Release water from Isapur dam : ईसापुर धरणातून पेनगंगा नदीला पाणी सोडा – शेतकऱ्यांची मागणी
हिमायतनगर,अनिल मादसवार| गेल्या काही महिन्यापासून पैनगंगा नदी कोरडी पडल्यामुळे अनेक गावांमध्ये भीषण जलसंकट निर्माण झाले आहे. नदीचे पात्र कोरडे पडल्यामुळे गावांतील पाणीपुरवठा योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. कारण पैनगंगा नदीपात्रातून होत असलेली रेती चोरीमुळे पाणी टंचाईची समस्या गंभीर होते आहे. याचा नाहक फटका नागरिकांना, मुक्या जनावरांना व पशु पक्षांना आणि शेतीसाठी आवश्यक असलेल्या शेतकऱ्यांना बसत आहे. यामुळे त्रस्त झालेल्या अनेक गावांतील शेतकरी आणि ग्रामस्थांनी इसापूर धरणातून नदीत पाणी सोडण्याची मागणी केली आहे.
विदर्भ मराठवाडा सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीपात्रातून होत असलेला अविद्या वाळू उपास यामुळे पाणी टंचाईची समस्या वाढू लागली आहे. पाणी टंचाई भासत असल्याने जनतेतून पाणी सोडण्याची मागणी होते आहे. मात्र अद्याप प्रशासनाने याची दखल घेतलेली नाही. आवश्यकता असतेवेळेस नदीपात्रात पाणी सोडण्य...
