Borgadi Farmer’s warry : बोरगडी सज्जाच्या तलाठ्यांकडून क्षेत्र कमी दाखवून शेतकऱ्यांचे नुकसान; तलाठ्यांना निलंबित करा!
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी सज्जातील तलाठ्यांकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे नुकसान जाणीवपूर्वक कमी दाखवून शासनाच्या आदेशाची पायमल्ली केल्याचा गंभीर आरोप होत आहे. शासनाकडून शंभर टक्के नुकसान भरपाई देण्याच्या स्पष्ट सूचना असूनही तलाठ्यांनी केवळ 55 ते 60 टक्के नुकसान दाखवून शेतकऱ्यांना शासन अनुदानापासून वंचित केले आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित तलाठ्यांना निलंबित करून शेतकऱ्यांचे उर्वरित अनुदान तातडीने जमा करावे, अशी मागणी उबाठा गटातर्फे करण्यात आली आहे.
अतिवृष्टीमुळे नदीकाठच्या तसेच नाल्यालगतच्या शेतजमिनी खरडून गेल्या असून, बोरगडी, बोरगडी तांडा, कारला आणि सिबदरा येथील शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. तरीदेखील बोरगडी सज्जाचे तलाठी केशव थळंगे यांनी नुकसान क्षेत्र कमी दाखवून शासनाकडे चुकीचा अहवाल सादर केला असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.
संतप्त ...
