श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे |आज शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली असून श्री रेणुका मातेच्या दर्शनासाठी माहूरगडावर संपूर्णं महाराष्ट्रातील भाविक दर्शासाठी येत असतात त्या भाविकांची गैर सोय होऊ नये,या हेतुने शिवसेना-युवासेनेच्या (उबाठा) वतीने श्री रेणुका मातेच्या दर्शासाठी येणार्या ५१ हजार भाविक भक्तांना फळे वाटप करण्याच्या कार्यक्रमला पहिल्या माळीपासून सुरुवात.


माहूरगडावरील श्री रेणूकादेवीच्या नवरात्र उत्सवास दि.३ आॅक्टोला सुरुवात झाली आहे. हा नवराञ उत्सव अगदी आनंदात साजरा केला जाते. नवरात्र उत्सवात संपूर्णं महाराष्ट्रासह इतर राज्यातून लाखो भाविक श्री रेणूकामातेच्या दर्शनाकरिता माहुरगडावर येतात आशा वेळी दुरुन येणार्या भाविकांची गैर सोय होऊ नये, या उदांत्त हेतूने व हिन्दुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या धोरना प्रमाणे २० टक्के राजकारण व ८० टक्के सामाजकारण हा मुलमंत्र मनी धरुण युवासेना, शिवसेनाच्या (उबाठा ) वतीने व युवासेना जिल्हाप्रमुख अॅड.यश खराटे यांच्या नेतृत्वाखाली दररोज येणार्या ५१ हजार भाविक भक्तांना फळे वाटपाचे आयोजन करण्यात आले आहे.आज पासून सुरु झालेल्या नवराञ उत्सवाच्या पहिल्या दिवसीच्या फळे वाटपाच्या कार्यक्रमाप्रसंगी किनवट-माहूर विधानसभा प्रमुख ज्योतिबा खराटे, शिवसेना उप.जिल्हाप्रमुख अनिल रूणवाल, जवाहरलाल जयस्वाल,युवासेना जिल्हा समनवय नितीन पाटील कन्नलवार, माहूर नगरपंचायत उपाध्यक्ष नाना लाड, नगरसेवक विजय कामटकर, शहर प्रमुख निरधारी जाधव, युवासेना उपजिल्हाप्रमुख जितु चोले, युवासेना तालुका प्रमुख अक्षय वाघ पाटील, संदीप गोरडे, वसीम शेख,युवतीसेना तालुका प्रमुख सुरेखा तळणकर आशिष जयस्वाल,अभिषेक जयस्वाल, अभिषेक दुबे,रुपेश कोवे,बाळु दवणे, आशिर्वाद आडावे, अक्षय जांभळे, गजानन चोपडे.यांची उपस्थिती होती.


नवरात्रीच्या पावन उत्सवात अनेक भागातून भाविक आई रेणुकामातेच्या दर्शनासाठी येत असतात.अशा वेळी त्यांची गैर सोय होऊ नये हा आमचा मानस आहे.येणार्या भाविकांची मनोभावे सेवा करून आपण यातूनच ईश्वरसेवा साधत असल्याचे प्रतिपादन यावेळी अॅड.यश खराटे यांनी केले.