Demand ; उन्हाचे चटके जाणवत असल्याने रस्ते सुनसान. रुमाल , टोप्या चष्म्यांची मागणी
उस्माननगर l मार्च महिन्यात बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसामुळे वातावरण थोडा फार बदल करून गारवा निर्माण झाला.नंतर या महीन्यात सुरूवातीपासून उस्माननगर परिसरात चाळीस च्या वर तापमान वाढल्याने नागरिकांची परेशानी वाढली आहे. उन्हाचे चटके जाणवत असल्याने रस्ते सुनसान दिसत आहे थंड ठिकाणी व झाडाखाली गप्पांची मैफल रंगत आहे.
कंधार तालुक्यात अवकाळी पाऊस व वाऱ्यामुळे आंब्याचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. व्यापारी व शेतकरी संकटात सापडला. अवकाळी पावसाने नेहमी सारखे तांडव या भागात पाहायला मिळाले नसल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला. आणखी चार दिवस यलो अलर्ट जाहीर केल्यामुळे नागरिक चिंतेत जगत आहेत.
गतवर्षी उन्हाचे चटके चांगलेच बसले होते. उन्ह चांगलेच तापत आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी मोठ मोठे रूमाल , टोप्या , वाहनचालक चष्मा खरेदीसाठी बाजारात गर्दी करताना पहावयास मिळत आहेत. याचबरोबर नागरिक थंड हवा ...
