Thursday, May 14

Tag: of a village is possible if Gram Panchayat Adhikari decides

CEO Meenal Karanwal : ग्रामपंचायत अधिकारी यांनी ठरवले तर गावाचा कायापालट शक्य – सीईओ मीनल करनवाल यांचे प्रतिपादन -nnl

CEO Meenal Karanwal : ग्रामपंचायत अधिकारी यांनी ठरवले तर गावाचा कायापालट शक्य – सीईओ मीनल करनवाल यांचे प्रतिपादन -nnl

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| ग्रामपंचायत अधिकारी सक्षम आणि कार्यतत्पर असतील तर गावाचा कायापालट शक्य आहे, असे प्रतिपादन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मीनल करनवाल यांनी केले. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात नव्याने रुजू झालेल्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांसाठी आज बुधवार दिनांक 8 जानेवारी रोजी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले होते. त्‍यावेळी त्‍या बोलत होत्‍या. मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झालेल्‍या कार्यक्रमात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे व ग्रामपंचायत विभागाच्‍या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा जाधव-कापसे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे त्‍या म्‍हणाल्‍या, गावस्तरावर शुद्ध पिण्याचे पाणी, शाश्वत स्वच्छता तसेच शाळा व अंगणवाडीतील पायाभूत सुविधा उभारण्यावर भर देण्याची गरज आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोज...
error: Content is protected !!