श्रीक्षेञ माहर, कार्तिक बेहेरे। माहूर तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून मेघगर्जनेसह अतिवृष्ठी झाल्याने सर्वत्र जलमय परिस्थिती निर्माण झाली आहे.नदी नाले ओसंडून वाहत आहेत. अशातच शनिवार व रविवार रोजी पडलेल्या मुसळधार पावसाने तालुक्यात आहाकार केला आहे. यात शेतीसह अनेक दुकानात- घरात पाणी शिरल्याने मोठे नूकसान झाले आहे.


ऐवढेच नव्हेतर तालुक्यातील वाई बाजार येथील २ व ६ क्रमांकाच्या अंगणवाड्यांना पुराच्या पाण्याने चारही बाजूने वेढले होते.सदरील अंगणवाड्यात पाणी शिरल्याने सर्व साहित्याची नासधूस झालेली तसेच पोषण आहाराचे साहित्य पाण्यात भिजले गेल्याने साहित्य खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


गेल्या दोन दिवसापासून सततधार पाऊस चालु असल्याने व सोमवार असल्याने दोन्ही सेविका अंगणवाडीत उपस्थित झाले तर अंगणवाडीचा परिसर बघून अचंबित झाले.अंगणवाडी परिसर संपूर्ण जलमय झाले होते.अंगणवाडीत पाणी साचल्याचे बघून सेविकांनी आपल्या घरच्या मंडळीच्या मदतीने पाण्यात शिरुन सर्व साहित्य व्यवस्थित ठेवले.ही समस्या दरवर्षी उदभवत असल्याने या समस्येबद्दल सेविकांनी संबंधित ग्राम पंचायत प्रशासनाला वारंवार कळविले आहे.


परंतु आज तगायत ही समस्या मिटलेली नाही.विशेष म्हणजे येथील उपसरपंच उस्मान खान हे अतिवृष्ठीच्या संकटात सापडलेल्या नागरिकांना मदत करत असल्याच्या बातम्या असतात, परंतु उद्याचे भविष्य असलेल्या चिमुकल्याकडे का बघत नाहीत असा सवाल प्रत्यक्षक्षणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी उपस्थित केला आहे. अतिवृष्ठीने नूकसान झालेल्या अंगणवाड्याची पाहणी करुण तात्काळ मदत करावी,अशी मागणी अंगणवाडी क्रंमाक २ व ६ च्या कार्यकर्तीने संबधीताकडे केली आहे.


