श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। माहूर ते किनवट राष्ट्रीय महामार्गावरील उमरा गावाजवळ बैलगाडी घेऊन आपल्या शेतात जात असलेल्या शेतकरी यांच्या बैलगाडीला ईर्टिगा कारने जोराची धडक दिल्याने ३४ वर्षीय युवा शेतकरी ठार तर दोन्ही बैलाचे पाय निकामी झाल्याची घटना शुक्रवार दि,२५ एप्रिल रोजी रात्री ११.३० वा घडली.


माहूर तालूक्यातील उमरा तांडा येथील शेतकारी दिलीप बळीराम जाधव वय ३४ यांची मेट शिवारात शेती आहे, व सध्या शेतात ओलीताचे पिक असल्याने व रात्री ची लाईन असल्यामुळे ते पाणी देण्या करीता रात्री ११.३० वा शेतात बैलगाडी घेऊन जात होता उमरा व मेटच्या पुलावर आला असता समोरुन येणा-या ईर्टिगा कार क्र,टि.एस. ११.इपी १४७३ ने जोरदार धडक दिली.



आवाज ऐकून गावक-यानी घटनास्थळी धाव घेतली व माहूरच्या ग्रामीण रूग्णालयात आणले असता वैघकिय अधिकारी डॉ विपिन बावळे यांनी दिलीपला मुत्यु घोषित केले, गाडीला असलेले दोन्ही बैलाचे पाय निकामी झाले,घटनास्थळावर सिदखेड पोलीसांनी धाव घेऊन कार चालकास ताब्यात घेतले दिलीप च्या पाश्चात्य आई वडिल ऐक मुलगा व मुलगी आहे.









