण झाले आहे. तसेच जनावरांचे मृत्यू आणि मातीची खराब स्थिती यामुळे शेतकऱ्यांचे जीवन हवालदिल झाले आहे.

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, शासनाने प्रति गुंठा केवळ ८५ रुपये मदत जाहीर केली असून, त्यावर त्यांच्या उदरनिर्वाहाचा खर्च होत नाही. जवळपास ४०,००० रुपये खर्च करून शेतकऱ्यांना मिळणारी मदत केवळ ३,५ हजार रुपये ही लाजिरवाणी बाब आहे.

शेतकऱ्यांची मागणी आहे की, खासदार आणि आमदारांचे पगार थेट शेतकऱ्यांसाठी वापरात आणावा. तसेच महाराष्ट्रातील मंदिरांत जमा असलेली देणगी शेतकऱ्यांच्या सशक्तीसाठी वापरण्यात यावी. शेतकऱ्यांनी म्हटले की, हे पगार आणि निधी शेतकऱ्यांना दिल्यास कर्जमुक्ती आणि जीवनमान उभे राहण्यास मदत होईल.

हवामान अंदाजानुसार ३० सप्टेंबरपर्यंत पाऊस सुरू राहणार असल्यामुळे उभ्या पिकांची नुकसानाची शक्यता वाढली आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, पिकांचे कोम फुटणे आणि पिकांचे सडणे यामुळे शेतकऱ्यांच्या भविष्याची आशा धूसर झाली आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button