Swachhata abhiyan ; महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने गोंडजेवलीतांडा येथे स्वच्छता मोहीम -NNL
शिवणी, भोजराज देशमुख। महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त गोंडजेवली तांडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बालसभेचे आयोजन करण्यात आले.यामध्ये तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी बालसभेचे आयोजन केले. विद्यार्थ्यांनी खूप सुंदरपणे नियोजन करून बालसभा घेतली निवडक विद्यार्थ्यांची भाषणे यावेळी झाली तसेच स्वच्छता हीच सेवा या उपक्रमांतर्गत सर्व विद्यार्थ्यांनी शालेय परिसरात , सार्वजनिक ठिकाण, मंदिर परिसर, स्वच्छता मोहीम राबवून शालेय परिसर व गावातील मुख्य रस्ता स्वच्छ केला.
गावातील ग्रामस्थ यांनीही नाली व रस्ता स्वच्छता करण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी मदत केली.विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व या उपक्रमातून समजण्यास मदत झाली. ‘स्वच्छता कशी चांगली ठेवता येईल. शौचालयाची स्वच्छता नीट झाली पाहिजे, जेणेकरून आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. गावातील स्वच्छतेचे प्रश्न यावर गांभीर्याने दखल...
