नांदेड

बाबारमजान गल्लीत आठ आठ दिवस येत नाही नळाला पाणी, न.प.चे दुर्लक्ष; रहिवाशांनी दिला घागर मोर्चाचा इशारा -NNL

किनवट, परमेश्वर पेशवे। शहरातील बाबारमजान गल्ली येथे नळांना पाणीच येत नसतांना न.प.च्या ट्रॅक्टरद्वारे पाणी पुरवठा केला जाणारे टेंकर पण या वार्डात येत नसून टँकर कर्मचारी व पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांच्या संगणमताने केला जात असुन आठवड्यातून दोनदा टँकर येतो तर कधी कधी आठवड्यातून एकदाच येतो बाकी वार्डात दररोज टँकर चालू असुन बाबारमजान गल्लीतील जनतेचे म्हणणे आहे. अधिच नळाला पाणी येत नसतांना टँकरद्वारे नियोजीत पाणीपुरवठा करणारे न.पा. कर्मचारी यांना सांगल्यावरही ते टँकर पाठवत नाहीत नळ ही सोडत नाहीत.

नवीन पाईपलाईन सुद्धा झालेली आहे ते पण पाणी आतापर्यंत चालू झाले नाही बाबा रमजान गल्ली येथील रहिवासी असलेले सय्यद अजहर यांनी इतर नागरिकांनी लेखी निवेदन न.प. चे मुख्याधीकरी यांना येथील रहिवाशांनी निवेदन देऊन तक्रार सुद्धा केलेली आहे. हर एक घरापर्यंत पाणी पोहोचवण्याचा काम नगरपालिकेचे आहे. या सर्व बाबींची दखल प्रशासनातील अधिकाऱ्यांनी तात्काळ घ्यावी नसता घागर मोर्चा काढण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button