Mnrega : मनरेगा अंतर्गत विहीर व शेततळ्यासाठी तब्बल 7 लाखांची तरतूद
ग्रामीण भागातील तसेच कष्टकरी शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत विहीर खोदणे, शेततळे बांधणे यासारख्या वैयक्तिक कामांसाठी मिळणाऱ्या आर्थिक मर्यादेत केंद्र सरकारने मोठी वाढ केली असून, आता या कामांसाठी थेट 7 लाख रुपयांपर्यंत निधी उपलब्ध होणार आहे.
मनरेगा ही योजना ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानली जाते. या योजनेअंतर्गत वैयक्तिक स्वरूपाची कामे करून शेतकऱ्यांना पाणी उपलब्धता, शेती उत्पादनवाढ आणि रोजगाराची हमी मिळते. विशेषतः विहीर व शेततळे ही कामे शाश्वत शेतीसाठी अत्यंत महत्त्वाची ठरत आहेत.
आधीची मर्यादा आणि निर्माण झालेल्या अडचणी
पूर्वी मनरेगा अंतर्गत वैयक्तिक कामांसाठी आर्थिक मर्यादा ५ लाख रुपये इतकी होती. मात्र, मधल्या काळात केंद्र सरकारने ही मर्यादा अचानक कमी करून २ लाख रुपये इतकी केली....

